शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

कायमस्वरुपी मुख्याधिकारी द्या!

By admin | Updated: October 20, 2014 23:05 IST

सहा महिन्यांपासून अंजनगाव सुर्जी नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय व सार्वजनिक हिताची कामे रखडली आहेत. कायमस्वरुपी मुख्याधिकारी देण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.

अंजनगाववासीयांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनअंजनगाव सुर्जी : सहा महिन्यांपासून अंजनगाव सुर्जी नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय व सार्वजनिक हिताची कामे रखडली आहेत. कायमस्वरुपी मुख्याधिकारी देण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.यापूर्वीचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची बदली झाल्यानंतर त्यांचा प्रभार दर्यापूर व परतवाडा येथील मुख्याधिकाऱ्यांकडे आलटून-पालटून देण्यात येतो. पण हे दोन्ही शहराचे अधिकारी त्यांच्या स्वत:च्याच कामाच्या व्यापात अडकून असल्यामुळे त्यांना अंजनगावला वेळ देणे शक्य होत नाही. काँग्रेसच्या राजवटीत पालकमंत्री विखे पाटील यांनी ही समस्या सोडविली नाही. त्यांनी दोन कोटी रूपयांचे विशेष अनुदान न. प. ला दिले. पण या पैशापेक्षाही येथे कायमस्वरुपी प्रशासकीय अधिकारी महत्त्वाचा होता. या समस्येकडे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी लक्ष घालून तातडीने मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सत्ता परिवर्तनानंतर हनिफा बी मो. शरीफ यांनी कार्यभार सांभाळला होता. पण ज्या अपेक्षेने विकासाची कामे मार्गी लागण्याचा कयास होता त्यानुसार काम झाले नाही. कारण येथे कायम मुख्याधिकारी नाही. नगरसेवक जिल्हाधिकारी कार्यालयातून हात हालवून परत येतात. याबाबत सत्ताधारी काँग्रेसचे गटनेते व नगरसेवक नीलेश पसारी यांना विचारणा केली असता त्यांनी या समस्येचा सतत पाठपुरावा सुरू असून निकाल लागल्यावर येथे कायमस्वरुपी मुख्याधिकारी येणार असल्याचे सांगितले. मुख्याधिकारी नसल्यामुळे पालिकेतील वेतन वाटप, साफसफाई व बांधकामविषयक कामे ठप्प पडली आहेत. शहरात आरोग्याची समस्या उग्ररूप धारण करीत आहे.