शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

ग्रामपंचायतींना मिळणार ५० कोटी

By admin | Updated: December 13, 2015 00:10 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया असलेल्या ग्रामपंचायतींना १४ व्या केंद्रीय वित्त आयोगामुळे भक्कम बनत आहे. पहिल्या टप्प्यात ...

१४ व्या वित्त आयोग : मार्गदर्शक तत्त्वाअभावी निधी पडूनअमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया असलेल्या ग्रामपंचायतींना १४ व्या केंद्रीय वित्त आयोगामुळे भक्कम बनत आहे. पहिल्या टप्प्यात २५ कोटी २१ लाख ४८ हजार रुपयांचा निधी आल्यानंतर पुन्हा जनरल बेसिक ग्रँडच्या स्वरुपातील दुसरा हप्ताही २५ कोटी २१ लाख ४८ हजार रुपयांचा मिळाला आहे. मात्र निधी खर्च करण्यासाठी मार्गदर्शक तत्वेच बनविली नसल्याने हा निधी खात्यावर पडून आहे. १४ व्या केंद्रीय वित्त आयोगातून आता ग्रामपंचायतींना थेट निधी मिळत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत ग्रामपंचायतींना सर्वाधिक महत्व प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांपेक्षा ग्रामपंचायती आर्थिक सक्षम बनण्याकडे वाटचाल सुरू आहे. हा आयोग जाहीर झाल्यानंतर पहिल्या हप्त्यात राज्यासाठी आठशे अकरा कोटींचा निधी आला. त्यामधील २५ कोटी २१ लाख ४८ हजार रुपयांचा निधी अमरावती जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या ८३९ ग्रामपंचायतीसाठी प्राप्त झाला तो निधी खर्च करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे राज्य शासनाने दिली नसल्याने तो निधी खात्यावर पडून आहे. मागील आठवड्यात राज्य शासनाने कार्यासन अधिकारी एस. आर. वासुदेव यांनी नव्याने अध्यादेश काढला आहे. त्यानुसार अमरावती जिल्हा परिषदेला यावेळीही २५ कोटी २१ लाख ४८ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अर्थसंकल्पीय विवरण प्रणालीमध्ये (बीम्स) निधी प्राप्त झाल्यानंतर तो तत्काळ कोषागार कार्यालयात काढून १४ व्या वित्त आयोगाच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यावर जमा करायचा आहे. निधीचे विवरण निधीच्या विनीयोगाबाबतची मार्गदर्शक तत्वे वितरीत निधीतून घ्यावयाची कामे यासंदर्भातील सविस्तर मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे निर्गमित केल्यानंतरच हा निधी ग्रामपंचायतींना खर्च करता येणार आहे. त्यासाठी गावचा ग्रामपंचायत विकास आराखडाही बनवावा लागणार आहे. (प्रतिनिधी)