शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

गुळाच्या गुऱ्हाळाने शेतीला नवी दिशा!

By admin | Updated: May 15, 2017 00:20 IST

स्थानिक संगत संस्थाननजीक वास्तव्यास असलेले नत्थुराव पायघन यांनी सुरू केलेला गुळाचा व्यवसाय शेतीसाठी नवसंजीवनी ठरला आहे.

उपक्रम : अंजनगावच्या पायघन कुटुंबाचा प्रक्रिया उद्योग लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : स्थानिक संगत संस्थाननजीक वास्तव्यास असलेले नत्थुराव पायघन यांनी सुरू केलेला गुळाचा व्यवसाय शेतीसाठी नवसंजीवनी ठरला आहे. शेतीला नवी दिशा देत ऊसावर प्रक्रिया करून नव्या पिढीसाठी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.परतवाडा मार्गावर पायघन कुटुंबाचे तीन एकर शेतात गुऱ्हाळ तयार केले आहे. दहा क्विंटल ऊसाचा पाच क्विंटल रस एकावेळी कढईत शिजवला जातो व त्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर चुना, एरंडी तेल व भेंडीच्या बियाचे चुर्ण टाकले जाते आणि अमिट गोडीचा गूळ याच्यात ओतला जातो. एक क्विंटल गूळ एकावेळी तयार होतो. दोन हजार रुपयांच्या दहा क्विंटल उसापासून प्रक्रिया करून पाच हजार रुपयांचा गूळ मिळतो. खर्च वजा झाल्यावर उत्पन्न मिळते. यामुळे आपण गुळनिर्मितीचा सोपा पर्याय निवडला आणि त्यात मेहनत व सातत्य राखून हा व्यवसाय यशस्वी रितीने तिसऱ्या पिढीला दिला असे ज्ञानदेव पायघन यांनी सांगितले. पन्नास वर्षापूर्वी वडीलांनी सुरू केलेला हा व्यवसाय आता नवी रस काढण्याची मशीन आणि ईतर पुरक सामान आणून त्यांनी आधुनिक केला. मात्र त्यात निर्माण झालेले उसाचे चिपाड पुन्हा जाळण्यासाठी वापरून खर्चात मोठी बचत केली जाते. आता हा व्यवसाय त्यांची तिसरी पिढी सांभाळत आहे.रसायनांचा वापर नाहीयेथे तयार झालेल्या गुळात कोणताही रासायनिक पदार्थ टाकला जात नाही. केवळ नैसर्गिक घटक टाकले जातात म्हणून या गुळाची गोडी कायम आहे. दररोज येथे अंदाजे शंभर किलो गूळ विकले जाते. शिवाय ऊसाच्या पाचरापासून उत्कृष्ट खत, रस काढण्यावर उरलेले ऊसाचे पाचट जाळल्या जाते. पण त्यापासून उत्कृष्ट प्रतीचे कंपोष्ट खत तयार होऊ शकते व त्यात उच्च दर्जाचे अन्नघटक पिकांना मिळतात, असे पायघन कुटुंबाने सांगितले.रस्त्यावरील दुकानदारीला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. केवळ कल्पक्ता वापरण्याची गरज आहे. आम्ही झुनका भाकर, रसवंती, मसाला गूळ आदी तयार करून त्याची विक्री करीत आहोत. चारोळी, खारक, नारळाचा किस आदी पदार्थ टाकून मसाला गूळ तयार केला आहे. याला चांगली मागणी आहे. प्रत्येकाने रोजगाराची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करावे.- ज्ञानदेव पायधन, शेतकरी