शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

पालकमंत्री पोहोेचले थेट शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील इसापूर ममदापूर शिवारात मंगळवारी अचानक पालकमंत्री प्रवीण पोटे यांना पाहून शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी रानडुकरांनी शेतीच्या केलेल्या नुकसानाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.प्रत्यक्ष पालकमंत्री शेतीची धूळ अंगावर घेत शिवारात आल्याचे पाहून शेतकऱ्यांना नवलच वाटले. त्यांनी इसापूर ममदापूर शिवारात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या ...

ठळक मुद्देरानडुकरांनी केलेल्या नुकसानाची पाहणी : इसापूर-ममदापूर शेतशिवारात दौरा

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील इसापूर ममदापूर शिवारात मंगळवारी अचानक पालकमंत्री प्रवीण पोटे यांना पाहून शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी रानडुकरांनी शेतीच्या केलेल्या नुकसानाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.प्रत्यक्ष पालकमंत्री शेतीची धूळ अंगावर घेत शिवारात आल्याचे पाहून शेतकऱ्यांना नवलच वाटले. त्यांनी इसापूर ममदापूर शिवारात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. संदीप थोटे, संजय इंगळे, विठ्ठलराव कोल्हे या शेतकऱ्यांच्या शेतात रानडुकराने केलेल्या नुकसानाची पाहणी केली आणि बोंडअळीच्या नुकसानावर मात करण्यासाठी शेतकºयांना मार्गदर्शन केले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे सांगत इसापूर ममदापूर या गावाचा आढावा घेतला आणि इसापूर या छोट्याशा गावाला भेट देऊन थेट गावकऱ्यांशी संवाद साधला व गावकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. इसापूर येथील बसफेरी राज्य परिवहन महामंडळाने बंद केल्याचे गाऱ्हाणे ग्रामस्थांनी मांडताच अमरावती येथील विभाग नियंत्रकांशी संपर्क साधून तातडीने बसफेरी सुरू करण्याचे आदेश दिले.इसापूरचे उपसरपंच संजय इंगळे, ममदापूर ग्रामपंचायतचे सदस्य संदीप थोटे, शेतकरी विठ्ठलराव कोल्हे, सुरेंद्र इंगळे, गोलू शिंदे, पिंटू देशमुख, अरविंद बोके आदी शेतकरी व गावकरी मंडळी उपस्थित होते.वनविभागाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गारनेरपिंगळाई : परिसरातील शेतात वन्यप्राणी धुमाकूळ घालून पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत वनअधिकाऱ्यांकडे तक्रारी दिल्या, तर ते शेतकऱ्यांनाच दमदाटी करीत असल्याचा आरोप होत आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त न केल्यास १० आॅगस्ट रोजी नेर पिंगळाई येथे जाहीर सभेचे आयोजन करून शासनाविरूद्ध तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.परिसरात रोही (नीलगाय), हरिण, रानडुकरे आदी वन्य प्राणी असून कपाशी, सोयाबीन पिके नष्ट करीत आहेत. पावसानेही दडी मारल्याने पीकस्थिती चिंताजनक आहे. वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी शेतकरी रात्रीला जागरण करीत आहेत. चुकून वन्यप्राण्याला इजा झाली तर त्याचे खापर शेतकऱ्यांच्या डोक्यावर फोडून वनअधिकारी शेतकºयांना धमकातात.