शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

ग्रामपंचायतींना मिळणार ५० कोटी

By admin | Updated: December 13, 2015 00:10 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया असलेल्या ग्रामपंचायतींना १४ व्या केंद्रीय वित्त आयोगामुळे भक्कम बनत आहे. पहिल्या टप्प्यात ...

१४ व्या वित्त आयोग : मार्गदर्शक तत्त्वाअभावी निधी पडूनअमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया असलेल्या ग्रामपंचायतींना १४ व्या केंद्रीय वित्त आयोगामुळे भक्कम बनत आहे. पहिल्या टप्प्यात २५ कोटी २१ लाख ४८ हजार रुपयांचा निधी आल्यानंतर पुन्हा जनरल बेसिक ग्रँडच्या स्वरुपातील दुसरा हप्ताही २५ कोटी २१ लाख ४८ हजार रुपयांचा मिळाला आहे. मात्र निधी खर्च करण्यासाठी मार्गदर्शक तत्वेच बनविली नसल्याने हा निधी खात्यावर पडून आहे. १४ व्या केंद्रीय वित्त आयोगातून आता ग्रामपंचायतींना थेट निधी मिळत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत ग्रामपंचायतींना सर्वाधिक महत्व प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांपेक्षा ग्रामपंचायती आर्थिक सक्षम बनण्याकडे वाटचाल सुरू आहे. हा आयोग जाहीर झाल्यानंतर पहिल्या हप्त्यात राज्यासाठी आठशे अकरा कोटींचा निधी आला. त्यामधील २५ कोटी २१ लाख ४८ हजार रुपयांचा निधी अमरावती जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या ८३९ ग्रामपंचायतीसाठी प्राप्त झाला तो निधी खर्च करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे राज्य शासनाने दिली नसल्याने तो निधी खात्यावर पडून आहे. मागील आठवड्यात राज्य शासनाने कार्यासन अधिकारी एस. आर. वासुदेव यांनी नव्याने अध्यादेश काढला आहे. त्यानुसार अमरावती जिल्हा परिषदेला यावेळीही २५ कोटी २१ लाख ४८ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अर्थसंकल्पीय विवरण प्रणालीमध्ये (बीम्स) निधी प्राप्त झाल्यानंतर तो तत्काळ कोषागार कार्यालयात काढून १४ व्या वित्त आयोगाच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यावर जमा करायचा आहे. निधीचे विवरण निधीच्या विनीयोगाबाबतची मार्गदर्शक तत्वे वितरीत निधीतून घ्यावयाची कामे यासंदर्भातील सविस्तर मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे निर्गमित केल्यानंतरच हा निधी ग्रामपंचायतींना खर्च करता येणार आहे. त्यासाठी गावचा ग्रामपंचायत विकास आराखडाही बनवावा लागणार आहे. (प्रतिनिधी)