शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याच्या बोगस कामांची लक्तरे वेशीवर

By admin | Updated: November 15, 2015 00:04 IST

ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या कालवे विभागाद्वारा करण्यात आलेल्या बोगस कामांची लक्तरे चव्हाट्यावर आली आहे.

ऊर्ध्व वर्धाच्या अधिकाऱ्यांद्वारा दिशाभूल : म्हणतात जलशिवारमधून होणार कामेअमरावती : ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या कालवे विभागाद्वारा करण्यात आलेल्या बोगस कामांची लक्तरे चव्हाट्यावर आली आहे. मुख्य कालव्यासह लघु कालव्यांचे ठिकठिकाणी फुटलेल्या अस्तरीकरणातून भ्रष्टाचाराचा पाट वाहत आहे. कालव्यालगतचे रस्ते खचले आहे. त्यामुळे कालवे शेतकऱ्यांसाठी वरदान न ठरता डोकेदुखी ठरत आहे. ही कामे आता जलशिवारच्या माध्यमातून करण्यात येतील, असे खोटे विधान जबाबदार अधिकारी करीत असल्याची शोकांतिका आहे. ऊर्ध्व वर्धा धरणाच्या मुख्य कालव्याचे ३७ हजार कि.मी. अंतरावरील अस्तरीकरण पूर्णत: उखडले आहे. येथेच नव्हे, तर संपूर्ण मुख्य कालवा व लघु कालव्यांना मोठमोठी भगदाड पडली आहेत. कालव्यातील पाणी साठून राहावे यासाठी ठिकठिकाणी अस्तरीकरण करण्यात आले. मात्र, ते उखडले असल्याने लगतच्या शेतात पाणी साचत असल्याने शेतीपीके खराब होत आहेत. तसेच पाटचऱ्या व लघु कालवे ही झाडाझुडूपांनी बुजली आहेत. त्यामुळे शेतांना पाणी न मिळता अन्यत्र पाणी शिरते. रबीसाठी १११ दिवस पाच पाळ्यांत पाणी देण्याचे नियोजन धरण विभागाने केले आहे. प्रत्यक्षात कालवे, लघु कालवे व पाटचाऱ्या झाडाझुडूपात व गाळात बुजल्या असल्याने रबीच्या सिंचनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हंगामाला सुरुवात झाली आहे. धरण विभागाद्वारा ही कामे आता शासनाचे जलशिवार अभियानांतर्गत करण्यात येईल, असे सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाने याबाबत हात झटकले आहे. त्यामुळे धरण विभाग खोटे आश्वासन देत असल्याचा आरोप आहे. (प्रतिनिधी)