शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला मिळणार स्वायत्त संस्थेचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 13:31 IST

Amravati News येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेची शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने ‘व्हीएमव्ही’ला स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्याचे निश्चित केले आहे.

ठळक मुद्देयूजीसीच्या सहा सदस्यीय चमुकडून परीक्षणशताब्दी महोत्सवानिमित्त संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेची शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने ‘व्हीएमव्ही’ला स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्याचे निश्चित केले आहे. केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाची सहा सदस्यीय चमू १५ व १६ जानेवारी रोजी असे दोन दिवस संस्थेचे परीक्षण करणार आहे.

गुजरात येथील सरदार पटेल विद्यापीठ वल्लभ विद्यानगर येथील कुलगुरू शिरीश कुलकर्णी हे परीक्षण समितीचे अध्यक्ष आहेत. सदस्य दिल्ली विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख पारेख सिंह, जयपूर येथील प्राचार्य के.बी. शर्मा, विद्यापीठ नामीत सदस्य प्राचार्य के,के. देबनाथ, राज्य शासनाचे प्रतिनिधी उच्च शिक्षण सहसंचालक केशव तुपे, समन्वयक अधिकारी म्हणून अनुराग हे असणार आहे.

ऑगस्ट १९२३ मध्ये स्थापन झालेली किंग एडवर्ड कॉलेज, त्यानंतर विदर्भ महाविद्यालय आणि सन २००८ पासून शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था असा प्रवास आहे. ब्रिटिशकालीन वारसा लाभलेल्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला आता स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळणार असल्याने अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी ही बाब गौरवास्पद ठरणारी आहे. १५० प्राध्यापक, पाच हजार विद्यार्थी आणि २३ पदव्युत्तर विभागात संशोधन केंद्र असलेले हे राज्यातील एकमात्र शैक्षणिक संस्था आहे. यूजीसीद्धारा गठित चमुकडून या संस्थेला स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळण्यासाठी परीक्षण करण्यात येणार आहे. त्यानुसार संस्थेने जय्यत तयारी केली आहे. या चमूच्या परीक्षणानंतर ‘व्हीएमव्ही’ला सन २०२२-२३ पासून ‘एटॉनॉमस‘ दर्जा मिळेल, असे चित्र आहे.

भारतरत्न, पद्मश्रींचेही संस्थेत योगदान

शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेने राजकीय, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा, सामाजिक व संशोधन क्षेत्रात ठसा उमटविणारी व्यक्ती घडविले आहे. वामन विष्णू मिरासी यांना संस्कृतमध्ये अतुलनीय कामगिरीबाबत भारतरत्न तर, वि.भा. कोलते यांना पद्मश्रीने गौरविले गेले आहे. मिरासी व काेलते या दोघांनीही ‘व्हीएमव्ही’चे प्राचार्य पद भूषविले आहे. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हेसुद्धा याच संस्थेचे विद्यार्थी आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र