शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

सोलर पंपांसाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 00:25 IST

जिल्ह्यात सोलर पंप वीज जोडणीसाठी शासनाकडूम 35 हजार रूपये अनुदान दिले जाते ...

पालकमंत्री : महावितरण कंपनीची आढावा बैठक अमरावती : जिल्ह्यात सोलर पंप वीज जोडणीसाठी शासनाकडूम 35 हजार रूपये अनुदान दिले जाते व सौरऊर्जेवर चालत असल्यामुळे सोलर पंपाची उपयुक्तता तुलनेने जास्त आहे. म्हणून शेतकऱ्यांनी सोलर पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे व याबाबतीत जनजागृती करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिलेत.जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित महावितरण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता गाडीकर, कार्यकारी अभियंता मोहोड यांच्यासह सर्व जिल्ह्यातील महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. १७०० सोलर पंपांसाठी जिल्ह्यात मान्यता मिळाली असून फक्त ४८६ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे. सोलरपंपांना जिल्ह्यात मिळालेली मान्यता व आलेले अर्ज यामध्ये तफावत असून त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यामध्ये आतापर्यत १२ हजार कृषीपंपाचे कनेक्शन दिले असून कृषीपंपांच्या प्रलंबित कनेक्शनची संख्या कमी करण्यामध्ये यश आल्याबाबत पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. यावर्षी रबी हंगामात शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत सुरु राहावा, म्हणून २०० अतिरिक्त डीबींची मागणी केली आहे व ४०० डीबींची साठवण करुन ठेवली आहे. शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देणे हे शासनाचे प्राधान्य असुन अमरावती स्मार्ट सिटीसाठी १३०कोटी रुपयाचा स्मार्ट ग्रिड आराखडा शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यामधून भूमिगत वीज कनेक्शन जोडण्यासाठी भुयारी मागार्चा वापर करण्यात येणार आहे. इन्फ्रा २ टप्प्याच्या कामाची माहिती देखील पालकमंत्र्यांनी घेतली. यावेळी अचलपूर विभागात कृषीपंपांचे वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. पथदिवे व पाणीपुरवठ्याचे कनेक्शनही लवकर देण्याचे, ग्राहकांचे तक्रारी वेळेत सोडविण्याचे, व मुख्यालयी थांबण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत (प्रतिनिधी)