शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
4
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
5
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
6
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
7
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
8
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
9
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
10
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
11
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
12
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
13
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
14
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
15
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
16
कष्टाचं फळ! २६ व्या वर्षी रोज १८ तासांची ड्युटी करून तरुणीने घेतलं तब्बल ७ कोटींचं घर
17
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
18
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
19
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
20
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते तिरंग्याला सलामी

By admin | Updated: August 17, 2015 00:09 IST

भारतीय स्वातंत्र्याचा ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.

ध्वजारोहण : शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शासनाची भरीव कामगिरीअमरावती : भारतीय स्वातंत्र्याचा ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर राष्ट्रगीत व मानवंदना देण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) लखमी गौतम उपस्थित होते.पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्ह्यातील विकासकामांचा ठळक आढावा घेतला. त्यामध्ये १ लाख ५५ हजार शेतकऱ्यांना १३०० कोटी रुपये पीककर्ज वाटप, ४० हजार शेतकऱ्यांना ३५३ कोटींचे कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. त्यासोबतच शेतकरी सावकार कर्जमुक्तीकरिता २२ कोटी मंजूर करण्यात आले. पीक विमा योजनेत १ लाख १६ शेतकऱ्यांना ८४ कोटी रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला. नवीन भूसंपादन कायद्यामुळे शेतकऱ्यांना शेतजमिनीच्या पाचपट वाढीव दर मिळणार असल्याचेही ना. पोटे यांनी सांगितले. जिल्ह्यात दरवर्षी १७५० याप्रमाणे तीन वर्षांत ५२५० विहिरींचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यात १२ हजार ५०० टी.सी.एम. जलसाठा निर्माण झाला आहे. १० हजारपेक्षा जास्त हेक्टर जमिनीवर सिंचन होणार आहे. उद्योग क्षेत्रात अमरावती जिल्ह्यात टेक्सटाईल पार्कचा शुभारंभ झाला असून २२४० कोटींच्या गुंतवणुकीतून ४७७२ लोकांना रोजार मिळणार आहे. जिल्ह्याचा दुर्गम भाग असलेल्या मेळघाटात सोलर ऊर्जने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने ३० हजार कोटींचा मुंबई नागपूर सहापदरी एक्सप्रेस वे प्रस्तापित केला जाणार आहे. शहरातील काँक्रीट रस्ते व पुलाकरिता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सीआरएफ फंडामधून ३६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा विकासासाठी नियोजन समितीने बजेट १५० कोटीवरुन २१८ कोटी केले आहे. अमरावतीचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश केल्याने शहराचा विकास नियोजित पद्धतीने होण्यास गती मिळेल. जिल्ह्यातील २ लाख शेतकऱ्यांना अन्न, सुरक्षेचे कवच लाभणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना ३ रुपये किलो तांदूळ व २ रुपये किलो गहू याप्रमाणे अन्न सुरक्षा मिळणार आहे. यावेळी आमदार अनिल बोंडे, राजेंद्र गवई, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, स्वातंत्र्य सैनिक महादेवराव मोरे, राज्य माहिती आयुक्त डी.आर. बनसोड व सर्व विभागांचे महत्त्वाचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)