शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दोन तपापासून 'आदिवासी गोवारी'ची झोळी रिकामीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 10:47 IST

१५ एप्रिल १९९५ रोजी शासनाने आदेश काढून गोवारी जमातीला सवलतीपासून वंचित ठेवले. यादरम्यान २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या मोर्चात ११४ निष्पाप गोवारीचा बळी गेला.

ठळक मुद्देआज शहीद गोवारी स्मृतिदिनचार पिढ्या आरक्षणासाठी गारद

मोहन राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : स्वातंत्र्यपूर्व काळापासून आदिवासी असताना शासनाने चुकीचे अध्यादेश काढले. त्यात राजकीय अनास्थेसोबतच लालफीतशाहीच्या खेळात ११४ गोवारींचा बळी गेला. एका न्यायालयाने आदिवासी ठरविले, मात्र दुसऱ्या न्यायालयाने पुन्हा वेगळा निर्णय दिल्याने आता राज्यातील या आदिवासी गोवारींनी राष्ट्रपतींना साकडे घातले आहे.

आदिवासी गोवारी समाज हा विदर्भात मोठ्या संख्येने आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून या जमातीला आदिवासींच्या सवलती मिळत असताना १५ एप्रिल १९९५ रोजी शासनाने आदेश काढून गोवारी जमातीला सवलतीपासून वंचित ठेवले. यादरम्यान २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या मोर्चात ११४ निष्पाप गोवारीचा बळी गेला. तद्नंतर या जमातीला आदिवासींच्या सवलतींपासून वंचित ठेवत विशेष मागास प्रवर्गाच्या सवलती देण्यात आल्या. मात्र, या जमातीला सवलतीचा लाभ झाला नाही.

औटघटकेचे मिळाले आरक्षण

आदिवासी गोवारी हे आदिवासी असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयांच्या नागपूर खंडपीठाने १४ ऑगस्ट २०१८ मध्ये दिला. ही जमात खऱ्या अर्थाने समाजप्रवाहात येत असताना राज्य शासनाच्या आदिवासी विभागाने उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने गोवारी आदिवासी नसल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे गोवारी जमात पुन्हा सवलती पासून वंचित झाली आहे.

हातात घेतलेय आता तीर अन् कमान

आमची आदिवासींची संस्कृती आहे, हे आम्ही न्यायालयाला सिद्ध करून दाखविले. सवलतींसाठी तीन पिढ्या गारद झाल्या. नेहमी सवलतीत राजकरण आडवे येते आणि आम्हाला वंचित ठेवले जाते. त्यामुळे थेट राष्ट्रपती भवना समोर उपोषणाचा इशारा या जमातीतील युवा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

राज्य शासनातील आदिवासी आमदार विधानसभा मतदार संघातून आमच्या मतावर निवडून येतात. मात्र, आम्ही आदिवासी असताना आम्हाला विरोध करतात. हा कुठला न्याय आहे? पुढील महिन्यात राष्ट्रपती भवनासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा आमचा निर्धार आहे.

- नंदू सहारे, प्रदेशाध्यक्ष, आदिवासी गोवारी युवा शक्ती संघ, अमरावती

टॅग्स :Socialसामाजिक