शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार नापास

By admin | Updated: March 8, 2016 00:08 IST

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्यानंतरही शासन मात्र कोणताही ठोस निर्णय घेत नाही.

यशोमती ठाकूर यांचा आरोप : विकासकामांना प्रारंभतिवसा : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्यानंतरही शासन मात्र कोणताही ठोस निर्णय घेत नाही. हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. पण आम्ही मात्र शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेसोबत आहोत, असे प्रतिपादन आ. यशोमती ठाकूर यांनी केले. खोलापूर, भातकुली येथील विकास कामांच्या शुभारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी मुकद्दर खाँ पठाण होते. व्यासपीठावर सरिता मकेश्वर, जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, इंदुताई कडू, आशुतोष देशमुख, गिरीश देशमुख, विजय मकेश्वर, नईम, वाहीदभाई, काजीमभाई, गफ्फार शहा, नरेंद्र मकेश्वर, मुरादभाई उपस्थित होते. यावेळी खारतळेगाव, खोलापूर, वाठोडा शुक्लेश्वर येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. आ. यशोमती ठाकूर पुढे बोलताना म्हणाल्या की, विकासासाठी समन्वय आणि एकवाक्यता असायला हवी. ग्रामीण भागात अनेक समस्या, प्रश्न ऐरणीवर आले आहे. मात्र सद्याचे सरकार याबाबत पूर्णपणे उदासीन असल्यामुळे हे सरकार नेमके करते काय, असा प्रश्न उपस्थितीत होत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या सोबत होतो आणि आतासुद्धा आहे. विकास कामात राजकारण करणे ही आमची परंपरा नाही त्यांना जे करायचे ते करू द्या. आपण मात्र एकजुटीने राहून त्यांना प्रत्युत्तर दिले पाहिजे. तेव्हाच आपली ताकद आणि क्षमता सिद्ध होईल, असेही त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)