शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

बच्चू कडू यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:31 IST

भिंत कोसळून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांसह गावकरी संतप्त झाले. तथापि, ते आक्रमक होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा पोहोचला. शाळेचे संचालक आ. बच्चू कडू यांना बोलावा, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतल्याने प्रचंड गोंधळ उडाला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भिंत कोसळून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांसह गावकरी संतप्त झाले. तथापि, ते आक्रमक होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा पोहोचला. शाळेचे संचालक आ. बच्चू कडू यांना बोलावा, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतल्याने प्रचंड गोंधळ उडाला. शाळेचे अध्यक्ष वसु महाराज यांनी गावकºयांना समजाविण्याचे प्रयत्न केले. मात्र, आधी शाळा व्यवस्थापनातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करा आणि आ. बच्चू कडूंना बोलावा, ही मागणी गावकºयांनी त्यांच्याकडे रेटून धरली.हतबल झालेल्या छोटू महाराज वसू यांनी आ. बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला. काही वेळानंतर आ. कडू यांचे वाहन शाळेच्या आवारात दाखल झाले. गावकऱ्यांनी वाहनाकडे धाव घेतली. पोलिसांनीही आपला मोर्चा वाहनाकडे वळविला. आ. कडूंच्या वाहनाच्या अवतीभवती गावकऱ्यांचा मोठ्या जमावडा जमला. पोलिसांनी सुरक्षा दिल्यानंतर आ. कडू वाहनाबाहेर आले. त्यावेळी नातेवाइकांसह गावकऱ्यांचा प्रचंड आक्रोश होता. एकाच वेळी अनेक जण आ. कडू यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी आ. कडू यांना सरंक्षण देत घटनास्थळापर्यंत नेले. त्यापाठोपाठ शेकडो गावकऱ्यांचा जमाव होता. चालत असताना काही गावकरी आ. कडू यांच्याशी बोलण्यासाठी झेपावत होता. त्यामुळे आ. बच्चू कडू यांच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. घटनास्थळाची पाहणी करून आ.कडू यांना शाळेच्या एका खोलीत नेण्यात आले.पोलिसांनी मृतक व जखमींच्या नातेवाईकांना आत नेले आणि दार बंद केले. मात्र, आत शिरण्यासाठी गावकऱ्यांची चढाओढ लागली होती. बाहेर गावकऱ्यांचा आरडाओरड, तर आत नातेवाइकांचा आक्रोश अशा स्थितीत आ.कडू यांनी नातेवाइकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्याच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.शाळेतील साहित्यांची फेकाफेकभिंत कोसळून मुलाचा मृत्यू झाल्यानंतर गावकऱ्यांनी मुख्याध्यापकांसह शिक्षकांवर धावा बोलला. शाळेच्या कार्यालयात जाऊन तोडफोड करण्याचे प्रयत्न सुरू केले. यावेळी काही शिक्षकांनी गावकऱ्यांवर खुर्च्या उचलून फेकल्याचेही चर्चा सुरू आहे. नातेवाईक व गावकऱ्यांच्या रोष पाहून मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेत पळ काढले. त्याचवेळी पोलिसांनी मुख्याध्यापकासह शिक्षकांना ताब्यात घेऊन वलगाव ठाण्यात नेले. गावातील तणावाची स्थिती पाहता मुख्याध्यापक व शिक्षकांना गाडगेनगर ठाण्यात हलविण्यात आले होते.नागरिकांच्या रोषामुळे पोलिसांची दमछाकघटनेच्या माहितीवरून पोलीस पाटील प्रवीण प्रधान यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य पाहून त्यांनी तत्काळ वलगाव पोलिसांना माहिती दिली. दहा ते पंधरा मिनीटांत पोलिसांचा मोठा ताफा शाळेत पोहोचला. पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, सहायक पोलीस आयुक्त रणजित देसाई यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस शिपाई, क्यूआरटी पथक असा तब्बल शंभरावर पोलिसांचा ताफ्याने बंदोबस्ताची धुरा सांभाळली. पोलिसांनी नातेवाइकांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. आ. बच्चू कडू यांचे आगमन झाल्यानंतर पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. आमदाराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. आ.कडूंना पोलिसांनी सरंक्षण दिले.राजकीय पदाधिकाऱ्यांची भेटभारतीय जनता पार्टीचे दिनेश सूर्यवंशी, निवेदिता चौधरी, नाना नागमोते यांच्यासह अन्य काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी आष्टीच्या शाळेत भेट देऊन मृत व जखमींच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. त्यांच्या मागण्या ऐकून त्यावर अंमलबजावणी कशी करता येईल, यावर लक्ष दिले. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन राजकीय पदाधिकाऱ्यांनी दिले.इमारतीच्या भिंती शिकस्त असल्याचे माहिती असतानाही शाळा प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचे दिसून येते. त्यानुसार तक्रार प्राप्त झाली असून, गुन्हा नोंदवून सहा जणांना ताब्यात घेतले आहे.- यशवंत सोळंके,पोलीस उपायुक्त, अमरावती