शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

गोंडविहीर धरणाच्या मुख्यसंरक्षक भिंतीला तडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2018 16:48 IST

गाळ नेणाऱ्यांनी चक्क पिचिंगच्या दगडांसह धरणाची मुख्य भिंतच पोखरून काढली आहे.

अनिल कडू। 

परतवाडा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील गोंडविहीर धरणाच्या मुख्यसंरक्षक भिंतीला तडे गेले आहेत. धरणाच्या मुख्य भिंतीलगत गाळाचा उपसा करण्यात आला आहे. गाळ नेणाऱ्यांनी चक्क पिचिंगच्या दगडांसह धरणाची मुख्य भिंतच पोखरून काढली आहे.धरणाच्या भिंतीपासून दोनशे मीटरच्या आता नो एन्ट्री झोनमध्येही गाळ नेणाऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. यात प्रकल्पाची स्थिती गंभीर बनली आहे. गौरखेड्यासह परतवाड्याला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात धरण फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अचलपूर तालुक्यातील मल्हारा गावालगत गोंडविहीर प्रकल्प १९७७ मध्ये अस्तित्वात आला. आज या धरणाच्या मुख्य भिंतीवरच मोठमोठी झाडे उभी ठाकली आहेत. भिंतीवर आणि गेटजवळ पोहचण्याकरिता असलेल्या पायºया नष्ट झाल्या आहेत. धरणातून पाणी बाहेर सोडण्याच्या गेटजवळील पाण्याचा मार्ग बंद पडला आहे. गाळाने बुजला आहे. त्याच्या दोन्ही बाजूच्या भिंतीही खचल्या आहेत. या मार्गातही मोठमोठी झाडे उभी आहेत. अनेक वर्षांपासून गेटसह प्रकल्पच दुर्लक्षित आहे. धरणाची स्थिती बघता अनेक वर्षांपासून धरणाची प्रत्यक्षात देखभाल व दुरूस्तीच केली गेलेली नाही. धरणाची माहिती देणारा नामफलकही धरणस्थळी नाही. धरणाच्या मुख्य संरक्षक भिंतीला आतल्या बाजूला दगडी पिचिंग नाही. प्रकल्पावर लक्ष ठेवण्याकरिता स्थानिक पातळीवर एकही कर्मचारी तैनात नाही. पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्षित हा प्रकल्प लोकहितास्तव उपयुक्त असून बिच्छन नदीवर आहे. ही बिच्छन नदी गौरखेड्यासह परतवाडा शहराच्या मध्यभागातून वाहते. पावसाळ्यात दरवर्षी प्रकल्प पाण्याने पूर्णपणे भरतो. तेव्हा याच बिच्छन नदीला तीन ते चार मोठे पूरही जातात.गोंडविहीर प्रकल्प एप्रिल २०१६ पासून मध्यम व लघु पाटबंधारे विभाग अचलपूरकडे आला आहे. धरणाच्या मुख्यसंरक्षण भिंतीला तडे गेल्याची, प्रकल्पाची स्थिती गंभीर असल्याची माहिती आर. एस. मोहिते सहायक अभियंता श्रेणी-१ यांनी स्थानिक प्रशासनासह वरिष्ठांना दिली आहे. प्रकल्पातून गाळ नेण्यास मनाई करण्यात आली आहे. गाळ नेणाºयावर कारवाई करण्यास त्यांनी पोलिसांना सुचविले आहे. दरम्यान पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता र. कृ. ढवळे यांनी कार्यकारी अभियंता उ. ज. क्षीरसागर व सहायक अभियंता आर. एस. मोहिते यांच्या समवेत प्रकल्पाची पाहणी केली असता, तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंत्यांनी प्रकल्पस्थळीच स्थानिक अधिकाºयांना दिल्या आहेत.प्रकल्पातून होणाºया सिंचनाच्या वसुलीतून ४० टक्के खर्चच दुरूस्ती व देखभालीवर करता येतो. प्रत्यक्षात मात्र, या प्रकल्पावर सिंचनच नाही. सिंचन नसले तरी लोकहितकारी या प्रकल्पाची देखभाल व दुरूस्ती आवश्यक ठरते. प्रकल्पाची स्थिती गंभीर असली तरी प्रकल्पाच्या सुरक्षिततेला धोका नाही. डॅम सेफ्टी आॅर्गनायझेशन आणि मेरीच्या तज्ज्ञांकडून प्रकल्पाची तपासणी करून घेण्यात येईल.- आर. एस. मोहिते, सहायक अभियंता श्रेणी-१ , मध्यम व लघु पाटबंधारे विभाग, अचलपूर 

टॅग्स :DamधरणAmravatiअमरावती