शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

गुळाच्या गुऱ्हाळाने शेतीला नवी दिशा!

By admin | Updated: May 15, 2017 00:20 IST

स्थानिक संगत संस्थाननजीक वास्तव्यास असलेले नत्थुराव पायघन यांनी सुरू केलेला गुळाचा व्यवसाय शेतीसाठी नवसंजीवनी ठरला आहे.

उपक्रम : अंजनगावच्या पायघन कुटुंबाचा प्रक्रिया उद्योग लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : स्थानिक संगत संस्थाननजीक वास्तव्यास असलेले नत्थुराव पायघन यांनी सुरू केलेला गुळाचा व्यवसाय शेतीसाठी नवसंजीवनी ठरला आहे. शेतीला नवी दिशा देत ऊसावर प्रक्रिया करून नव्या पिढीसाठी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.परतवाडा मार्गावर पायघन कुटुंबाचे तीन एकर शेतात गुऱ्हाळ तयार केले आहे. दहा क्विंटल ऊसाचा पाच क्विंटल रस एकावेळी कढईत शिजवला जातो व त्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर चुना, एरंडी तेल व भेंडीच्या बियाचे चुर्ण टाकले जाते आणि अमिट गोडीचा गूळ याच्यात ओतला जातो. एक क्विंटल गूळ एकावेळी तयार होतो. दोन हजार रुपयांच्या दहा क्विंटल उसापासून प्रक्रिया करून पाच हजार रुपयांचा गूळ मिळतो. खर्च वजा झाल्यावर उत्पन्न मिळते. यामुळे आपण गुळनिर्मितीचा सोपा पर्याय निवडला आणि त्यात मेहनत व सातत्य राखून हा व्यवसाय यशस्वी रितीने तिसऱ्या पिढीला दिला असे ज्ञानदेव पायघन यांनी सांगितले. पन्नास वर्षापूर्वी वडीलांनी सुरू केलेला हा व्यवसाय आता नवी रस काढण्याची मशीन आणि ईतर पुरक सामान आणून त्यांनी आधुनिक केला. मात्र त्यात निर्माण झालेले उसाचे चिपाड पुन्हा जाळण्यासाठी वापरून खर्चात मोठी बचत केली जाते. आता हा व्यवसाय त्यांची तिसरी पिढी सांभाळत आहे.रसायनांचा वापर नाहीयेथे तयार झालेल्या गुळात कोणताही रासायनिक पदार्थ टाकला जात नाही. केवळ नैसर्गिक घटक टाकले जातात म्हणून या गुळाची गोडी कायम आहे. दररोज येथे अंदाजे शंभर किलो गूळ विकले जाते. शिवाय ऊसाच्या पाचरापासून उत्कृष्ट खत, रस काढण्यावर उरलेले ऊसाचे पाचट जाळल्या जाते. पण त्यापासून उत्कृष्ट प्रतीचे कंपोष्ट खत तयार होऊ शकते व त्यात उच्च दर्जाचे अन्नघटक पिकांना मिळतात, असे पायघन कुटुंबाने सांगितले.रस्त्यावरील दुकानदारीला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. केवळ कल्पक्ता वापरण्याची गरज आहे. आम्ही झुनका भाकर, रसवंती, मसाला गूळ आदी तयार करून त्याची विक्री करीत आहोत. चारोळी, खारक, नारळाचा किस आदी पदार्थ टाकून मसाला गूळ तयार केला आहे. याला चांगली मागणी आहे. प्रत्येकाने रोजगाराची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करावे.- ज्ञानदेव पायधन, शेतकरी