शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शासनाने २ मेपासून शाळांना उन्हाळी सुटी जाहीर करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:11 IST

अमरावती : कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता, दिल्ली सरकारने २० एप्रिल ते ९ जून २०२१ या कालावधीत शाळांना उन्हाळी ...

अमरावती : कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता, दिल्ली सरकारने २० एप्रिल ते ९ जून २०२१ या कालावधीत शाळांना उन्हाळी सुटी जाहीर केली. याच धर्तीवर राज्य शासनाने शालेय वर्ष समाप्त झाल्याचे घोषित करून ऑनलाईन अध्यापन बंद करावे, सुटीबाबचे आदेश जारी करावे आणि विद्यार्थी, शिक्षकांना २ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करावी, अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षक समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

कोविड-१९ महामारीमुळे मार्च २०२० पासून शाळांना सुट्टी जाहीर केल्याने शालेय अध्यापन बंद आहे. मात्र, मे २०२० पासून शासनाने ऑनलाईन अध्यापनाचे आदेश जारी केले आहे. त्यामुळे मे २०२० पासून २५ जूनपर्यंत उन्हाळी सुटी असूनही शिक्षक ऑनलाईन अध्यापन करीत होते. त्यानंतर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून आजतागायत ऑनलाईन अध्यापन सुरूच आहे. कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनानेच सुरुवातीला पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट वर्गोन्नती देण्याचे जाहीर केले. त्यानंतर नववी ते अकरावीबाबतही परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला, तर २० ए्‌प्रिल २०२१ रोजी शिक्षणमंत्र्यांनी इयत्ता दहावीची परीक्षाही रद्द केल्याचे सांगितले. दरवर्षी शालेय वर्षातील अध्यापन समाप्ती मार्चअखेर होऊन एप्रिलमध्ये परीक्षा घेण्यात येतात आणि विद्यार्थी, शिक्षक यांना अध्ययन, अध्यापनातून सुटी मिळते. मात्र, अजूनही उन्हाळी सुटीबाबत निर्णय झाला नाही.

-----------------

बॉक्स

गणपती, दिवाळी, नाताळच्या सुटीतही ऑनलाईन वर्ग

भ्रमणध्वनी किंवा संगणकावर अध्ययन, अध्यापन केल्याने मानेचे त्रासही उद्भवू लागले आहेत तसेच मुलांनाही मोबाईलवरील सततच्या अध्ययनामुळे त्रास होत असल्याबाबत पालकांची तक्रार आहे. मुलेही गेल्या वर्षभरापासून ऑनलाईन क्लास व कोरोनामुळे घरात कोंडून असल्याने पालकांनाही त्यांच्या मूळ गावी जाण्याचे नियोजन करायचे आहे. म्हणून राज्य शासनाने २ मे पासून शाळांना सुटी घोषित करावी, असेही शिक्षक समितीचे प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी म्हटले आहे.