शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला मिळणार स्वायत्त संस्थेचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 13:31 IST

Amravati News येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेची शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने ‘व्हीएमव्ही’ला स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्याचे निश्चित केले आहे.

ठळक मुद्देयूजीसीच्या सहा सदस्यीय चमुकडून परीक्षणशताब्दी महोत्सवानिमित्त संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेची शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने ‘व्हीएमव्ही’ला स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्याचे निश्चित केले आहे. केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाची सहा सदस्यीय चमू १५ व १६ जानेवारी रोजी असे दोन दिवस संस्थेचे परीक्षण करणार आहे.

गुजरात येथील सरदार पटेल विद्यापीठ वल्लभ विद्यानगर येथील कुलगुरू शिरीश कुलकर्णी हे परीक्षण समितीचे अध्यक्ष आहेत. सदस्य दिल्ली विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख पारेख सिंह, जयपूर येथील प्राचार्य के.बी. शर्मा, विद्यापीठ नामीत सदस्य प्राचार्य के,के. देबनाथ, राज्य शासनाचे प्रतिनिधी उच्च शिक्षण सहसंचालक केशव तुपे, समन्वयक अधिकारी म्हणून अनुराग हे असणार आहे.

ऑगस्ट १९२३ मध्ये स्थापन झालेली किंग एडवर्ड कॉलेज, त्यानंतर विदर्भ महाविद्यालय आणि सन २००८ पासून शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था असा प्रवास आहे. ब्रिटिशकालीन वारसा लाभलेल्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला आता स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळणार असल्याने अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी ही बाब गौरवास्पद ठरणारी आहे. १५० प्राध्यापक, पाच हजार विद्यार्थी आणि २३ पदव्युत्तर विभागात संशोधन केंद्र असलेले हे राज्यातील एकमात्र शैक्षणिक संस्था आहे. यूजीसीद्धारा गठित चमुकडून या संस्थेला स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळण्यासाठी परीक्षण करण्यात येणार आहे. त्यानुसार संस्थेने जय्यत तयारी केली आहे. या चमूच्या परीक्षणानंतर ‘व्हीएमव्ही’ला सन २०२२-२३ पासून ‘एटॉनॉमस‘ दर्जा मिळेल, असे चित्र आहे.

भारतरत्न, पद्मश्रींचेही संस्थेत योगदान

शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेने राजकीय, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा, सामाजिक व संशोधन क्षेत्रात ठसा उमटविणारी व्यक्ती घडविले आहे. वामन विष्णू मिरासी यांना संस्कृतमध्ये अतुलनीय कामगिरीबाबत भारतरत्न तर, वि.भा. कोलते यांना पद्मश्रीने गौरविले गेले आहे. मिरासी व काेलते या दोघांनीही ‘व्हीएमव्ही’चे प्राचार्य पद भूषविले आहे. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हेसुद्धा याच संस्थेचे विद्यार्थी आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र