शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

कालव्याच्या बोगस कामांची लक्तरे वेशीवर

By admin | Updated: November 15, 2015 00:04 IST

ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या कालवे विभागाद्वारा करण्यात आलेल्या बोगस कामांची लक्तरे चव्हाट्यावर आली आहे.

ऊर्ध्व वर्धाच्या अधिकाऱ्यांद्वारा दिशाभूल : म्हणतात जलशिवारमधून होणार कामेअमरावती : ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या कालवे विभागाद्वारा करण्यात आलेल्या बोगस कामांची लक्तरे चव्हाट्यावर आली आहे. मुख्य कालव्यासह लघु कालव्यांचे ठिकठिकाणी फुटलेल्या अस्तरीकरणातून भ्रष्टाचाराचा पाट वाहत आहे. कालव्यालगतचे रस्ते खचले आहे. त्यामुळे कालवे शेतकऱ्यांसाठी वरदान न ठरता डोकेदुखी ठरत आहे. ही कामे आता जलशिवारच्या माध्यमातून करण्यात येतील, असे खोटे विधान जबाबदार अधिकारी करीत असल्याची शोकांतिका आहे. ऊर्ध्व वर्धा धरणाच्या मुख्य कालव्याचे ३७ हजार कि.मी. अंतरावरील अस्तरीकरण पूर्णत: उखडले आहे. येथेच नव्हे, तर संपूर्ण मुख्य कालवा व लघु कालव्यांना मोठमोठी भगदाड पडली आहेत. कालव्यातील पाणी साठून राहावे यासाठी ठिकठिकाणी अस्तरीकरण करण्यात आले. मात्र, ते उखडले असल्याने लगतच्या शेतात पाणी साचत असल्याने शेतीपीके खराब होत आहेत. तसेच पाटचऱ्या व लघु कालवे ही झाडाझुडूपांनी बुजली आहेत. त्यामुळे शेतांना पाणी न मिळता अन्यत्र पाणी शिरते. रबीसाठी १११ दिवस पाच पाळ्यांत पाणी देण्याचे नियोजन धरण विभागाने केले आहे. प्रत्यक्षात कालवे, लघु कालवे व पाटचाऱ्या झाडाझुडूपात व गाळात बुजल्या असल्याने रबीच्या सिंचनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हंगामाला सुरुवात झाली आहे. धरण विभागाद्वारा ही कामे आता शासनाचे जलशिवार अभियानांतर्गत करण्यात येईल, असे सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाने याबाबत हात झटकले आहे. त्यामुळे धरण विभाग खोटे आश्वासन देत असल्याचा आरोप आहे. (प्रतिनिधी)