शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

कचराभूमीतील आग कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 01:10 IST

सुकळी येथील कचरा भूमीत लागलेली आग महिना उलटत आला तरी कायमच आहे. तेथील कचऱ्याचे २१ दिवसांत कंपोस्ट खत तयार करण्याच्या वल्गना करणारे महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी सामान्यजनांच्या डोळ्यांत आणखी किती धुळफेक करावी, असा सवाल आता त्रस्त नागरिक आणि पर्यावरणप्रेमी विचारू लागले आहेत.

ठळक मुद्देआयुक्तांकरवी दिशाभूल : काय झाले कंपोस्ट खताचे?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सुकळी येथील कचरा भूमीत लागलेली आग महिना उलटत आला तरी कायमच आहे. तेथील कचऱ्याचे २१ दिवसांत कंपोस्ट खत तयार करण्याच्या वल्गना करणारे महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी सामान्यजनांच्या डोळ्यांत आणखी किती धुळफेक करावी, असा सवाल आता त्रस्त नागरिक आणि पर्यावरणप्रेमी विचारू लागले आहेत.अत्यंत घातक प्रदूषण निर्माण करणारी ही आग तत्काळ प्रभावाने नियंत्रित करण्यासाठी प्रभावी पावले उचलणे हे महापालिकेचे कर्तव्य होते. परंतु कारवाई केल्याचा देखावा करणारे महापालिका आयुक्त लोकारोग्याबाबत गंभीर नाहीत, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा उघड झाले आहे. यापूर्वीही महापालिका आयुक्तांनी केवळ 'कागदोपत्री' पाऊले उचलून हजारो लोकांना डेंग्युच्या विळख्यात जखडू दिले. अनेकांना त्यामुळे प्राणासही मुकावे लागले. नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, पालकंमंत्री प्रवीण पोटे यांनी या मुद्याची दखल घेऊन चौकशीचे आदेश देखील दिले होते. तरीही डेंग्युचा डंख नागरिकांना होत राहिला. पर्यावरण राखण्याच्या मुद्यासंबंधी केंद्र शासनाच्या कठोर कायद्यांना आयुक्त हुलकावणी देत असल्यामुळे सुकळीतील 'गॅस चेंबर'ही नागरिकांचे बळी घेणार काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAmravatiअमरावती