शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
3
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
4
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
5
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
6
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
7
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
8
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
9
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
10
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
11
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
12
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
13
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
15
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
16
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
17
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
18
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
19
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली
20
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा परवाना रद्द; ३०० वेळा उल्लंघन करणाऱ्या कंपनीला ठोकलं टाळं

४५६ गावात भूजलात तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:01 IST

यंदाच्या जून महिन्यात केवळ ७ दिवस पाऊस पडला. जुलै महिन्यात थोडी परिस्थिती सुधारली. यात १४ दिवस पावसाची नोंद झाली. पावसाच्या सुरुवातीच्या ६० दिवसांत फक्त २१ दिवस पावसाची नोंद झाली. त्यामुळे दुबार पेरणीसह पिके जगविण्यासाठी भूजलाचा वारेमाप उपसा झाला.

ठळक मुद्देधक्कादायक : उशिरा पाऊस, अमर्याद उपसा, भूजल पुनर्भरणाला फटका

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात पावसाने सरासरी पार केली असली तरी सुरुवातीचे दोन महिन्यांतील खंड, त्यामुळे झालेला अमर्याद पाणी उपसा, त्यानंतर होत असलेले भूजल पुनर्भरणामुळे १३ तालुक्यांतील ४५६ गावांमधील भूजलात १ ते १० फुटांपर्यंत तूट आल्याचा भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल आहे. मात्र, सप्टेंबरनंतर झालेल्या पावसाने जिल्ह्याला दिलासा मिळाला. त्यामुळे पावसाच्या सरासरीत ३० टक्क्यांनी माघारलेला भातकुली तालुका वगळता जिल्ह्यात कुठेही पाणीटंचाई राहणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.यंदाच्या जून महिन्यात केवळ ७ दिवस पाऊस पडला. जुलै महिन्यात थोडी परिस्थिती सुधारली. यात १४ दिवस पावसाची नोंद झाली. पावसाच्या सुरुवातीच्या ६० दिवसांत फक्त २१ दिवस पावसाची नोंद झाली. त्यामुळे दुबार पेरणीसह पिके जगविण्यासाठी भूजलाचा वारेमाप उपसा झाला. त्याचा थेट परिणाम होऊन जिल्ह्याच्या भूजलात कमालीची तूट आली. आॅगस्ट महिन्याच्या अखेरपासून पुन्हा पावसाने जोर पकडला, तो सप्टेंबर अखेरपर्यंत कायम राहिला. त्यामुळे आॅगस्टमध्ये १२ दिवस, तर सप्टेंबर महिन्यात पावसाचे १६ दिवसे राहिलेत. सप्टेंबर महिन्न्यात सरासरीच्या ११४ टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची सरासरी १०९.२ झाली. फक्त आठ तालुक्यांनीच पावसाची सरासरी पार केलेली आहे. यामध्ये सर्वात कमी ७० टक्के भातकुली, अमरावती ९७ टक्के, नांदगाव खंडेश्वर ९६.९, तिवसा ९०.६, व वरूड तालुक्यात ८७ टक्के हे तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहेत.पावसाळा संपल्यानंतर भूजल सर्वेक्षण यंत्रणेद्वारा जिल्ह्यातील नियमित निरीक्षणाच्या १५० व नव्याने स्थापित केलेल्या ९७९ अशा एकुूण ११२९ विहिरींच्या पाणी पातळीच्या नोंदी घेण्यात आल्यात. त्याची जिल्ह्यातील पर्जन्यमान व मागील पाच वर्षांतील पाणी पातळीशी तुलनात्मक अभ्यासाअंती भूजल सर्वेक्षण विभागाने अहवाल तयार केला. यामध्ये जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुका वगळता अन्य १३ तालुक्यांतील ४५६ गावांमधील भूजलात १ ते १० फुटांपर्यंत कमी आलेली असल्याचे निरीक्षण नोंदविले. जिल्ह्यात सर्वाधिक ३० टक्के पावसाची सरासरी कमी आलेल्या भातकुलीत मात्र, यंदा पाणीटंचाईचे चटके जाणवणार आहे. याविषयीचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा शासनाला पाठविण्यात आला आहे. संबंधित विभागाने वेळीच नोंद घेतल्यास भातकुली तालुक्यातील पाणीटंचाई सावरू शकणार आहे.३१७ गावांमध्ये तीन मीटरपर्यंत कमीजिल्ह्यातील ३१७ गावांमध्ये सद्यस्थितीत ३ मीटरपर्यंत भूजलात तूट आलेली आहे. २ ते ३ मीटरपर्यंत ३९ गावांमध्ये व १ ते २ मीटरपर्यंत १०० गावांमध्ये असे एकूण ४५६ गावांमध्ये भूजलात तूट आल्याचे ‘जीएसडीए’चे निरीक्षण आहे. अमरावती व अकोला जिल्ह्यात असलेल्या गाळाचा प्रदेशात प्रामुख्याने ही तूट आलेली आहे. मात्र, पावसाळा पश्चातही झालेल्या पावसाने भूजल पुनर्भरण होत असल्याने जानेवारी महिन्यातील भूजलाच्या नोंदीमध्ये बराच फरक राहणार असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक उल्हास बंड यांनी दिली.चांदूर बाजारला सर्वाधिक तूट, धामणगाव सेफझोनमध्येयंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक म्हणजेच सरासरीच्या १५५ टक्के अधिक पाऊस चांदूर बाजार तालुक्यात झालेला आहे. मात्र, या तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक उपसा झाल्याने पाहिजे त्या प्रमाणात पुनर्भरण झालेले नाही. या तालुक्यातील १५२ गावांमध्ये भूजलात १ मीटरपेक्षा तूट आलेली आहे. त्या तुलनेत अचलपूर तालुक्याने बऱ्याच प्रमाणात तूट भरून काढलेली आहे. या तालुक्यात ३९ गावांमध्ये तूट आहे. अमरावती १६, अंजनगाव सुर्जी ११३, भातकुली ३९, चांदूर रेल्वे ३, चिखलदरा २६, दर्यापूर ३२, धारणी ६, मोर्शी १०, नांदगाव ४, तिवसा ३ व वरुड तालुक्यात १३ गावांमध्ये तूट आहे.भातकुली तालुक्यातील३९ गावांत 'अलर्ट'जिल्ह्यात भातकुली तालुक्यात सरासरीच्या ३० टक्केच पाऊस पडला. त्यामुळे १६ गावांत २ ते ३ मीटरपर्यंत व २३ गावांत १ ते २ मीटरपर्यंत भूजलात तूट आलेली आहे. यामध्ये अफजलपूर, आंचलवाडी, हिम्मतपूर, खारतळेगाव, मार्कंडाबाद, नारायणपूर, निरुळ गंगामाई, पोहरा, रासेगाव, रामा, रुस्तमपूर, संभेगाव, साऊर, थूगाव, उमरटेक, वाठोंडा, आबिदपूर, अळणगाव, बडेगाव, बोकूरखेडा, चांदपूर, दागदाबाद, ढंगारखेडा, हातखेडा, इस्मालपूर, कळमगव्हाण, खोलापूर, मक्रमपूर, मालपूर, मार्की, राईपूर, रसूलपूर, तुळजापूर, उमरपूर आदी गावांचा समावेश आहे.

टॅग्स :Waterपाणी