शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजलसाठी १९६.९२ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 15:57 IST

शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नव्याने २५ पाणीपुरवठा योजनेकरिता १९६ कोटी ९२ लाख रूपये मंजूर केले आहे.

ठळक मुद्दे२५ नवीन पाणीपुरवठा योजनाराज्यात १,००३ पाणीपुरवठा योजना राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात भूजलस्तरात घट झाली आहे. भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, मराठवाडा, विदर्भातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ही दाहकता लक्षात घेत शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नव्याने २५ पाणीपुरवठा योजनेकरिता १९६ कोटी ९२ लाख रूपये मंजूर केले आहे.पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ग्रामीण पाणीपुरवठा क्षेत्रात सुधारणा करण्याच्या उद्देशाने व ग्रामीण जनतेस स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबविला जात आहे. यात एकूण १,००३ नळ पाणीपुरवठा योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, १७ जानेवारी २०१८ रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून २६२ कोटी ६३ लाख ४४ हजार रूपये किमतीच्या ११९ पाणीपुरवठा योजना वगळण्यात आल्या आहेत. या ११९ पाणीपुरवठा योजना अन्य कार्यक्रमांतर्गत घेण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. नव्याने २५ ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय झाला असला तरी कायम पाण्याचे स्त्रोत न तपासता पाणीपुरवठा योजना राबविली जाणार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरवर्षी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवर हजारो कोेटी रूपये खर्च होत असताना पाण्याची समस्या दूर होत नाही, हे वास्तव आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबविण्यापूर्वी कायम पाण्याचे स्त्रोत निवडले जात नाही. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता समितीमार्फत ही योजना राबविली जात असल्यामुळे त्यावर खर्च होणारा निधी व्यर्थ ठरत असल्याचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लेखा परीक्षणातून यापूर्वी स्पष्ट झाले आहे.येथे राबविणार नवीन पाणीपुरवठा योजनाजालना जिल्ह्यातील मंठा, परतूर, खेडगाव व जालना तालुक्यातील ९२ गावांचा ग्रीड पाणीपुरवठा योजनेत समावेश आहे. परभणी जिल्ह्यातील पालम व गंगाखेड तालुक्यातील ६५ गावे ग्रीड पाणीपुरवठा योजनेत आहेत. बीड जिल्ह्यातील दिंद्रुड, औरंगाबादच्या सावरखेड, लातूरचे तळणी तर सांगली जिल्ह्यातील येलूर, नायगाव, शिरगाव, पडवळवाडी, शेखरवाडी, कोळे ही गावे समाविष्ट केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद, उमळवाड, घालवाल, बुबनाळ, राक्षी, धबधबेवाडी, निकमवाडी, पिंपळे, सातवे, जाफळे, कणेरी, शेंबवणे, मानोली, सावर्डे खु., परखंदळे, जाधववाडी, येलूर या गावांचा समावेश आहे.

टॅग्स :Waterपाणी