शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

राष्ट्रसंतांना ‘भारतरत्न’ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:24 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा, ही मागणी आता भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जोर धरू लागली आहे. त्यामुळे भाजपने याला समर्थन देऊन मागणी पूर्ण करावी, अशी अपेक्षा गुरुदेव भक्तांनी केली आहे.

ठळक मुद्देमहाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर मागणीला जोर

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा, ही मागणी आता भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जोर धरू लागली आहे. त्यामुळे भाजपने याला समर्थन देऊन मागणी पूर्ण करावी, अशी अपेक्षा गुरुदेव भक्तांनी केली आहे‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च सन्मान आहे. अनेक थोर व्यक्ती अजूनही या सन्मानापासून वंचित आहेत. हा सन्मान अजुनही एकाही संताला देण्यात आला नाही. काही संत स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेले. परंतु, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सन १९०९ पासून सन १९६८ पर्यंत देहरूपाने होते. कार्यरूपाने तर आजही आहेत. या थोर महामानवाला ‘भारतरत्न’ मिळण्याबाबत अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे तुकारामदादा गीताचार्य यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार केला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंचच्या आवाहनामुळे राज्यातील अनेक गावांमध्ये याबाबत ग्रामसभेचे ठराव झाले आहेत. लक्ष्मणदास काळे महाराज, सत्यपाल महाराज, भाऊसाहेब थुटे, राजेंद्र मोहितकर अशा अनेक प्रबोधनकारांनी समर्थन करून जनतेला निवेदने पाठविण्याचे आवाहन केले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार तसेच विदभार्तील अनेक आमदार-खासदारांनी समर्थन करून या मागणीवर पत्रव्यवहार केला. यामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. लोकसभेत यापूर्वी माजी खासदार महादेवराव शिवणकर, हंसराज अहीर तसेच खासदार अशोक नेते यांनी प्रश्न उपस्थित केला. विधानसभेत तत्कालीन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अशासकीय ठराव मांडला होता. महाराष्ट्र सरकारने शिफारसपत्र पाठविले. केंद्र सरकारच्या गृहविभागाने शिफारस केली. आता १ आॅगस्टला महाजनादेश यात्रेची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह करणार आहेत. यानिमित्त केंद्रातील मंत्री व राज्यातील मंत्रिमंडळात उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात भाजपा सरकारने तुकडोजी महाराज यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करावा, अशी अपेक्षा गुरुदेवभक्तांची आहेतुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ मिळाले पाहिजे, यासाठी मी शासनस्तरावर पाठपुरावा केला. ही मागणी नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांकसुद्धा आहे. सरकारने मागणीची दखल घ्यावी.- यशोमती ठाकूरआमदार, तिवसामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: तुकडोजी महाराज यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे केंद्र सरकार याबाबत निर्णय घेणार आहे, याबाबत पाठपुरावा सुरू आहे.- निवेदिता चौधरी (दिघडे), प्रदेश सचिव, भाजप

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज