शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
4
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
5
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
6
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
7
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
8
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
9
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
10
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
11
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
12
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
13
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
14
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
15
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
16
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
17
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
18
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
19
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

सार्वजनिक विहिरींच्या प्रभाव क्षेत्रामधील खासगी विहिरींवर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 21:58 IST

नव्या भूजल अधिनियमानुसार सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा प्रभाव क्षेत्रातील विहिरींना पूर्णत: किंवा अंशत: बंद करण्याचा प्रथम अधिकार जिल्हा प्राधिकरणाला राहणार आहे.

ठळक मुद्देनुकसान भरपाई मिळणार : ठराविक कालावधीसाठी ‘त्या’ विहिरींमधून पाणी काढण्यास प्रतिबंध

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नव्या भूजल अधिनियमानुसार सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा प्रभाव क्षेत्रातील विहिरींना पूर्णत: किंवा अंशत: बंद करण्याचा प्रथम अधिकार जिल्हा प्राधिकरणाला राहणार आहे. यामध्ये उभ्या पिकांच्या सिंचनासाठी न वापरलेल्या विहिंरीसाठी प्राधान्याने प्रतिबंधात्मक आदेश काढले जाईल व आवश्यकतेनुसार उभ्या पिकांना सिंचन करणाऱ्या विहिंरीसाठीही प्रतिबंधात्मक आदेशाचे अधिकार जिल्हा पाणलोट व्यवस्थापनाला राहणार आहे.अधिनियमाच्या तरतुदीनुसार सार्वजनिक पाण्याच्या स्त्रोताच्या प्रभाव क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याची एकच विहीर असेल आणि विहीरमालकाच्या शेतीसाठी पाण्याच्या मागणीसह गावकऱ्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असेल तर अशा प्रकरणांत प्रतिबंधात्मक आदेशाऐवजी गावकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, हे विहीर मालकाला अनिवार्य राहील, ही बाब अधिनियमात स्पष्ट करण्यात आली आहे. प्राधिकरणावर अधिसुचित केलेल्या सार्वजनिक पिण्याचा पाण्याचा स्त्रोत कोणत्याही प्रकारे दूषित असल्याचे प्राधिकरणाचे मत असेल तर तत्काळ किंवा साथीच्या रोगाच्या बाबतीत दूषित असल्याची पडताळणी झाल्यानंतर हे स्त्रोत थांबविण्यासाठी कारवाई केल्या जाणार आहे. नव्या सुधारणेनुसार राज्य शासनाकडून ११ सदस्य नामनिर्देशित केल्या जाणार आहे. यात सबंधित क्षेत्रातील विधानसभेचा एक सदस्य, जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारा महाराष्ट्र जलसंधारणाचे परिषदेचा एक सदस्य , जिल्ह्यातील सर्व पाणलोट क्षेत्र जलसंपत्ती समितीचे अध्यक्ष, जि.प.च्या कृषी सभापती, जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती, जि.प.चे सीईओ, जलसंधारण विभागाचा जिल्हा स्तरावरचा एक अधिकारी, जिल्हा प्राधिकरणाचा जिल्हा स्तरावरचा एक अधिकारी, एसएमओ, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक आदींचा समावेश राहील.विहिर बंद करण्याचे आदेश असल्यास भरपाईसार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोताचे संरक्षण करण्या अधिनियमाच्या कलम ३६ अन्वये पिकांकरीता नुकसान भरपार्ईचा दावा केला असल्यास सासाठी खासगी विहिर तात्पुरती बंद करण्याचे निर्देश दिल्यानंतर विहीर मालकास साक्षीपुराव्यासह पाणलोट क्षेत्र जलसंपत्ती समितीमार्फत जिल्हा प्राधिकरणाकडे अर्ज सादर करावा लागणार आहे.सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आणि त्याचे प्रभावक्षेत्र याबाबत अधिसुचना प्रसिद्ध झाल्यानंतर विहिरीच्या मालकाने कायदेशीर परवानगी न घेता विहिरीतील पाण्याच उपसा केला असेल तर मात्र, त्याला नुकसान भरपाई दिली जाणार नाही किंवा त्याला भरपाईचा दावा करता येणार नसल्याची बाब अधिनियमात स्पष्ट केली आहे.

टॅग्स :Waterपाणी