शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकनाचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:23 IST

अमरावती : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी मान्यताप्राप्त संस्थाकडून ऑडिट करून घ्यावे, असे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढला आहे. ...

अमरावती : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी मान्यताप्राप्त संस्थाकडून ऑडिट करून घ्यावे, असे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढला आहे. त्यामुळे गरज नसताना आणि इच्छा नसतानाही आता ग्रामपंचायतींना यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. तसेच तीन वर्षे चालणाऱ्या या ऑडिटसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला २१ हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.

ग्रामपंचायतीत स्वायत्त संस्था आहे. तसेच गावातील गावकरऱ्यांच्या हितासाठी ग्रामपंचायत काम करीत असते. शासनाच्या अनेक योजना गावात यशस्वीपणे राबविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर आहे. त्यामुळे शासनाने सर्वसामान्य जनता यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून ग्रामपंचायत काम करीत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत करीत असलेल्या कामात पारदर्शकता आहे का? त्यावर नागरिक समाधानी आहेत का, त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना योग्य माहिती मिळते का, तसे त्यांनी सर्व कामकाजात शासनाने घालून दिलेल्या अटी आणि नियम आणि गुणवत्ता जपली जाते आहे का, याची तपासणी करून प्रमाणीकरण केले जाते. यापूर्वी जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी आयएसओ प्रमाणपत्र मिळविले आहे. तसेच उर्वरित ग्रामपंचायतीने हे ऑडिट करून घ्यावे, असे आवाहन शासनाने केले आहे. ग्रामपंचायतीची आयएसओ प्रमाणीकरणासाठी शासन स्तरावर मान्यता असलेल्या गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली दस्तऐवज कॉलिटी मॅनेजमेंट सिस्टम डॉक्युमेंटनुसार आवश्यक ते बदल करणे व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यासाठी आता ग्रामसेवकांनी लॉगिन आयडी नोंदणी करणे अपेक्षित आहे. संगणक प्रणालीवर जिल्हानिहाय एकूण दहा टक्के किंवा शंभरपैकी जी संख्या कमी असेल तेवढी संख्या प्राप्त झाल्यानंतर संगणक कडून कार्यारंभ आदेश तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर आणि त्याचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण झाल्यानंतर संगणक प्रणालीवर त्या त्या टप्प्यात तयार करून ग्रामसेवकांना पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर ज्यांनी आयएएस व प्रमाणीकरण संस्थेकडूनप्रमाणपत्र मिळाल्यानंतर संबंधित संस्थेला त्याची रक्कम अदा करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने दिले आहे आहे.

बॉक्स

२१ हजार रुपयांचा भार

सर्विलस ऑडिटसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला यासाठी २१ हजार रुपये मोजावे लागणार आहे. याचे पहिल्या वर्षासाठी जीएसटीसह ७४३४, व्दितीय वर्षासाठी ७४३४ आणि तृतीय वर्षासाठी ९९१२ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे ऑडीट करणे गरजेचे आहे का तसे त्याचा उपयोग काय असा सवाल आता ग्रामपंचायतींकडून उपस्थित केला जात आहे.