शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पालकमंत्री पोहोेचले थेट शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील इसापूर ममदापूर शिवारात मंगळवारी अचानक पालकमंत्री प्रवीण पोटे यांना पाहून शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी रानडुकरांनी शेतीच्या केलेल्या नुकसानाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.प्रत्यक्ष पालकमंत्री शेतीची धूळ अंगावर घेत शिवारात आल्याचे पाहून शेतकऱ्यांना नवलच वाटले. त्यांनी इसापूर ममदापूर शिवारात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या ...

ठळक मुद्देरानडुकरांनी केलेल्या नुकसानाची पाहणी : इसापूर-ममदापूर शेतशिवारात दौरा

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील इसापूर ममदापूर शिवारात मंगळवारी अचानक पालकमंत्री प्रवीण पोटे यांना पाहून शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी रानडुकरांनी शेतीच्या केलेल्या नुकसानाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.प्रत्यक्ष पालकमंत्री शेतीची धूळ अंगावर घेत शिवारात आल्याचे पाहून शेतकऱ्यांना नवलच वाटले. त्यांनी इसापूर ममदापूर शिवारात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. संदीप थोटे, संजय इंगळे, विठ्ठलराव कोल्हे या शेतकऱ्यांच्या शेतात रानडुकराने केलेल्या नुकसानाची पाहणी केली आणि बोंडअळीच्या नुकसानावर मात करण्यासाठी शेतकºयांना मार्गदर्शन केले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे सांगत इसापूर ममदापूर या गावाचा आढावा घेतला आणि इसापूर या छोट्याशा गावाला भेट देऊन थेट गावकऱ्यांशी संवाद साधला व गावकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. इसापूर येथील बसफेरी राज्य परिवहन महामंडळाने बंद केल्याचे गाऱ्हाणे ग्रामस्थांनी मांडताच अमरावती येथील विभाग नियंत्रकांशी संपर्क साधून तातडीने बसफेरी सुरू करण्याचे आदेश दिले.इसापूरचे उपसरपंच संजय इंगळे, ममदापूर ग्रामपंचायतचे सदस्य संदीप थोटे, शेतकरी विठ्ठलराव कोल्हे, सुरेंद्र इंगळे, गोलू शिंदे, पिंटू देशमुख, अरविंद बोके आदी शेतकरी व गावकरी मंडळी उपस्थित होते.वनविभागाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गारनेरपिंगळाई : परिसरातील शेतात वन्यप्राणी धुमाकूळ घालून पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत वनअधिकाऱ्यांकडे तक्रारी दिल्या, तर ते शेतकऱ्यांनाच दमदाटी करीत असल्याचा आरोप होत आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त न केल्यास १० आॅगस्ट रोजी नेर पिंगळाई येथे जाहीर सभेचे आयोजन करून शासनाविरूद्ध तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.परिसरात रोही (नीलगाय), हरिण, रानडुकरे आदी वन्य प्राणी असून कपाशी, सोयाबीन पिके नष्ट करीत आहेत. पावसानेही दडी मारल्याने पीकस्थिती चिंताजनक आहे. वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी शेतकरी रात्रीला जागरण करीत आहेत. चुकून वन्यप्राण्याला इजा झाली तर त्याचे खापर शेतकऱ्यांच्या डोक्यावर फोडून वनअधिकारी शेतकºयांना धमकातात.