शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

सरकारची पोलखोल

By admin | Updated: October 29, 2015 00:34 IST

राज्यात सतेवर येऊन कारभाराची सूत्रे स्वीकारल्यानंतर जनतेला ‘अच्छे दिन’चे आमिष दाखवणाऱ्या भाजप सरकारमुळे जनतेला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल आंदोलन : महागाईविरोधात जिल्हा कचेरीवर थाळीनादअमरावती : राज्यात सतेवर येऊन कारभाराची सूत्रे स्वीकारल्यानंतर जनतेला ‘अच्छे दिन’चे आमिष दाखवणाऱ्या भाजप सरकारमुळे जनतेला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दुष्काळामुळे होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यातही सरकार अपयशी ठरले आहे. भाजपा सरकारने कधी नव्हे एवढी महागाई सर्वसामान्य जनतेवर लादली आहे. त्यामुळे डाळीसह जीवनावश्यक वस्तुंचे दर कमी करूण स्वस्त दरात धान्य वितरण व्यवस्था सुरू करावी , आदी मागण्यांसाठी यासाठी बुधवारी राकाँद्वारे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. राकाँचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर हे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांना निवेदन देण्यात आले. केंद्र आणि राज्यात सत्तेत येताच गरीब, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लाऊन त्यांना महागाईच्या खाईत शासनाने लोटले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर जनतेचे आर्थिक बजेट महागाईमुळे कोलमडले आहे. शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर कोसळलेले संकट फारच मोठे आहे, असे असताना सुध्दा भाजप शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस धोरण राबविले नाही. परिणामी सामान्य जनता आणि शेतकऱ्यांवर असह्य ताण येत आहे. इंधनाचे भाव कमी झाले असले तरी जीवनावश्यक वस्तुंच्या भावावर फारसा फरक पडलेला नाही. केंद्र आणि राज्य सरकार यासर्व प्रश्नांचे निराकरण करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपा शासनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल आंदोलन केले. आंदोलनात आ. प्रकाश गजभिये, राकाँचे वसंत घुईखेडकर, जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहराध्यक्ष राजेश शिरभाते, विनय कडू, गणेश रॉय, भास्कर ठाकरे, सुनील काळे, नितीन शेरेकर, निलिमा महल्ले, मेघा हरणे, सपना ठाकूर, वृषाली विघे, ऋषीकेश वैद्य, गजानन रेवाळकर, विनय कडू, सुशील गावंडे, प्रणव ओकटे, नंदु वऱ्हाडे, राजीक भाई,यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, पदाधिकारी, विविध आघाडयांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.