शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
5
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
6
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
8
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
9
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
10
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
11
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
12
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
13
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
14
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
15
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
16
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
17
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
18
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
19
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
20
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा

पालकमंत्री पोहोेचले थेट शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील इसापूर ममदापूर शिवारात मंगळवारी अचानक पालकमंत्री प्रवीण पोटे यांना पाहून शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी रानडुकरांनी शेतीच्या केलेल्या नुकसानाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.प्रत्यक्ष पालकमंत्री शेतीची धूळ अंगावर घेत शिवारात आल्याचे पाहून शेतकऱ्यांना नवलच वाटले. त्यांनी इसापूर ममदापूर शिवारात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या ...

ठळक मुद्देरानडुकरांनी केलेल्या नुकसानाची पाहणी : इसापूर-ममदापूर शेतशिवारात दौरा

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील इसापूर ममदापूर शिवारात मंगळवारी अचानक पालकमंत्री प्रवीण पोटे यांना पाहून शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी रानडुकरांनी शेतीच्या केलेल्या नुकसानाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.प्रत्यक्ष पालकमंत्री शेतीची धूळ अंगावर घेत शिवारात आल्याचे पाहून शेतकऱ्यांना नवलच वाटले. त्यांनी इसापूर ममदापूर शिवारात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. संदीप थोटे, संजय इंगळे, विठ्ठलराव कोल्हे या शेतकऱ्यांच्या शेतात रानडुकराने केलेल्या नुकसानाची पाहणी केली आणि बोंडअळीच्या नुकसानावर मात करण्यासाठी शेतकºयांना मार्गदर्शन केले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे सांगत इसापूर ममदापूर या गावाचा आढावा घेतला आणि इसापूर या छोट्याशा गावाला भेट देऊन थेट गावकऱ्यांशी संवाद साधला व गावकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. इसापूर येथील बसफेरी राज्य परिवहन महामंडळाने बंद केल्याचे गाऱ्हाणे ग्रामस्थांनी मांडताच अमरावती येथील विभाग नियंत्रकांशी संपर्क साधून तातडीने बसफेरी सुरू करण्याचे आदेश दिले.इसापूरचे उपसरपंच संजय इंगळे, ममदापूर ग्रामपंचायतचे सदस्य संदीप थोटे, शेतकरी विठ्ठलराव कोल्हे, सुरेंद्र इंगळे, गोलू शिंदे, पिंटू देशमुख, अरविंद बोके आदी शेतकरी व गावकरी मंडळी उपस्थित होते.वनविभागाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गारनेरपिंगळाई : परिसरातील शेतात वन्यप्राणी धुमाकूळ घालून पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत वनअधिकाऱ्यांकडे तक्रारी दिल्या, तर ते शेतकऱ्यांनाच दमदाटी करीत असल्याचा आरोप होत आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त न केल्यास १० आॅगस्ट रोजी नेर पिंगळाई येथे जाहीर सभेचे आयोजन करून शासनाविरूद्ध तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.परिसरात रोही (नीलगाय), हरिण, रानडुकरे आदी वन्य प्राणी असून कपाशी, सोयाबीन पिके नष्ट करीत आहेत. पावसानेही दडी मारल्याने पीकस्थिती चिंताजनक आहे. वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी शेतकरी रात्रीला जागरण करीत आहेत. चुकून वन्यप्राण्याला इजा झाली तर त्याचे खापर शेतकऱ्यांच्या डोक्यावर फोडून वनअधिकारी शेतकºयांना धमकातात.