शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला डिडोळकर यांचे नाव नको, ठराव रद्द करा; ट्रायबल फोरमचे कुलगुरुंना पत्र

By गणेश वासनिक | Updated: January 22, 2023 13:48 IST

आदिवासी समाजात तीव्र संताप

अमरावती : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या नवनिर्मित सभागृहाला स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्याचा पारीतठराव तात्काळ रद्द करावा, अशी मागणी ट्रायबल फोरम अमरावती जिल्हाध्यक्ष दिनेश टेकाम यांनी केली आहे. या संदर्भात गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुंना पत्र पाठविण्यात आले आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीवीर शहिद बाबूराव शेडमाके यांनी दिलेले योगदान इतिहासात अजरामर झाले. गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीमागे आदिवासींसह सर्वहारा बहुजन समाजाचा शैक्षणिक विकास व्हावा, गोंडवाना विद्यापीठातील संशोधनातून त्यांच्या दुःख-दारिद्रय समस्यांचे निराकरण करण्यासाठी विद्यापीठातील शोध-संशोधनाच्या आधारावर कल्याणकारी धोरणे राबविण्यास सरकारला बळ मिळावे, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील आदिवासी थोर महापुरूषांनी केलेल्या व्यापक लोकहिताच्या कार्याबाबत कृतज्ञ राहून आदिवासींचा आत्मसन्मान वाढवावा, अशी भूमिका गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीमागे असल्याचे केंद्र व राज्य सरकारने अनेकदा जाहीर केले आहे. मात्र, १७ जानेवारी २०२३ रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेटने नवनिर्मित सभागृहाला गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाच्या जडणघडणीत कोणतेही योगदान नसलेल्या आणि जनमानसाला माहित नसलेल्या एका विशिष्ट संघटनेचे स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देऊन विद्यापीठाच्या मूळ ध्येयधोरणांनाच हरताळ फासण्यात आला आहे.

विद्यापीठ सिनेट अंतर्गत बहुमताने घेतलेला हा निर्णय असल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून प्रकाशित झाली. परंतु सिनेटमधील बहुमताच्या जोरावर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील थोरपुरूष व लोकनेत्यांचे योगदान आऊटडेडेट करायचे आणि इथल्या मातीशी कुठलाही संबंध नसलेल्या व्यक्तीला महापुरूष ठरवून आमच्यावर निर्णय लादायचा, हा आदिवासींसह सर्वहारा बहुजन समाजाची अस्मिता आणि आत्मसन्मान पायदळी तुडविणारा ठराव असल्याची भावना आदिवासींची आहे. 

गोंड राजांचा वैभवशाली इतिहास 

गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती करताना चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच प्राचीन गोंडवाना भूभागाचा समृद्ध इतिहास लक्षात घेण्यात आला होता. या दोन्ही जिल्ह्यांवर गोंड राजांनी तब्बल ७०० वर्षे राज्य केल्याचा इतिहास उपलब्ध आहे. येथील सामाजिक व सांस्कृतिक वैभवाचे साक्षीदार म्हणून अनेक गडकिल्ले व मंदिरे आजही उभी आहेत. या वैभवाचा अभिमान केवळ आदिवासी नव्हे तर सर्वांनाच आहे. लोककल्याणकारी, क्रांतिवीरांची नावे द्या

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अग्रणी क्रांतीवीर शहिद बाबूराव शेडमाके, चंद्रपूरची लोककल्याणकारी राणी हिराई, विदर्भातील जबरानजोत आंदोलनाचे जनक नारायणसिंह उईके, गडचिरोली जिल्हा निर्मितीचे अध्वर्यु बाबूराव मडावी तसेच वंचित समाजाच्या कल्याणासाठी संघर्ष करून लोकप्रिय नेते स्व. सुखदेवबाबू उईके यांच्यापैकी कुणाही आदिवासी लोकनेत्याचे नाव गोंडवाना विद्यापीठाच्या नवनिर्मित सभागृहाला द्यावे, अशी मागणी ट्रायबल फोरम जिल्हाध्यक्ष दिनेश टेकाम यांनी केली आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती