लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रविवारी सायंकाळच्या सुमारास कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे १६ हजार हेक्टर क्षेत्रावरील रबी-उन्हाळी पिके व फळपिकांचे नुकसान झाले. सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपिटीचा सर्वाधिक तडाखा संत्रा व केळी या पिकांना बसला. कांदा, गहू, पपई, डाळिंब, केळी जमीनदोस्त झाली. मोर्शी तालुक्यातील धामणगाव व रिद्धपूर मंडळातील पोल्ट्री फॉर्ममधील १० हजार ५०० कोंबड्या अवकाळी पावसाने दगावल्या. एकट्या चांदूरबाजार तालुक्यात १३ हजार ६३४ हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान झाल्याचे प्रशासनाने कळविले आहे.महसूल यंत्रणेने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात अमरावती, धामणगाव रेल्वे, मोर्शी, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदूर बाजार या सहा तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका बसल्याचे नमूद करण्यात आले. अमरावती तालुक्यात ४५७ हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांचे नुकसान झाले, तर १४० गावांतील १३७५ घरांचे अंशत: नुकसान झाले. भातकुली व चांदूर रेल्वे तालुक्यात अनुक्रमे दोन व १२२ घरांचे अंशता नुकसान झाले. धामणगाव रेल्वे तालुक्यात ३६.९० हेक्टर क्षेत्र बाधित झाले, तर १२२ घरांचे अंशत: नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.मोर्शी तालुक्यात ८० हेक्टरवरील संत्राबागा, ५० हेक्टरवरील तीळ, ४५ हेक्टरवरील कांदा, १२ हेक्टरवरील डाळिंबाचे नुकसान झाले. तालुक्यात ३० घरांचे अंशत: नुकसान झाल्याची माहिती महसूल यंत्रणेने दिली. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील १७६ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले. अचलपूर तालुक्यात ७३२ हेक्टर कांदा, ४९ हेक्टरवरील केळीपिकाचे नुकसान झाले. ४० घरांचेही नुकसान झाले. चांदूर बाजार तालुक्यात ३५८ हेक्टर कांदा, २४७ हेक्टर संत्रा, १३ हजार ६३४ हेक्टर केळी पिकाचे व २०७ घरांचे अंशत: नुकसान झाले. चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक २८.४ मिमी पावसाची नोंद असली तरी तेथे केवळ दोन गावांमधील सात घरांचे अंशत: नुकसान झाले.असा झाला पाऊस १०,५०० कोंबड्या गतप्राणअमरावती - ७.४ मिमी, तिवसा - १०.४ मिमी, भातकुली - ७.९ मिमी, चांदूर रेल्वे - १५.२ मिमी, धामणगाव रेल्वे - १०.७ मिमी, नांदगाव खंडेश्वर - ४.५ मिमी, मोर्शी - १७.९ मिमी, वरूड - १३.४ मिमी, दर्यापूर - १८.३ मिमी, अंजनगाव सुर्जी - ११.१ मिमी, अचलपूर - ११.५ मिमी, चांदूर बाजार २६.९ मिमी, धारणी - ०.३ मिमी, चिखलदरा २८.४ मिमी
गारपीट, पाऊस, वादळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:01 IST
कांदा, गहू, पपई, डाळिंब, केळी जमीनदोस्त झाली. मोर्शी तालुक्यातील धामणगाव व रिद्धपूर मंडळातील पोल्ट्री फॉर्ममधील १० हजार ५०० कोंबड्या अवकाळी पावसाने दगावल्या. एकट्या चांदूरबाजार तालुक्यात १३ हजार ६३४ हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान झाल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
गारपीट, पाऊस, वादळ
ठळक मुद्दे१६,००० हेक्टरमधील फळपिके उद्ध्वस्त : १८०० घरांची पडझड