शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडू यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:31 IST

भिंत कोसळून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांसह गावकरी संतप्त झाले. तथापि, ते आक्रमक होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा पोहोचला. शाळेचे संचालक आ. बच्चू कडू यांना बोलावा, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतल्याने प्रचंड गोंधळ उडाला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भिंत कोसळून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांसह गावकरी संतप्त झाले. तथापि, ते आक्रमक होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा पोहोचला. शाळेचे संचालक आ. बच्चू कडू यांना बोलावा, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतल्याने प्रचंड गोंधळ उडाला. शाळेचे अध्यक्ष वसु महाराज यांनी गावकºयांना समजाविण्याचे प्रयत्न केले. मात्र, आधी शाळा व्यवस्थापनातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करा आणि आ. बच्चू कडूंना बोलावा, ही मागणी गावकºयांनी त्यांच्याकडे रेटून धरली.हतबल झालेल्या छोटू महाराज वसू यांनी आ. बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला. काही वेळानंतर आ. कडू यांचे वाहन शाळेच्या आवारात दाखल झाले. गावकऱ्यांनी वाहनाकडे धाव घेतली. पोलिसांनीही आपला मोर्चा वाहनाकडे वळविला. आ. कडूंच्या वाहनाच्या अवतीभवती गावकऱ्यांचा मोठ्या जमावडा जमला. पोलिसांनी सुरक्षा दिल्यानंतर आ. कडू वाहनाबाहेर आले. त्यावेळी नातेवाइकांसह गावकऱ्यांचा प्रचंड आक्रोश होता. एकाच वेळी अनेक जण आ. कडू यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी आ. कडू यांना सरंक्षण देत घटनास्थळापर्यंत नेले. त्यापाठोपाठ शेकडो गावकऱ्यांचा जमाव होता. चालत असताना काही गावकरी आ. कडू यांच्याशी बोलण्यासाठी झेपावत होता. त्यामुळे आ. बच्चू कडू यांच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. घटनास्थळाची पाहणी करून आ.कडू यांना शाळेच्या एका खोलीत नेण्यात आले.पोलिसांनी मृतक व जखमींच्या नातेवाईकांना आत नेले आणि दार बंद केले. मात्र, आत शिरण्यासाठी गावकऱ्यांची चढाओढ लागली होती. बाहेर गावकऱ्यांचा आरडाओरड, तर आत नातेवाइकांचा आक्रोश अशा स्थितीत आ.कडू यांनी नातेवाइकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्याच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.शाळेतील साहित्यांची फेकाफेकभिंत कोसळून मुलाचा मृत्यू झाल्यानंतर गावकऱ्यांनी मुख्याध्यापकांसह शिक्षकांवर धावा बोलला. शाळेच्या कार्यालयात जाऊन तोडफोड करण्याचे प्रयत्न सुरू केले. यावेळी काही शिक्षकांनी गावकऱ्यांवर खुर्च्या उचलून फेकल्याचेही चर्चा सुरू आहे. नातेवाईक व गावकऱ्यांच्या रोष पाहून मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेत पळ काढले. त्याचवेळी पोलिसांनी मुख्याध्यापकासह शिक्षकांना ताब्यात घेऊन वलगाव ठाण्यात नेले. गावातील तणावाची स्थिती पाहता मुख्याध्यापक व शिक्षकांना गाडगेनगर ठाण्यात हलविण्यात आले होते.नागरिकांच्या रोषामुळे पोलिसांची दमछाकघटनेच्या माहितीवरून पोलीस पाटील प्रवीण प्रधान यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य पाहून त्यांनी तत्काळ वलगाव पोलिसांना माहिती दिली. दहा ते पंधरा मिनीटांत पोलिसांचा मोठा ताफा शाळेत पोहोचला. पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, सहायक पोलीस आयुक्त रणजित देसाई यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस शिपाई, क्यूआरटी पथक असा तब्बल शंभरावर पोलिसांचा ताफ्याने बंदोबस्ताची धुरा सांभाळली. पोलिसांनी नातेवाइकांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. आ. बच्चू कडू यांचे आगमन झाल्यानंतर पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. आमदाराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. आ.कडूंना पोलिसांनी सरंक्षण दिले.राजकीय पदाधिकाऱ्यांची भेटभारतीय जनता पार्टीचे दिनेश सूर्यवंशी, निवेदिता चौधरी, नाना नागमोते यांच्यासह अन्य काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी आष्टीच्या शाळेत भेट देऊन मृत व जखमींच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. त्यांच्या मागण्या ऐकून त्यावर अंमलबजावणी कशी करता येईल, यावर लक्ष दिले. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन राजकीय पदाधिकाऱ्यांनी दिले.इमारतीच्या भिंती शिकस्त असल्याचे माहिती असतानाही शाळा प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचे दिसून येते. त्यानुसार तक्रार प्राप्त झाली असून, गुन्हा नोंदवून सहा जणांना ताब्यात घेतले आहे.- यशवंत सोळंके,पोलीस उपायुक्त, अमरावती