शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव तालुक्यात कावीळच्या आजारात वाढ

By admin | Updated: August 7, 2015 00:27 IST

ग्रामपंचायतीमधील पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांचा उदासीनपणा यामुळे तब्बल वीस गावांत दूषित पाणी पुरवठा होत आहे.

२० गावांत दूषित पाणी : ताप, उलट्यांचा प्रादुर्भावधामणगाव रेल्वे : ग्रामपंचायतीमधील पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांचा उदासीनपणा यामुळे तब्बल वीस गावांत दूषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे कावीळच्या रूग्णांची संख्यादेखील वाढली आहे.तालुक्यात गत जून व जुलै महिन्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाण्याचे नमुने तपासण्यात आलेत़ तळेगाव दशासर परिसरातील ३५ नमुन्यांपैकी चार गावांतील बारा पाणी नमुने दूषित आढळले. तर अंजनसिंंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विभागात २७ पैकी सर्वाधिक ८ ठिकाणी पिण्याच्या पाण्यात दोष आढळला. मंगरूळ दस्तगीर परिसरात १६ नमुन्यांपैकी चार पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे दिसून आल तर निंबोली परिसरात ८७ पैकी ५ गावांत पाणी नमुन्यात दोष आढळला़ ग्रामीण भागात ब्लिचिंग पावडर टाकताना कोणत्याही मापदंडाचा उपयोग होत नसल्याने दूषित पाण्याचा पुरवठा सुरू असल्याचे दिसत आहे़ तालुक्यातील ४० गावांत अद्यापही शेणाच्या खतांचे ढिगारे कायम आहेत. ग्रामपंचायतीने वारंवार नोटीस देऊनही संबंधितांनी शेणखत न उचलल्यामुळे हे खताचे ढिगारे ग्रामस्थांच्या जीवावर बेतत आहेत. पाण्याच्या स्त्रोत लिक असल्यामुळे दूषित पाणी पिल्याशिवाय ग्रामस्थांना पर्याय नाहीत़ ज्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आहे त्या ठिकाणापासून १५ मीटर अंतरावरील सर्व जागा स्वच्छ असणे गरजेचे आहे़ परंतु आरोग्य कर्मचाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही या सूचनेचे पालन होत नसल्याचे चित्र तालुक्यात आहे़तालुक्यातील २० ते २५ गावांतील ग्रामीण रूग्ण शहरात दररोज येत आहेत़ अशक्तपणा, ताप येणे, पोटाच्या उजव्या भागात दुुखणे, डोळ्यांचा, त्वचेचा रंग पिवळा होणे, मळमळ उलट्या होणे, भूक मंदावणे, अतिसार होणे, पिवळ्या गडद रंगाची लघवी होणे अशा रूग्णांत वाढ झाली आहे़ हे रूग्ण खासगी दवाखान्यात येत असल्यामुळे ग्रामीण भागातील शासकीय रूग्णालयात रूग्णांची गर्दी वाढली आहे़ दूषित पाणी पिल्यामुळे या रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे खासगी रूग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले़ यकृतावार सूज आल्यामुळे कावीळची लागण होत असल्याची प्राथमिक माहिती या डॉक्टरांनी दिली़ जीवावर बेतणाऱ्या या आजारापासून सुटका करून घेण्यासाठी सर्वाधिक सोपा उपाय म्हणजे स्वच्छ व निर्जंतुक पाणी पिणे हा आहे़ ग्रामपंचायतीने स्वच्छ पाणी ठेवण्यासंदर्भात खबरदारी घ्यावी तसेच ग्रामस्थांनीही या बाबीला सहकार्य करावे, अशी मागणी तालुक्यातील अनेक गावांतून होत आहे़