शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते तिरंग्याला सलामी

By admin | Updated: August 17, 2015 00:09 IST

भारतीय स्वातंत्र्याचा ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.

ध्वजारोहण : शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शासनाची भरीव कामगिरीअमरावती : भारतीय स्वातंत्र्याचा ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर राष्ट्रगीत व मानवंदना देण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) लखमी गौतम उपस्थित होते.पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्ह्यातील विकासकामांचा ठळक आढावा घेतला. त्यामध्ये १ लाख ५५ हजार शेतकऱ्यांना १३०० कोटी रुपये पीककर्ज वाटप, ४० हजार शेतकऱ्यांना ३५३ कोटींचे कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. त्यासोबतच शेतकरी सावकार कर्जमुक्तीकरिता २२ कोटी मंजूर करण्यात आले. पीक विमा योजनेत १ लाख १६ शेतकऱ्यांना ८४ कोटी रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला. नवीन भूसंपादन कायद्यामुळे शेतकऱ्यांना शेतजमिनीच्या पाचपट वाढीव दर मिळणार असल्याचेही ना. पोटे यांनी सांगितले. जिल्ह्यात दरवर्षी १७५० याप्रमाणे तीन वर्षांत ५२५० विहिरींचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यात १२ हजार ५०० टी.सी.एम. जलसाठा निर्माण झाला आहे. १० हजारपेक्षा जास्त हेक्टर जमिनीवर सिंचन होणार आहे. उद्योग क्षेत्रात अमरावती जिल्ह्यात टेक्सटाईल पार्कचा शुभारंभ झाला असून २२४० कोटींच्या गुंतवणुकीतून ४७७२ लोकांना रोजार मिळणार आहे. जिल्ह्याचा दुर्गम भाग असलेल्या मेळघाटात सोलर ऊर्जने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने ३० हजार कोटींचा मुंबई नागपूर सहापदरी एक्सप्रेस वे प्रस्तापित केला जाणार आहे. शहरातील काँक्रीट रस्ते व पुलाकरिता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सीआरएफ फंडामधून ३६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा विकासासाठी नियोजन समितीने बजेट १५० कोटीवरुन २१८ कोटी केले आहे. अमरावतीचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश केल्याने शहराचा विकास नियोजित पद्धतीने होण्यास गती मिळेल. जिल्ह्यातील २ लाख शेतकऱ्यांना अन्न, सुरक्षेचे कवच लाभणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना ३ रुपये किलो तांदूळ व २ रुपये किलो गहू याप्रमाणे अन्न सुरक्षा मिळणार आहे. यावेळी आमदार अनिल बोंडे, राजेंद्र गवई, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, स्वातंत्र्य सैनिक महादेवराव मोरे, राज्य माहिती आयुक्त डी.आर. बनसोड व सर्व विभागांचे महत्त्वाचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)