शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 01:00 IST

जिल्ह्यात संततधार पावसाने पाचव्याही दिवशी सूर्यदर्शन झालेले नाही. मेळघाटसह चांदूरबाजार तालुक्यात पावसाचा कहर अद्याप सुरू आहे. सर्व तालुक्यांमध्ये सरासरी २७.२ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये धारणी तालुक्यासह सहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

ठळक मुद्देभिंती कोसळल्याने सात जखमी : ५० वर घरांची पडझड, पंचनामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात संततधार पावसाने पाचव्याही दिवशी सूर्यदर्शन झालेले नाही. मेळघाटसह चांदूरबाजार तालुक्यात पावसाचा कहर अद्याप सुरू आहे. सर्व तालुक्यांमध्ये सरासरी २७.२ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये धारणी तालुक्यासह सहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. दरम्यान पावसाने बाधित घरांचे पंचनामे तलाठ्यांद्वारे करण्यात येत आहेत.जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने झड लावली आहे. काही तालुक्यांमध्ये पावसाचा जोर जास्त आहे. या पाच दिवसांत तीन तालुक्यांसह २५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली, तर जिल्ह्याच्या सरासरी पावसामध्ये २२६ ते चार दिवसांत ३३७ मिमी अशी वाढ झालेली आहे. तरीही अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ८० मिमीने पाऊस माघारलेला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २७.२ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक ७३ मिमी पाऊस धारणी तालुक्यात झाला. चिखलदरा ५१.६ मिमी, अमरावती २७.३ मिमी, भातकुली १०.८ मिमी, नांदगाव १६.८ मिमी, चांदूर रेल्वे २१.२ मिमी, धामणगाव रेल्वे २४.३ मिमी, तिवसा २०.९ मिमी, मोर्शी २४.९ मिमी, वरूड २६.३ मिमी, अचलपूर १९.६ मिमी, चांदूरबाजार ४७.१ मिमी, दर्यापूर ९.९ मिमी, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ७.३ मिमी अशी नोंद झालेली आहे.४३ तासानंतर मिळाला आदित्यचा मृतदेहअंजनगाव सुर्जी : नजीकच्या शहानूर प्रकल्पस्थळी हौसेखातर मासळी पकडण्यास गेलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल ४३ तासानंतर मंगळवारी दुपारी मिळाला. आदित्य शांताराम कलबागे (२२, आनंदनगर, ता दर्यापूर) मृत तरुणाचे नाव आहे. २८ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास आदित्य शहानूर प्रकल्पात वाहून गेला होता. महसूल, पोलीस व अन्य यंत्रणेच्या वारंवार पाठपुराव्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक सोमवारी सायंकाळच्या सुमारास शहानूर प्रकल्पावर पोहोचले. घटनेच्या २४ तासानंतर बचाव पथक आल्याने मृताचे कुटुंबीय व अन्य प्रत्यक्षदर्शींनी संताप व्यक्त केला. दरम्यान पावसाचा वाढता जोर व प्रकल्पातील जलसाठा वाढू लागल्याने सोमवारी रात्री ८.३० वाजता बचावकार्य थांबविण्यात आले. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास गाळात फसलेल्या आदित्यच्या मृतदेहाला नदीपात्राबाहेर काढण्यात आले. नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. त्यानंतर आदित्यचा मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

टॅग्स :Rainपाऊस