शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

१०८ तासांत ७५ किमी रस्ता; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लक्ष्य, नियोजनाकडे मात्र दुर्लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 11:13 IST

Amravati Akola Highway : सुमारे १० वर्षांपासून खोदून ठेवलेला तसेच अर्धवट होऊन रखडलेल्या अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला शुक्रवारी पुन्हा सुरुवात झाली. लोणी ते मूर्तिजापूर दरम्यान सलग पाच दिवस डांबरी रस्त्याचे काम होणार आहे.

ठळक मुद्देअमरावती - अकोला राष्ट्रीय महामार्ग : दिवसभर वाहतुकीचा खोळंबा, तयार रस्त्यांवरून वाहनांची ये-जा

बडनेरा (अमरावती) :अमरावती ते अकोला दरम्यान रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला शुक्रवारी वाजतगाजत सुरुवात झाली. यामुळे महामार्गावर पहाटे शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नादात संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीचे कामातील त्रुटींकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे पहिल्याच दिवशी निदर्शनाला आले.

सुमारे १० वर्षांपासून खोदून ठेवलेला तसेच अर्धवट होऊन रखडलेल्या अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला शुक्रवारी पुन्हा सुरुवात झाली. लोणी ते मूर्तिजापूर दरम्यान सलग पाच दिवस डांबरी रस्त्याचे काम होणार आहे. ज्या कंपनीला रस्त्याचे कंत्राट मिळाले, त्या राज पथ इन्फ्राकॉन प्रा. लि. या कंपनीने या कामाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार असल्याचा दावा केला आहे. १०८ तासांत ७५ किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्ण करण्यासाठी कंपनीचे तज्ज्ञ कामावर लक्ष ठेवून आहेत. विशेषत: कामाच्या दर्जाची प्रयोगशाळेतून तपासणीही केली जाणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यासाठी स्वतंत्रपणे ‘वाॅर रूम’ तयार करण्यात आली आहे.

दरम्यान, ३ जून रोजी लोणी गावानजीक महामार्गावर वाजतगाजत कामाला सुरूवात झाली, तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बराच वेळपर्यंत ही वाहने अडकून पडली. दुसऱ्या बाजूने रस्त्याचे काम सुरू असतानाच त्यावरून वाहनांची वर्दळ कायम होती. त्यामुळे पुढे पाठ मागे सपाट, असा हा प्रकार अनेकांनी अनुभवला. याकडे मात्र कंपनी अधिकाऱ्यांचे सपशेल दुर्लक्ष झाले होते. त्याचप्रमाणे कंपनीची बरीच वाहने निर्माणाधिन रस्त्यावरून धावली. अकोला महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी असते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नादात नियोजनाचा विसर पडल्याने दिवसभर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. एकाच मार्गावरून दोन्ही बाजूच्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.

लोणी गावाच्या प्रवेशद्वारापुढेच उड्डाणपुलाची संरचना

गेल्या तीन आठवड्यांपासून लोणी गावाच्या प्रवेशद्वारावरच लोखंडी सळाखीची संरचना उभी करण्यात आली आहे. येथे उड्डाणपूल होणार असल्याचे समजते. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले होते. बडनेरा-कारंजा, बडनेरा ते अकोला तसेच बडनेरा ते धनज मार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांना या संरचनेमुळे व त्यापूर्वी उभारण्यात आलेल्या अवाढव्य गतिरोधकामुळे मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकAmravatiअमरावतीAkolaअकोला