शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला डिडोळकर यांचे नाव नको, ठराव रद्द करा; ट्रायबल फोरमचे कुलगुरुंना पत्र

By गणेश वासनिक | Updated: January 22, 2023 13:48 IST

आदिवासी समाजात तीव्र संताप

अमरावती : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या नवनिर्मित सभागृहाला स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्याचा पारीतठराव तात्काळ रद्द करावा, अशी मागणी ट्रायबल फोरम अमरावती जिल्हाध्यक्ष दिनेश टेकाम यांनी केली आहे. या संदर्भात गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुंना पत्र पाठविण्यात आले आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीवीर शहिद बाबूराव शेडमाके यांनी दिलेले योगदान इतिहासात अजरामर झाले. गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीमागे आदिवासींसह सर्वहारा बहुजन समाजाचा शैक्षणिक विकास व्हावा, गोंडवाना विद्यापीठातील संशोधनातून त्यांच्या दुःख-दारिद्रय समस्यांचे निराकरण करण्यासाठी विद्यापीठातील शोध-संशोधनाच्या आधारावर कल्याणकारी धोरणे राबविण्यास सरकारला बळ मिळावे, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील आदिवासी थोर महापुरूषांनी केलेल्या व्यापक लोकहिताच्या कार्याबाबत कृतज्ञ राहून आदिवासींचा आत्मसन्मान वाढवावा, अशी भूमिका गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीमागे असल्याचे केंद्र व राज्य सरकारने अनेकदा जाहीर केले आहे. मात्र, १७ जानेवारी २०२३ रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेटने नवनिर्मित सभागृहाला गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाच्या जडणघडणीत कोणतेही योगदान नसलेल्या आणि जनमानसाला माहित नसलेल्या एका विशिष्ट संघटनेचे स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देऊन विद्यापीठाच्या मूळ ध्येयधोरणांनाच हरताळ फासण्यात आला आहे.

विद्यापीठ सिनेट अंतर्गत बहुमताने घेतलेला हा निर्णय असल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून प्रकाशित झाली. परंतु सिनेटमधील बहुमताच्या जोरावर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील थोरपुरूष व लोकनेत्यांचे योगदान आऊटडेडेट करायचे आणि इथल्या मातीशी कुठलाही संबंध नसलेल्या व्यक्तीला महापुरूष ठरवून आमच्यावर निर्णय लादायचा, हा आदिवासींसह सर्वहारा बहुजन समाजाची अस्मिता आणि आत्मसन्मान पायदळी तुडविणारा ठराव असल्याची भावना आदिवासींची आहे. 

गोंड राजांचा वैभवशाली इतिहास 

गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती करताना चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच प्राचीन गोंडवाना भूभागाचा समृद्ध इतिहास लक्षात घेण्यात आला होता. या दोन्ही जिल्ह्यांवर गोंड राजांनी तब्बल ७०० वर्षे राज्य केल्याचा इतिहास उपलब्ध आहे. येथील सामाजिक व सांस्कृतिक वैभवाचे साक्षीदार म्हणून अनेक गडकिल्ले व मंदिरे आजही उभी आहेत. या वैभवाचा अभिमान केवळ आदिवासी नव्हे तर सर्वांनाच आहे. लोककल्याणकारी, क्रांतिवीरांची नावे द्या

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अग्रणी क्रांतीवीर शहिद बाबूराव शेडमाके, चंद्रपूरची लोककल्याणकारी राणी हिराई, विदर्भातील जबरानजोत आंदोलनाचे जनक नारायणसिंह उईके, गडचिरोली जिल्हा निर्मितीचे अध्वर्यु बाबूराव मडावी तसेच वंचित समाजाच्या कल्याणासाठी संघर्ष करून लोकप्रिय नेते स्व. सुखदेवबाबू उईके यांच्यापैकी कुणाही आदिवासी लोकनेत्याचे नाव गोंडवाना विद्यापीठाच्या नवनिर्मित सभागृहाला द्यावे, अशी मागणी ट्रायबल फोरम जिल्हाध्यक्ष दिनेश टेकाम यांनी केली आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती