शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

अचलपूर, चांदूरबाजार तालुक्यात गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 05:00 IST

शुक्रवार १९ मार्चला सकाळी ११ ते ११.३० चे दरम्यान वादळी पावसासह चमक, सुरवाडा, खांबोरा, चांचोडी, तुळजापुर जहांगीर, देवरी, पोही, नायगाव भागातही तुरळक गार पडली. यातही कांदा व गव्हाचे पीक बाधित झाले. काहींचे गहू सोंगल्या गेले असून काहींना गहू ओंबीवर शेतात उभा आहे. वादळी वाऱ्यासह पावसाने गहू झोपला आहे. संत्रा झाडावरील बार गळले आहेत. गौरखेडा, वज्झर, धामणगाव गढीसह लगतच्या पिरसरात २० मार्चला गार पडली आहे.

ठळक मुद्देधारणीत वादळी पाऊस, शिरजगाव, मल्हारा, बहिरमला झोडपले, दुसऱ्या दिवशीही फटका

लोकमत चमूलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी अचलपूर, चांदूरबाजार तालुक्यातील काही गावांत तुफानी गारपीट झाली. वादळवासह कोसळलेल्या अकाली पावसाने दोन्ही तालुक्यातील गहू, संत्रा, मोसंबी व गंजी करून ठेवलेल्या चण्याचे मोठे नुकसान झाले. धारणी व तिवसा तालुक्यातही शनिवारी अकाली पाऊस झाला. परतवाडा : अचलपूर तालुक्यातील मल्हारा, वज्झर, बुरडघाट, काळवीट, म्हसोना, गौरखेडाकुंभी, नर्सरी, धामणगाव गढी, एकलासपुर, धोतरखेड्यासह लगतच्या परिसरात २० मार्चला सायंकाळी ४ ते ४.३० वाजताच्या दरम्यान वादळी वाºयासह गारपीट झाली. काही ठिकाणी हरभऱ्याएवढी, काही भागात बोराच्या आकाराच्या १५ ते २० मिनिटे गारा पडल्या. यात गहू, संत्रा, कांदा, पिकाचे नुकसान झाले. सिद्धक्षेत्र बहिरमसह कारंजा बहिरम, सफार्पूर, सायखेड मध्येही गारपीट झाली आहे.शुक्रवार १९ मार्चला सकाळी ११ ते ११.३० चे दरम्यान वादळी पावसासह चमक, सुरवाडा, खांबोरा, चांचोडी, तुळजापुर जहांगीर, देवरी, पोही, नायगाव भागातही तुरळक गार पडली. यातही कांदा व गव्हाचे पीक बाधित झाले. काहींचे गहू सोंगल्या गेले असून काहींना गहू ओंबीवर शेतात उभा आहे. वादळी वाऱ्यासह पावसाने गहू झोपला आहे. संत्रा झाडावरील बार गळले आहेत. गौरखेडा, वज्झर, धामणगाव गढीसह लगतच्या पिरसरात २० मार्चला गार पडली आहे. वादळी वाऱ्यासह गारपीटीमुळे झालेले शेतमालाचे नुकसान प्रत्यक्ष पाहणीनंतर सोमवार पर्यंत पुढे येईल. यात शेत पिकाचे नुकसान झाल्याची माहिती अचलपूर तालुका कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव यांनी दिली.ब्राह्मणवाडा थडी परिसरात गारपीटीने संत्रा कोलमडलाब्राह्मणवाडा थडी : ब्राह्मणवाडा थडीसह परिसरातील शिरजगाव, करजगाव, वणी, सर्फापूर, अलमपूर, सोनोरी, विश्रोळी भागांत शनिवारी वादळी वाºयासह पाऊस व गारपीट झाली. या पाच ते दहा मिनिट झालेल्या गारपिटीमुळे हरभरा, गहू, कांदे, भाजीपाला, संत्रा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

तिवसा तालुक्यात अवकाळी पावसाचा कहरतिवसा : सलग दोन दिवस कोसळलेल्या अकाली पावसाने तिवसा तालुक्यात हातातोंडाशी आलेल्या गहू, कांदा या पिकांची पार दाणादाण उडाली. चक्रीवादळाने संत्रा झाडे सुद्धा जमीनदोस्त झाले आहेत.  तालुक्यात शुक्रवारी व काही भागात शनिवारी वादळी पाऊस व गारपीट झाली. यात मुसळधार पावसामुळे सोंगणीला आलेला गहू व सोंगणी करून ठेवलेला हरभरा पार पावसात भिजला. त्यामुळे  मोठ्या प्रमाणावर या अवकाळी पावसाने शेती पिकांचं मोठं नुकसान केलं आहे. तर उन्हाळामध्ये घेतला जाणारा कांदा पिकासह संत्राचे देखील नुकसान झाले आहे. भारसवाडी, शेंदुरजनाबाजार व धामंत्री येथे मोठे नुकसान झाले आहे.

शिरजगाव भागात पाच मिनिटे कोसळली गार शिरजगाव कसबा/चांदूरबाजार / करजगाव:  चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा परिसरात दुपारी तुफान वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे अनेक शेतातील गहू, कांदा तसेच आंबा संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवघ्या पाच मिनिटाच्या आलेल्या गारीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिसकावून घेतलेला आहे. येथील किराणा व्यावसायिक संतोष राठी यांनी गारा जमादेखील केल्या. सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या अनेक गावांना गारपिटीचा तडाखा बसला. चांदूर बाजार तालुक्यातील वणी, नागरवाडी, बेलखेडा भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे.

धारणीत पावसाची हॅटट्रिक धारणी : येथे सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. गुरुवारपासून अवकाळी पावसाचा सुरू झालेला खेळ शुक्रवारी सकाळी आणि दुपारी सुरू राहिला. तर, शनिवारी पुन्हा संध्याकाळी पाच वाजतापासून मेघगर्जनेसह अनेक ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी बरसल्या. बैरागड परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सवंगणीवर आलेला गहू आणि हरभऱ्याचे पीक खराब झाले. सुदैवाने गारपीट न झाल्यामुळे सध्यातरी रबी हंगामाचे पीक सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊस