शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार नापास

By admin | Updated: March 8, 2016 00:08 IST

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्यानंतरही शासन मात्र कोणताही ठोस निर्णय घेत नाही.

यशोमती ठाकूर यांचा आरोप : विकासकामांना प्रारंभतिवसा : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्यानंतरही शासन मात्र कोणताही ठोस निर्णय घेत नाही. हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. पण आम्ही मात्र शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेसोबत आहोत, असे प्रतिपादन आ. यशोमती ठाकूर यांनी केले. खोलापूर, भातकुली येथील विकास कामांच्या शुभारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी मुकद्दर खाँ पठाण होते. व्यासपीठावर सरिता मकेश्वर, जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, इंदुताई कडू, आशुतोष देशमुख, गिरीश देशमुख, विजय मकेश्वर, नईम, वाहीदभाई, काजीमभाई, गफ्फार शहा, नरेंद्र मकेश्वर, मुरादभाई उपस्थित होते. यावेळी खारतळेगाव, खोलापूर, वाठोडा शुक्लेश्वर येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. आ. यशोमती ठाकूर पुढे बोलताना म्हणाल्या की, विकासासाठी समन्वय आणि एकवाक्यता असायला हवी. ग्रामीण भागात अनेक समस्या, प्रश्न ऐरणीवर आले आहे. मात्र सद्याचे सरकार याबाबत पूर्णपणे उदासीन असल्यामुळे हे सरकार नेमके करते काय, असा प्रश्न उपस्थितीत होत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या सोबत होतो आणि आतासुद्धा आहे. विकास कामात राजकारण करणे ही आमची परंपरा नाही त्यांना जे करायचे ते करू द्या. आपण मात्र एकजुटीने राहून त्यांना प्रत्युत्तर दिले पाहिजे. तेव्हाच आपली ताकद आणि क्षमता सिद्ध होईल, असेही त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)