शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सरळसेवा आरएफओंना बोगस प्रमाणपत्र देण्याचा घाट, एकाच वेळी दोन पदावर नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 17:11 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आलेल्या सरळसेवा वनक्षेत्रपालांनी परिविक्षाधीन कालावधी पूर्ण न करता त्यांना बोगस स्थायीकरण प्रमाणपत्र देण्याचा घाट वरिष्ठ वनाधिका-यांकडून घातला जात आहे. एवढेच नव्हे तर, एकाच वेळी दोन पदांवर जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

- गणेश वासनिक

अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आलेल्या सरळसेवा वनक्षेत्रपालांनी परिविक्षाधीन कालावधी पूर्ण न करता त्यांना बोगस स्थायीकरण प्रमाणपत्र देण्याचा घाट वरिष्ठ वनाधिका-यांकडून घातला जात आहे. एवढेच नव्हे तर, एकाच वेळी दोन पदांवर जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.     भारतीय राज्यघटनेचे कलम ३०९ नुसार कोणत्याही पदाची निवड करताना भरती नियम कायम केले जाते. त्यानुसार वनक्षेत्रपाल पदाचे भरती नियम जारी करण्यात आले आहे. यात सरळसेवा वनक्षेत्रपाल यांच्यासाठी सहा महिने परीविक्षाधीन कालावधी कायम करण्यात आला आहे. हा कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी विभागीय परीक्षा, भाषा परीक्षा हे विहित मुदतीत उत्तीर्ण होणे अनिवार्य केलेआहे. किंबहुना सदर कालावधीत त्यांनी परीक्षा उत्तीर्ण न केल्यास त्यांना एक वर्ष मुदतवाढ दिली जाते. परंतु, वनविभागात १९७८ पासून सरळसेवेने भरती झालेल्या वनक्षेत्रपालांना परीविक्षाधीन कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र नेमणूक प्राकिधारी या नात्याने शासनाला जारी केले नाही. असे असताना आजतागायत सरळसेवा वनक्षेत्रपालांना काही स्थायी प्रमाणपत्रे, पदोन्नती देण्यात आलेल्या आहेत. मात्र, शासनाने ११ सप्टेंबर २०१४ आणि १९ सप्टेंबर २०१७ रोजी मार्गदर्शक सूचना जारी करून वनक्षेत्रपालांचे सेवापट (सर्व्हिस रेकॉर्ड) मागील पाच वर्षांचे गापनीय अहवाल तथा त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या विभागीय चौकशी तथा निलंबन आदींबाबत अंतिम अहवाल अभिलेख्यांची तपासणी विभागीय समितीने करणे गरजेचे आहे. तसेच उमेदवार ज्या जातीच्या आधारे नोकरीवर लागला असेल त्या जाती अथवा खुल्या प्रवर्गात त्याची निवड झालेली असल्यास तशी नोंद बिंदूनामावलीत करून ती बिंदूनामावली दरवर्षी मागासवर्गीय कक्ष मंत्रालय अथवा विभागीय आयुक्त कार्यालयातून प्रमाणित करून घेणे ही बाब १ एप्रिल १९७६ पासून लागू करण्यात आली आहे. मात्र, एमपीएसीसीमार्फत आलेल्या १४६ वनक्षेत्रपालांना जानेवारी २०१८ च्या प्रारंभी परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करताच प्रमाणपत्र नसतानाही त्यांना थेट नियुक्ती देण्यात आली. परंतु, परीविक्षाधीन कालावधीत सर्व अटी, शर्ती पूर्ण करणा-या वनक्षेत्रपालांना तातडीने कायम करण्याऐवजी अपात्र लोकांना सेवेत कायम केले जात आहे.

शासनाकडून ७९ वनक्षेत्रालांच्या पदोन्नतीवर निर्बंधराज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री भगवान यांच्या अध्यक्षतेखाली ९ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या विभागीय पदोन्नती समितीच्या सभेत पदोन्नतीस पात्र असलेल्या ७९ वनक्षेत्रपालांची निवड करण्यात आली. समितीने पात्रतेसाठी नमूद अभिलेखे न तपासता एकांकीपणे फक्त गोपनीय अहवाल प्रतवारींच्या आधारे पदोन्नती देण्याचा घाट रचला होता. मात्र, या वनक्षेत्रपालांच्या पदोन्नत्यांना अनिर्बंध कालावधीसाठी स्थगिती दिली आहे. कारण निर्धारित मानकानुसार परीविक्षाधीन कालावधी प्रमाणपत्र ही बाब प्रामुख्याने शासनाने नमूद करून ७९ वनक्षेत्रपालांच्या पदोन्नतीवर निर्बंध लावले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती