शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

बालगृहांना जुन्याच दराने भोजन अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:36 IST

राज्याच्या महिला व बाल विकास विभागातर्फे सुरू असलेल्या सामान्य बालगृहातील अनाथ बालकांना वाढीव भोजन अनुदान देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाच्या आदेशाला खो : महिला, बाल विकास विभागाकडून अन्याय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या महिला व बाल विकास विभागातर्फे सुरू असलेल्या सामान्य बालगृहातील अनाथ बालकांना वाढीव भोजन अनुदान देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, ७० टक्के भोजन अनुदान हे जुन्याच दराने वितरित केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. महिला व बाल विकास विभागाने अन्याय दूर करावा, अशी मागणी पुढे आली आहे.बालगृहातील अनाथ बालकांच्या भोजन अनुदानात वाढ करावी, असे आदेश एप्रिल २०१७ पासून उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, अद्यापही या आदेशाची अंमलबाजवणी करण्यात आली नाही, अशी तक्रार महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे बालगृहचालकांनी केली आहे. राज्यात ७०० संस्थात १४ हजार काळजी व संरक्षणाची गरज असलेली मुले राज्यपाल नियुक्त प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी दर्जा प्राप्त बाल कल्याण समितींकडून दाखल आहेत. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ नुसार आदेशित बालकांच्या पालनपोषणाची जबाबदारी राज्य शासनाची निर्धारित केली आहे.अल्प अनुदानामुळे स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जाणाºया बालगृहांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बालकांना पुरविल्या जाणाºया सोयी-सुविधांची अडचण लक्षात घेता उच्च न्यायालयाने दाखल याचिकेवर सुनावणी करताना बालकांच्या परिपोषणासाठी गतिमंदाच्या बालगृहांना १ एप्रिल २०१७ पासून प्रतीबालक दरमहा २५०० रुपये, तर सामान्य बालकांच्या बालगृहांना दरमहा प्रतिबालक २००० रुपये अनुदान देण्याबरोबरच या बालकांच्या आरोग्यसाठी विशेष तरतूद करण्याचे आदेश शासनाला दिले आहेत.बालगृहे चालवायचे कसे ?वाढत्या महागाईमुळे बालकांच्या पोषणाचा प्रश्न बिकट झाला आहे. अशातच शासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही. आठ महिन्यांचा कालावधी लोटला असताना वाढीव अनुदान मिळाले नाही. जुन्या दराने ७० टक्के अनुदान वितरित करण्यात आल्याने स्वयंसेवी बालगृहचालकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असल्याचे प्रज्ञा बालगृहाचे चालक राजेंद्र पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.