शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री पोहोेचले थेट शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील इसापूर ममदापूर शिवारात मंगळवारी अचानक पालकमंत्री प्रवीण पोटे यांना पाहून शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी रानडुकरांनी शेतीच्या केलेल्या नुकसानाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.प्रत्यक्ष पालकमंत्री शेतीची धूळ अंगावर घेत शिवारात आल्याचे पाहून शेतकऱ्यांना नवलच वाटले. त्यांनी इसापूर ममदापूर शिवारात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या ...

ठळक मुद्देरानडुकरांनी केलेल्या नुकसानाची पाहणी : इसापूर-ममदापूर शेतशिवारात दौरा

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील इसापूर ममदापूर शिवारात मंगळवारी अचानक पालकमंत्री प्रवीण पोटे यांना पाहून शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी रानडुकरांनी शेतीच्या केलेल्या नुकसानाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.प्रत्यक्ष पालकमंत्री शेतीची धूळ अंगावर घेत शिवारात आल्याचे पाहून शेतकऱ्यांना नवलच वाटले. त्यांनी इसापूर ममदापूर शिवारात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. संदीप थोटे, संजय इंगळे, विठ्ठलराव कोल्हे या शेतकऱ्यांच्या शेतात रानडुकराने केलेल्या नुकसानाची पाहणी केली आणि बोंडअळीच्या नुकसानावर मात करण्यासाठी शेतकºयांना मार्गदर्शन केले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे सांगत इसापूर ममदापूर या गावाचा आढावा घेतला आणि इसापूर या छोट्याशा गावाला भेट देऊन थेट गावकऱ्यांशी संवाद साधला व गावकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. इसापूर येथील बसफेरी राज्य परिवहन महामंडळाने बंद केल्याचे गाऱ्हाणे ग्रामस्थांनी मांडताच अमरावती येथील विभाग नियंत्रकांशी संपर्क साधून तातडीने बसफेरी सुरू करण्याचे आदेश दिले.इसापूरचे उपसरपंच संजय इंगळे, ममदापूर ग्रामपंचायतचे सदस्य संदीप थोटे, शेतकरी विठ्ठलराव कोल्हे, सुरेंद्र इंगळे, गोलू शिंदे, पिंटू देशमुख, अरविंद बोके आदी शेतकरी व गावकरी मंडळी उपस्थित होते.वनविभागाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गारनेरपिंगळाई : परिसरातील शेतात वन्यप्राणी धुमाकूळ घालून पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत वनअधिकाऱ्यांकडे तक्रारी दिल्या, तर ते शेतकऱ्यांनाच दमदाटी करीत असल्याचा आरोप होत आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त न केल्यास १० आॅगस्ट रोजी नेर पिंगळाई येथे जाहीर सभेचे आयोजन करून शासनाविरूद्ध तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.परिसरात रोही (नीलगाय), हरिण, रानडुकरे आदी वन्य प्राणी असून कपाशी, सोयाबीन पिके नष्ट करीत आहेत. पावसानेही दडी मारल्याने पीकस्थिती चिंताजनक आहे. वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी शेतकरी रात्रीला जागरण करीत आहेत. चुकून वन्यप्राण्याला इजा झाली तर त्याचे खापर शेतकऱ्यांच्या डोक्यावर फोडून वनअधिकारी शेतकºयांना धमकातात.