शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

सरकारला भयअन्नदात्याचे

By admin | Updated: June 8, 2017 00:01 IST

महाराष्ट्रात ‘न भूतो न भविष्यती’ असे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आठवडा उलटला असला तरी आंदोलनाची धार बोथट झालेली नाही.

गनिमीकाव्याचा धसका : लोकप्रतिनिधींना सुरक्षाअमरावती : महाराष्ट्रात ‘न भूतो न भविष्यती’ असे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आठवडा उलटला असला तरी आंदोलनाची धार बोथट झालेली नाही. उलट ती अधिकाधिक तीव्र होतेय. पोशिंद्याची एकजूट अन् उग्र भावनांचा धसका आता शासनाने घेतला असून लोकप्रतिनिधींनाच संरक्षणाची गरज भासते आहे. वैशिष्ट्यपूर्ण आंदोलनांची श्रुंखला पोलिसांसाठी देखील डोकेदुखी ठरली आहे. ग्रामीण भागातील हे लोण शहरी भागापर्यंत पोहोचले असून पालकमंत्र्यांसह आमदार, खासदारांच्या निवास्थानांभोवती पडलेल्या पोलिसांच्या गराड्यावरून आंदोलनाची तीव्रता लक्षात येते. नामदार, खासदार, आमदारांच्या निवासस्थानी खडा पहाराशेतकरी बदलणार रणनितीआज मोबाईल टॉवर ‘टार्गेट’लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा धसका घेत बुधवारी पालकमंत्र्यांसह आमदार व खासदारांच्या निवासस्थानी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. यामध्ये आठ पोलीस अधिकाऱ्यांसह तब्बल ५० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या धसक्यामुळे पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली असून आंदोलनकर्ते दररोज अधिकाधिक आक्रमक होत असल्याने पोलिसांवरील दबाव वाढला आहे. बुधवारी आमदार व खासदारांच्या निवासस्थांसमोर आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. त्यामुळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर तैनात करण्यात आला होता. गुरूवारी आंदोलक शेतकरी शेतांमधील ‘मोबाईल टॉवर्स’ लक्ष्य करणार असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी टॉवर्सबद्दलची माहिती महापालिकेकडून मागविण्याचे काम सुरू केले आहे. बुधवारपासून शहरात पोलीस अलर्ट झाले आहेत. ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आमदार व खासदारांची निवासस्थाने आहेत. तेथे त्या-त्या ठाण्यातील पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या राठीनगरातील निवासस्थानी तसेच त्यांच्या कॅम्प मार्गावरील जनसंपर्क कार्यालयात गाडगेनगर ठाण्यातील एक अधिकारी व १० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्याचप्रमाणे खा. आनंदराव अडसूळ यांचे नवसारी मार्गावरील निवासस्थान, आ.अनिल बोंडे यांचे राजापेठस्थित निवासस्थान, आ. सुनील देशमुख यांचे रूख्मिणीनगरातील निवासस्थान, आ. रवि राणा यांचे शंकरनगरातील घर, गणेडीवाल ले-आऊटमधील आ. यशोमती ठाकूर यांचे घर तसेच आ. श्रीकांत देशपांडे यांच्या निवासस्थानी, प्रत्येकी एक अधिकारी व पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त बुधवारी लावण्यात आला होता. मात्र, सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरात शेतकऱ्यांचे आंदोलन झाल्याची वार्ता नव्हती. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता बघून लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. - अनिल कुरुळकर, पीआय, विशेष शाखा.