शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

कायमस्वरुपी मुख्याधिकारी द्या!

By admin | Updated: October 20, 2014 23:05 IST

सहा महिन्यांपासून अंजनगाव सुर्जी नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय व सार्वजनिक हिताची कामे रखडली आहेत. कायमस्वरुपी मुख्याधिकारी देण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.

अंजनगाववासीयांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनअंजनगाव सुर्जी : सहा महिन्यांपासून अंजनगाव सुर्जी नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय व सार्वजनिक हिताची कामे रखडली आहेत. कायमस्वरुपी मुख्याधिकारी देण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.यापूर्वीचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची बदली झाल्यानंतर त्यांचा प्रभार दर्यापूर व परतवाडा येथील मुख्याधिकाऱ्यांकडे आलटून-पालटून देण्यात येतो. पण हे दोन्ही शहराचे अधिकारी त्यांच्या स्वत:च्याच कामाच्या व्यापात अडकून असल्यामुळे त्यांना अंजनगावला वेळ देणे शक्य होत नाही. काँग्रेसच्या राजवटीत पालकमंत्री विखे पाटील यांनी ही समस्या सोडविली नाही. त्यांनी दोन कोटी रूपयांचे विशेष अनुदान न. प. ला दिले. पण या पैशापेक्षाही येथे कायमस्वरुपी प्रशासकीय अधिकारी महत्त्वाचा होता. या समस्येकडे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी लक्ष घालून तातडीने मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सत्ता परिवर्तनानंतर हनिफा बी मो. शरीफ यांनी कार्यभार सांभाळला होता. पण ज्या अपेक्षेने विकासाची कामे मार्गी लागण्याचा कयास होता त्यानुसार काम झाले नाही. कारण येथे कायम मुख्याधिकारी नाही. नगरसेवक जिल्हाधिकारी कार्यालयातून हात हालवून परत येतात. याबाबत सत्ताधारी काँग्रेसचे गटनेते व नगरसेवक नीलेश पसारी यांना विचारणा केली असता त्यांनी या समस्येचा सतत पाठपुरावा सुरू असून निकाल लागल्यावर येथे कायमस्वरुपी मुख्याधिकारी येणार असल्याचे सांगितले. मुख्याधिकारी नसल्यामुळे पालिकेतील वेतन वाटप, साफसफाई व बांधकामविषयक कामे ठप्प पडली आहेत. शहरात आरोग्याची समस्या उग्ररूप धारण करीत आहे.