शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

सार्वजनिक विहिरींच्या प्रभाव क्षेत्रामधील खासगी विहिरींवर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 21:58 IST

नव्या भूजल अधिनियमानुसार सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा प्रभाव क्षेत्रातील विहिरींना पूर्णत: किंवा अंशत: बंद करण्याचा प्रथम अधिकार जिल्हा प्राधिकरणाला राहणार आहे.

ठळक मुद्देनुकसान भरपाई मिळणार : ठराविक कालावधीसाठी ‘त्या’ विहिरींमधून पाणी काढण्यास प्रतिबंध

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नव्या भूजल अधिनियमानुसार सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा प्रभाव क्षेत्रातील विहिरींना पूर्णत: किंवा अंशत: बंद करण्याचा प्रथम अधिकार जिल्हा प्राधिकरणाला राहणार आहे. यामध्ये उभ्या पिकांच्या सिंचनासाठी न वापरलेल्या विहिंरीसाठी प्राधान्याने प्रतिबंधात्मक आदेश काढले जाईल व आवश्यकतेनुसार उभ्या पिकांना सिंचन करणाऱ्या विहिंरीसाठीही प्रतिबंधात्मक आदेशाचे अधिकार जिल्हा पाणलोट व्यवस्थापनाला राहणार आहे.अधिनियमाच्या तरतुदीनुसार सार्वजनिक पाण्याच्या स्त्रोताच्या प्रभाव क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याची एकच विहीर असेल आणि विहीरमालकाच्या शेतीसाठी पाण्याच्या मागणीसह गावकऱ्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असेल तर अशा प्रकरणांत प्रतिबंधात्मक आदेशाऐवजी गावकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, हे विहीर मालकाला अनिवार्य राहील, ही बाब अधिनियमात स्पष्ट करण्यात आली आहे. प्राधिकरणावर अधिसुचित केलेल्या सार्वजनिक पिण्याचा पाण्याचा स्त्रोत कोणत्याही प्रकारे दूषित असल्याचे प्राधिकरणाचे मत असेल तर तत्काळ किंवा साथीच्या रोगाच्या बाबतीत दूषित असल्याची पडताळणी झाल्यानंतर हे स्त्रोत थांबविण्यासाठी कारवाई केल्या जाणार आहे. नव्या सुधारणेनुसार राज्य शासनाकडून ११ सदस्य नामनिर्देशित केल्या जाणार आहे. यात सबंधित क्षेत्रातील विधानसभेचा एक सदस्य, जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारा महाराष्ट्र जलसंधारणाचे परिषदेचा एक सदस्य , जिल्ह्यातील सर्व पाणलोट क्षेत्र जलसंपत्ती समितीचे अध्यक्ष, जि.प.च्या कृषी सभापती, जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती, जि.प.चे सीईओ, जलसंधारण विभागाचा जिल्हा स्तरावरचा एक अधिकारी, जिल्हा प्राधिकरणाचा जिल्हा स्तरावरचा एक अधिकारी, एसएमओ, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक आदींचा समावेश राहील.विहिर बंद करण्याचे आदेश असल्यास भरपाईसार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोताचे संरक्षण करण्या अधिनियमाच्या कलम ३६ अन्वये पिकांकरीता नुकसान भरपार्ईचा दावा केला असल्यास सासाठी खासगी विहिर तात्पुरती बंद करण्याचे निर्देश दिल्यानंतर विहीर मालकास साक्षीपुराव्यासह पाणलोट क्षेत्र जलसंपत्ती समितीमार्फत जिल्हा प्राधिकरणाकडे अर्ज सादर करावा लागणार आहे.सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आणि त्याचे प्रभावक्षेत्र याबाबत अधिसुचना प्रसिद्ध झाल्यानंतर विहिरीच्या मालकाने कायदेशीर परवानगी न घेता विहिरीतील पाण्याच उपसा केला असेल तर मात्र, त्याला नुकसान भरपाई दिली जाणार नाही किंवा त्याला भरपाईचा दावा करता येणार नसल्याची बाब अधिनियमात स्पष्ट केली आहे.

टॅग्स :Waterपाणी