शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

भिजलेल्या धान्याचे बाजारभावाने पैसे द्या

By admin | Updated: October 11, 2016 00:16 IST

अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी अमरावती बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला १०० ते २०० पोते माल भिजला.

सुनील वऱ्हाडेंचे आदेश : बाजार समितीत पावसाचा कहरअमरावती : अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी अमरावती बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला १०० ते २०० पोते माल भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली. पण ज्या शेतकऱ्यांच्या मालाचे मोजमाप झाले, त्यांना खरेदीदारांना खरेदी केलेल्या भावनेचे पैसे द्यावे, अशी सूचना बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे यांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी दुपारी ३ वाजतादरम्यान अंबानगरीत धो-धो पाऊस कोसळला. त्यामुळे बाजार समितीत विक्रीस आलेला मूग, उडीद व सोयाबीनचे शेकडो पोते भिजले. मूग व उडदाची हर्रास संपली होती. सोयाबीनची हर्रास व खरेदी सुरू असतानाच पावसाचे आगमन झाल्यामुळे अडते, व्यापारी व शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. परंतुु ८० टक्के शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी आटोपली होती, असे बाजार समितीच्या सचिवांनी सांगितले. त्यामुळे खरेदीदारांनी ज्या शेतकऱ्यांचा माल विकत घेतला तो माल ओला झाला असला तरी त्याला ज्या भावाने खरेदी केला गेला त्या मालाचे त्याच भावाने पैसे देण्यासाठी अडते व व्यापाऱ्यांची तातडीची बैठक सभापती वऱ्हाडे यांनी बाजार समितीत घेतली. शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या उद्देशाने पाऊल उचलले. अनेक शेतकऱ्यांचा माल ओला झाला. चांदूरबाजारचे सुरेश शिंगाडे, पिंपरी मोडकचे सुनील मोडक, एकनाथ गवई, कसबेगव्हाणचे गजानन जोगी व इतर अनेक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. खरेदीदार माल कमी भावात घेत असल्याचा आरोप त्यांनी 'लोकमत'श्ज्या शेतकऱ्यांचा माल खरेदी केल्यानंतर ओला झाला. त्या शेतकऱ्यांना खरेदी भावानुसार पैसे देण्याच्या सूचना अडते व व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांना न्याय मिळावे, हाच माझा उद्देश आहे. - सुनील वऱ्हाडे, सभापती बाजार समिती, अमरावती