शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

जनसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:18 IST

अमरावती : जिल्ह्यातील काही गावात १८ जुलै रोजी अतिवृष्टी होऊन ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये शेतीचे तसेच ...

अमरावती : जिल्ह्यातील काही गावात १८ जुलै रोजी अतिवृष्टी होऊन ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये शेतीचे तसेच घरातील वस्तूंचेही नुकसान झाले होते. आपादग्रस्तांचे संसार पुन्हा उभे राहावे, यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात साडेसात सात हजार रुपयांचा सानुग्रह निधीचे धनादेश संबंधितांना सुपूर्द करण्यात आहे. जनसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी येथे केले.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शिराळा, साऊर व खारतळेगाव येथील ग्रामस्थांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सानुग्रह निधीचे धनादेश वितरित करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. अमरावती पंचायत समितीच्या सभापती संगीता तायडे, पदाधिकारी अलका देशमुख, जयंत देशमुख, उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, नरेंद्र फुलझेले, तहसीलदार संतोष काकडे, नीता लबडे यांच्यासह संबंधित गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

अतिवृष्टीने शिराळा, साऊर व खारतळेगाव यासह लगतच्या गावांत अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान, घरांची पडझड, घरातील कपडे, वस्तू आदींचे नुकसान झाले. शिराळा क्षेत्रातील ८९ कुटुंबांना, साऊर गावातील ३१२ व्यक्तींना सानुग्रह निधीचा साडेसात हजार रुपयांचा पहिला टप्पा धनादेश स्वरुपात वाटप करण्यात आल्याची माहिती ना. यशोमती ठाकूर यांनी दिली.

-------------

अनिल गुडदे यांच्या वारसांना दोन लाखांचा निधी

खारतळेगावातील अतिवृष्टीमुळे नाल्याला आलेल्या पुरात वाहून मृत्यू झालेल्या अनिल गुडदे यांच्या वारसांना दोन लाख रुपये सानुग्रह निधीचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. खारतळेगावातील सहा व्यक्तींना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत २० हजारांचा सानुग्रह निधीचा धनादेश वितरित करण्यात आला. यावेळी पुरात वाहून मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांचे पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले. भांडी, वस्तू नुकसानासाठीची १० हजारांची मदत मिळणार आहे.

---------------------