शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

जिल्हा परिषदेतील उर्दू माध्यमाच्या शाळांवर गंडांतर

By admin | Updated: May 30, 2016 23:57 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शहरातील सायन्सस्कोर, अ‍ॅकॅडमिक हायस्कूल व अन्य...

अमरावती : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शहरातील सायन्सस्कोर, अ‍ॅकॅडमिक हायस्कूल व अन्य तीन अशा पाच शाळांमधील उर्दू व हिंदी माध्यमाच्या तुकड्याना शिक्षण विभागाने यंदा संचमान्यता नाकारली आहे. परिणामी या शाळांमधील जवळपास ४२ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यामुळे येथील उर्दू व हिंदी माध्यम बंद होण्याची शक्यता बळावली आहे.जि.प. शिक्षण विभागाच्या कार्यकक्षेत शहरातील सायन्सस्कोर, अ‍ॅकॅडमिक हायस्कूल आणि जिल्ह्यातील धारणी, तळेगाव दशासर, अचलपूर याठिकाणी उर्दू माध्यमाचे शिक्षण मागील कित्येक वर्षांपासून दिले जाते. मात्र, शिक्षण विभागाने यावर्षी सायन्सस्कोर शाळेत आतापर्यंत सुरू असलेल्या मराठी, हिंदी आणि उर्दू या तीन माध्यमातून शिक्षण दिले जात होते. यासाठी या शाळेत तीनही माध्यमे मिळून २७ शिक्षक कार्यरत आहेत. उर्दू आणि हिंदी माध्यमांना शिक्षण विभागाने माध्यमनिहाय संचमान्यता नाकारली आहे. त्यामुळे या शाळेतील १२ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. विशेष म्हणजे शिक्षण विभागाने तीनही तुकड्यांची पटसंख्या एकत्रित दाखविण्यात आली आहे. शिक्षण आयुक्तांनी माध्यमनिहाय मान्यता देण्यात येऊ नयेत, अशा सूचना दिल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. संचमान्यता नाकारल्याने हे १२ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. याशिवाय अ‍ॅकेडेमिक हायस्कूलमधील उर्दू माध्यमाला संचमान्यता दिली नसल्याने या शाळेतील ७ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. हीच परिस्थिती जिल्ह्यातील इतरही उर्दू माध्यमांची झाली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे उर्दू व हिंदी माध्यमाचे जवळपास २५ शिक्षक केवळ माध्यमनिहाय संचमान्यता नाकारल्यामुळे अतिरिक्त ठरले आहेत. शिक्षण विभागाने सुरू केलेली समायोजनाची प्रक्रिया थांबविल्यास अतिरिक्त शिक्षक व माध्यमनिहाय तुकड्यांवरील गंडांतर टळू शकते, असे सूत्रांनी सांगितले. परंतु शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे नवे संकट या शाळांसमोर उभे ठाकले आहे.गोरगरीब विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास आंदोलन जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सायन्सकोर, अ‍ॅकेडेमिक व अन्य उर्दू आणि हिंदी माध्यमांना संचमान्यता नाकारल्यामुळे या शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे या विरोधात जिल्हा परिषद सदस्य सुधीर सूर्यवंशी यांनी सीईओंना पत्र देऊन हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्थया या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.संचमान्यता ही पटसंख्येच्या आधारावर देण्यात आली आहे. मात्र, माध्यमनिहाय मान्यता देण्याचे अधिकार माझे नाहीत. त्यामुळे माध्यमनिहाय संचमान्यतेचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरील आहे. - एस.एम पानझाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी जि.प.