शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

मेळघाटात गुंजतेय ढोल, बासरीचे सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 01:30 IST

मेळघाटच्या आदिवासी पाड्यात त्यांच्या सर्वात मोठ्या होळी सणाला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. गावशिवारावर होळी दहन झाले की, .....

ठळक मुद्देनाच-गाणे अन् मौज : पाच दिवस फगव्याची धूम; सिड्डू आणि जिलूचा खमंग सुवास

ऑनलाईन लोकमतपरतवाडा : मेळघाटच्या आदिवासी पाड्यात त्यांच्या सर्वात मोठ्या होळी सणाला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. गावशिवारावर होळी दहन झाले की, ढोल, बासुरीच्या स्वरांनी मेळघाटचा आसमंत कोरकू गीतांनी निनादणार आहे. पाच दिवस फगव्याची धूम आणि त्यानंतर सिड्डू, मटन, यावलीच्या पंतगी गावात उठणार आहेत. वर्षभर होळी सणाची वाट पाहत मिळेल ती अंगमेहनतीची कामे करून पै-पै जमा करीत स्थलांतरित आदिवासी आपल्या गावी परतले.मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील आदिवासी कोरकूंचे आपले विश्व आहेत. त्यांच्या रीती-परंपरा आजही शहरी जांगडींना (माणसांना) त्यांच्या मोहात पाडणाºया आहेत. मेघनाथपूजा, घुंगरू बाजार, चैत्राचा नवस, होळी आणि इतर सण ते मोठ्या उत्साहात साजरे करतात. परंतु, दिवाळीपेक्षा मोठा सण होळी असल्याने त्याची वाट वर्षभर आदिवासी बघतात. आदिवासींची संस्कृती व त्यांचे विश्व मेळघाटच्या दºयाखोºयात वसलेल्या पाड्यांमध्ये असून, नागमोडी वळणाचा मेळघाटात समधुर आदिवासी गीतांचा स्वर, ढोलकीची थाप बासुरीच्या स्वरोती निनादला आहे. शनिवारपासून फागून गीत व सिड्डू-जिलूचा सुगंध दरवळणार आहे.मेळघाटात शुक्रवारी होळी पेटविल्या जाईल. आदिवासी दोन होळी पेटवितात. लहान आणि मोठी, त्याला चोखारी (जिता) आणि गोज (बासी) होळी असे म्हटले जाते, आदिवासी कोरकू समाजात होळी पेटविण्यासाठी एकच वेळ नसून, पहाटे ७ पासून सायंकाळी ७ पर्यंत होळी पेटविली जाते. गौलखेडा बाजार परिसरात दोन बांबू आणून गावातील प्रतिष्ठितांच्या घरी ते ठेवतात, सायंकाळी वाजत गाजत दोन्ही बांबू दोन मीटर अंतरावर उभे करतात आणि दुसºया दिवशी चोखारी व गोज होळी पेटविण्याची प्रथा आहे. काटकुंभ परिसरात एक महिन्यापासून चोखार आणि बासी होळीची तयारी फाग गीत म्हणत सुरू असते. पहिल्या दिवशी चोखारी होळी साजरी होत आहे.होळीला सिड्डू, कोंबड्यांचा नवसमेळघाटात पूजा करण्याची प्रथा थोडी वेगळी आहे. बिहाली परिसरात होळीची पूजा करताना सिड्डू आणि कोंबड्याचा नवस फेडतात. त्यानंतर होळी पेटली की त्याला प्रदक्षिणा घालीत कोरकू गीत ढोल बासुरीच्या तालावर युवक-युवती, महिला-पुरूष नाचगाणे करतात. पहाटे होळीची राख घरी नेऊन पाण्यात टाकून आंघोळ करतात.पाच दिवस फगव्याची धूमहोळी म्हणताच मेळघाटातील फगव्याची आढवण होते. आदिवासी युवक-युवती होळीच्या दुसºया दिवसापासून पाच दिवस फगवा मागतात. (शहरी माणूस) जांगडीसह गावातील प्रतिष्ठितांकडून रक्कम गोळा झाली की शेवटच्या दिवशी सिड्डू, चावली, पुरी अन् जिलू (बोकडाचे मटण) ची पार्टी रंगते.आदिवासी हे रावणाचे सैनिकशहरी भागात सामान्यत: आदिवासी रावणाचे वंशज असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात आदिवासी रावणाचे सैनिक होते. आपल्या राजाची पूजा करणे त्यांचे कर्तव्य आहे. म्हणून मेळघाटचे आदिवासी रावणाची पूजा करीत असल्याचे सेवानिवृत्त आदिवासी शिक्षक बाबू गुरुजी दारसिम्बे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.