शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

सरकारने अनाथ, एकल बालकांचा निधी रोखला; यशोमती ठाकूर यांचे सरकारवर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2022 11:39 IST

बाकीच्या गोष्टी या सरकारला चालतात आणि ज्यांना कुणी नाही त्यांच्यासाठी हे सरकार निर्दयीपणे निर्णय घेत आहे, असे ठाकूर म्हणाल्या.

अमरावती : राज्याच्या ‘ईडी’ सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा सपाटा चालविला आहे. एवढेच नव्हे तर अनाथ, एकल बालकांचा निधी रोखणारे हे ‘ईडी’ सरकार निर्दयी असल्याचे सांगत महिला व बाल विकास विभागाच्या माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या आहेत. ॲड. ठाकुरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ना. मंगलप्रभात लोढांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

ईडी सरकारने महाविकास आघाडीचे सर्व निर्णय बदलण्याचा सपाटा लावला आहे. काही निर्णय त्यांच्या फायद्यासाठी बदलून घेतले. मात्र, जिथे अनाथ बालकांचा, एकल महिलांचा, दोन्ही पालक गमावलेल्या मुलांच्या हितासाठी घेतलेला निर्णय हे सरकार कसे काय बदलू शकते. सरकारमधील ही लोक असंवेदनशील आहेत. एका बांधकाम व्यावसायिकाला महिला व बाल कल्याण विभागाचा मंत्री केले आहे. त्याला फक्त काँक्रीट जंगल बांधता येते, त्यांची हृदय देखील काँक्रीट आहेत. अर्थ खात्याने देखील यावर नकारात्मक शेरा दिला आहे. या सर्व बाबींचा निषेध माजी मंत्री ॲड. ठाकूर यांनी केला आहे.

बाल संगोपनासाठी प्रत्येक लाभार्थीला दरमहा दोन हजार ५०० रुपये मिळावेत, यासाठी महिला व बाल विकास मंत्री म्हणून मी पाठपुरावा केला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली होती. बाकीच्या गोष्टी या सरकारला चालतात आणि ज्यांना कुणी नाही त्यांच्यासाठी हे सरकार निर्दयीपणे निर्णय घेत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती, अशी प्रतिक्रिया ॲड. यशोमती ठाकूर दिली.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढाPoliticsराजकारण