शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मोठे नुकसान, शेतकरी हळहळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:01 IST

पाऊस तसा शेतकऱ्यांच्या आवडीचा. यावेळी मात्र तो सतत बरसत राहिला. इतका की शेत खरडून गेले, पिके सडून गेली, भाजीपाला नष्ट झाला. पीक उत्तम आहे म्हणून शेतकऱ्यांमध्ये यावेळी आनंद संचारलेला बघता आहे. हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र आहे. तो संततधार असल्यामुळे शेतात तळे साचल्याचे चित्रही कमीअधिक प्रमाणात सर्वत्र दिसले. नेहमीप्रमाणे ऐन तोंडाजवळ आलेला घास पावसाने हिरावला. तात्काळ पंचनाम्यांची गरज आहे.

ठळक मुद्देडोळ्यातही पाणी : पिकांना संजीवनी देणारा पाऊसच मरणयातना देऊन गेला

तो बरसला; पण हिंम्मत देण्याऐवजी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून गेलाअमरावती : पाऊस तसा शेतकऱ्यांच्या आवडीचा. यावेळी मात्र तो सतत बरसत राहिला. इतका की शेत खरडून गेले, पिके सडून गेली, भाजीपाला नष्ट झाला. पीक उत्तम आहे म्हणून शेतकऱ्यांमध्ये यावेळी आनंद संचारलेला बघता आहे. हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र आहे. तो संततधार असल्यामुळे शेतात तळे साचल्याचे चित्रही कमीअधिक प्रमाणात सर्वत्र दिसले. नेहमीप्रमाणे ऐन तोंडाजवळ आलेला घास पावसाने हिरावला. तात्काळ पंचनाम्यांची गरज आहे. तालुक्यांमध्ये भेदभाव न करता जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करवून घेतले तर शंतकºयांना थोडीतरी मदत मिळू शकेल.नदी काठावरील शेती पुराने खरडल्यालोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीला पूर आल्याने नमस्कारी, फत्तेपुर, वरखेड, तारखेड, कौडण्यपूर, शिदवाडी, इसापूर, चांदुर ढोरे, धामंत्री व धारवाडा या गावांतील नदी काठावरील काही शेतीत पुराचे पाणी शिरले. शेतजमीनी पाण्याखाली गेल्या. त्यामुळे शेत जमिनी खरडून गेल्या आहेत.शनिवारी रात्री उशिरा अप्पर वर्धा धरणाचे गेट बंद केल्याने वर्धा नदीचा पूर कमी झाला. मात्र नदी काठावरील शेतीत पुराचे पाणी शिरले असल्याने शेती खरडून गेल्या. प्रशासनाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून नुकसान भरपाई मिळण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.नायगावची १५० हेक्टर शेती पाण्याखालीलोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : चार दिवसांपासून बगाजी सागर धरणाचे पाणी सोडल्यामुळे नदीकाठावरील दीडशे हेक्टरपेक्षा अधिक जमीन पाण्याखाली गेली. सर्वाधिक फटका हा नायगाव येथील शेतकऱ्यांना बसला. या शेताचे अद्यापही सर्वेक्षण झालेले नाही.वर्धा नदीला आलेल्या महापुरामुळे नायगाव, दिघी महल्ले, सोनोरा काकडे, गोकुसरा, आष्टा, विटाळा गावातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. नायगाव येथील अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांची शेतीही वर्धा नदीच्या काठी आहे. महापुरामुळे शेतकऱ्यांची जमीन पूर्णता खरडून गेली आहे. त्यामुळे आमच्या शेतीचे सर्वेक्षण करून मोबदला द्यावा, अशी मागणी या भागातील शेतकरी उमेश शिसोदे, पराग शिसोदे, देवेन्द्र शिसोदे, अमित शिसोदे, रोशन बोंद्रे, सतिष ढेमरें, नामदेव राऊत, प्रमोद शेलार, रवी मोरे, गुलाब महात्मे, विनोद गोरडे यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीfloodपूर