शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

८४० ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा वर्षभरापासून लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:15 IST

अमरावती : राज्यात कोरोनाची लाट येताच ग्रामपंचायतींनी ग्रामसभा स्थगित करण्यात येत असल्याचे आदेश १२ मे २०२० रोजी ग्रामविकास ...

अमरावती : राज्यात कोरोनाची लाट येताच ग्रामपंचायतींनी ग्रामसभा स्थगित करण्यात येत असल्याचे आदेश १२ मे २०२० रोजी ग्रामविकास विभागाने काढले होते. सध्या कोरोनाचा कहर वाढतच असल्याने अद्यापही ग्रामसभा घेण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. परिणामी जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा गत वर्षभरापासून न झाल्याने गावाच्या विकासाचा वेग मंदावला आहे. अनेक योजनांच्या लाभार्थ्यांची निवड खोळंबली आहे, तर आराखडा मंजूर होऊन लांबणीवर पडला आहे.

शासन निर्णयानुसार आर्थिक वर्षात किमान चार ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. परंतु कोरोना साथीमुळे आर्थिक वर्ष संपत आले तरी एकही ग्रामसभा होऊ शकल्या नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणाऱ्या विकासकामांना खीळ बसली आहे. लाभार्थी निवड खोळंबली १ मे रोजीच्या ग्रामसभेत प्रशासनाकडून अहवाल वाचन होते. याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांच्या लाभार्थ्यांची निवड केली जाते. ही ग्रामसभा होऊ न शकल्याने प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेचे लाभार्थी निवडता आलेले नाही. रोजगार हमीचा आराखडा मासिक बैठकीत १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत मंजूर केला जातो. पण, ही ग्रामसभा झालीच नाही. योजनेतून गावात कोठे - कोठे विकास कामे करायची यावर चर्चा होऊ शकली नाही. पंचायत समितीकडे हा आराखडा सादर करावयाचा असल्याने सदस्यांच्या मासिक बैठकीत तो मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामपंचायतीत विरोधात असलेल्या सदस्यांच्या प्रभागातील कामे डावलण्यात आल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीदिनी आयोजित ग्रामसभेत १५ व्या वित्त आयोगाचा सुधारित आराखडा मंजूर केला जातो. हा आराखडा मंजूर करताना ग्रामसभेत सखोल चर्चा होते. विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून सुधारित आराखडा मंजूर केला जातो. परंतु ही ग्रामसभा सुद्धा होऊ शकली नाही. त्यानंतर २६ जानेवारीची ग्रामसभा होईल, असे वाटले होते. मात्र, तीही रखडली सध्या कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. जिल्ह्यात आठशेच्यावर दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. शासनाने ग्रामसभाबाबत कोणतेच आदेश काढले नाहीत. मार्च, महिनाही त्यातच गेला. शासकीय आर्थिक वर्ष एप्रिल महिन्यात सुरू झालेले आहे. यामुळे गेले वर्षभर एकही ग्रामसभा झालीच नाही. याचा परिणाम विकासकामावर झाला आहे.

बॉक्स

पदाधिकारी म्हणतील तीच पूर्व दिशा....

गावाच्या विकासासाठी कोणती योजना कुठे घ्यायची? लाभार्थी कुठली निवडायचे, विकासकामे प्राधान्याने कुठली घ्यायची, याबाबत ग्रामसभेत नेहमी चर्चा व्हायची. काहीवेळा ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांच्यात मतभेद व्हायचे. आता ग्रामसभा न झाल्याने सरपंच, उपसरपंच व सदस्य म्हणेल तीच पूर्वदिशा अशी स्थिती निर्माण झाली आहे.

बॉक्स

तालुकानिहाय ग्रामपंचायत संख्या

अचलपूर ७१, चांदूर रेल्वे ४९, मोर्शी ६७, धामणगाव रेल्वे ६२, वरूड ६६, धारणी ६२, दर्यापूर ७४, अंजनगाव सुर्जी ४९, नांदगाव खंडेश्र्वर ६८, चांदूर बाजार ६६, तिवसा ४५, अमरावती ५९, भातकुली ४८, चिखलदरा तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.