शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

सामान्य फंडात ठणठणाट, पुनर्वसन रखडले

By admin | Updated: July 4, 2015 00:52 IST

ग्रामपंचायतीच्या हद्दीतील साफसफाई, नाल्या उपसणे, आरोग्याची कामे, विजेचे दिवे लावणे आदी कामे ग्रामपंचायतीच्या सामान्य फंडातून केली जाते.

पेरणीपूर्वीच संपली विम्याची मुदत : प्रहारचा आंदोलनाचा इशाराचांदूरबाजार : ग्रामपंचायतीच्या हद्दीतील साफसफाई, नाल्या उपसणे, आरोग्याची कामे, विजेचे दिवे लावणे आदी कामे ग्रामपंचायतीच्या सामान्य फंडातून केली जाते. परंतु ६ एप्रिल २०१५ च्या शासन निर्णयानुसार इमारत कर आकारणी बंद असल्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील सामान्य फंडात ठणठणाट निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविली जात नाही. गावातील नागरिकांच्या रोषाला सरपंचासह इतर पदाधिकारी बळी पडतात. याशिवाय शेतकऱ्यांना लागणाऱ्या सातबारासाठी हेलपाटे घ्यावे लागत आहे. शासनाने संगणकीय सातबारा उपलब्ध करून देण्याचे सुरू केले. मात्र यंत्रणेत बऱ्याच त्रृटी असल्यामुळे शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या मोसमात त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना मिळणारे संगणकीकृत सातबारे अत्यंत चुकीचे मिळत आहेत. ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी इंटरनेटची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना सातबाऱ्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. हा सातबारा मिळाल्यानंतर तो चुकीचा असल्यामुळे त्याच्या दुरूस्तीकरिता शेतकऱ्याला पुन्हा तलाठ्याकडे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज काढण्यासाठी अडचणी येतात. सातबारा एका ठिकाणी तर नकाशासाठी तलाठ्याकडे जावे लागते. यात वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे आणि त्यात हेलपाटे मारावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत चालला आहे. शासनाने संगणकीकृत सातबाऱ्याची मोहीम तर राबविली मात्र त्यात येणाऱ्या अडचणी व त्रुटींची दुरूस्ती केली नाही. इतकेच नव्हे, तर तलाठ्यांना आवश्यक लॅपटॉपचीही पूर्तता केली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातही बऱ्याच शेतकऱ्यांची पावसाअभावी पेरणी रखडली आहे. सध्या तालुक्यात ४० टक्के पीक विम्याची मुदत ३० जूनपर्यंत असल्यामुळे शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहे. या अडचणी लक्षात घेता शासनाने ग्रा. पं. कर आकारणीवरील बंदी उठवून निधी उपलब्ध करून द्यावा. संगणकीकृत सातबारे दुरूस्त होईपर्यंत तलाठ्याकडून हस्तलिखीत सातबारे देण्याला परवानगी द्यावी. पीक विम्याची रक्कम वाढवून द्यावी, सर्व बँकांना नवीन व जुन्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश द्यावे, या मागणीचे निवेदन प्रहारचे ग्रा. पं. सदस्य व बाजार समितीचे माजी सभापती मंगेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. निवेदनावर पं.स. सभापती राजेश सोलव, अजय तायडे, गजानन ठाकरे, शिवा भुयार, नंदकुमार अर्डक, सरपंच सूरज चव्हाण, सागर धनसांडे, मंगेश शेळके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)नवनियुक्त पदाधिकारी पेचातग्रामपंचायतीच्या सामान्य फंडातून केली जाणारी कामे जवळपास तालुक्यातील अनेक गावांत बंद असल्याने सत्तारुढ पदाधिकाऱ्यांविरुद्ध तीव्र असंतोष खदखदत आहे. कारण ग्रामपंचायतीच्या तिजोरीत ठणठणाट असल्याने अंतर्गत रस्ते, नाल्यांंची कामे रखडली आहेत. सध्या पावसाळ्याला सुरुवात झाल्याने समस्येतही वाढ झाली आहे. गावांत खडीकरणाची कामे अर्धवट असल्याने सर्वत्र चिखल साचला आहे. त्यामुळे गावाचे सौंदर्यीकरण करावे तरी कसे, असा पेच अधिकाऱ्यांना पडला आहे.