शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य फंडात ठणठणाट, पुनर्वसन रखडले

By admin | Updated: July 4, 2015 00:52 IST

ग्रामपंचायतीच्या हद्दीतील साफसफाई, नाल्या उपसणे, आरोग्याची कामे, विजेचे दिवे लावणे आदी कामे ग्रामपंचायतीच्या सामान्य फंडातून केली जाते.

पेरणीपूर्वीच संपली विम्याची मुदत : प्रहारचा आंदोलनाचा इशाराचांदूरबाजार : ग्रामपंचायतीच्या हद्दीतील साफसफाई, नाल्या उपसणे, आरोग्याची कामे, विजेचे दिवे लावणे आदी कामे ग्रामपंचायतीच्या सामान्य फंडातून केली जाते. परंतु ६ एप्रिल २०१५ च्या शासन निर्णयानुसार इमारत कर आकारणी बंद असल्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील सामान्य फंडात ठणठणाट निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविली जात नाही. गावातील नागरिकांच्या रोषाला सरपंचासह इतर पदाधिकारी बळी पडतात. याशिवाय शेतकऱ्यांना लागणाऱ्या सातबारासाठी हेलपाटे घ्यावे लागत आहे. शासनाने संगणकीय सातबारा उपलब्ध करून देण्याचे सुरू केले. मात्र यंत्रणेत बऱ्याच त्रृटी असल्यामुळे शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या मोसमात त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना मिळणारे संगणकीकृत सातबारे अत्यंत चुकीचे मिळत आहेत. ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी इंटरनेटची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना सातबाऱ्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. हा सातबारा मिळाल्यानंतर तो चुकीचा असल्यामुळे त्याच्या दुरूस्तीकरिता शेतकऱ्याला पुन्हा तलाठ्याकडे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज काढण्यासाठी अडचणी येतात. सातबारा एका ठिकाणी तर नकाशासाठी तलाठ्याकडे जावे लागते. यात वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे आणि त्यात हेलपाटे मारावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत चालला आहे. शासनाने संगणकीकृत सातबाऱ्याची मोहीम तर राबविली मात्र त्यात येणाऱ्या अडचणी व त्रुटींची दुरूस्ती केली नाही. इतकेच नव्हे, तर तलाठ्यांना आवश्यक लॅपटॉपचीही पूर्तता केली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातही बऱ्याच शेतकऱ्यांची पावसाअभावी पेरणी रखडली आहे. सध्या तालुक्यात ४० टक्के पीक विम्याची मुदत ३० जूनपर्यंत असल्यामुळे शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहे. या अडचणी लक्षात घेता शासनाने ग्रा. पं. कर आकारणीवरील बंदी उठवून निधी उपलब्ध करून द्यावा. संगणकीकृत सातबारे दुरूस्त होईपर्यंत तलाठ्याकडून हस्तलिखीत सातबारे देण्याला परवानगी द्यावी. पीक विम्याची रक्कम वाढवून द्यावी, सर्व बँकांना नवीन व जुन्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश द्यावे, या मागणीचे निवेदन प्रहारचे ग्रा. पं. सदस्य व बाजार समितीचे माजी सभापती मंगेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. निवेदनावर पं.स. सभापती राजेश सोलव, अजय तायडे, गजानन ठाकरे, शिवा भुयार, नंदकुमार अर्डक, सरपंच सूरज चव्हाण, सागर धनसांडे, मंगेश शेळके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)नवनियुक्त पदाधिकारी पेचातग्रामपंचायतीच्या सामान्य फंडातून केली जाणारी कामे जवळपास तालुक्यातील अनेक गावांत बंद असल्याने सत्तारुढ पदाधिकाऱ्यांविरुद्ध तीव्र असंतोष खदखदत आहे. कारण ग्रामपंचायतीच्या तिजोरीत ठणठणाट असल्याने अंतर्गत रस्ते, नाल्यांंची कामे रखडली आहेत. सध्या पावसाळ्याला सुरुवात झाल्याने समस्येतही वाढ झाली आहे. गावांत खडीकरणाची कामे अर्धवट असल्याने सर्वत्र चिखल साचला आहे. त्यामुळे गावाचे सौंदर्यीकरण करावे तरी कसे, असा पेच अधिकाऱ्यांना पडला आहे.