शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

गाळपेरच्या निर्णयात गोरक्षण संस्थांना डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:50 IST

 एक रूपयात भाडेपट्टीने जमीन : विभागीय आयुक्तांद्वारा कृषी विभागाच्या मुख्य सचिवांना पत्र

अमरावती : राज्यातील १५१ तालुक्यांसह २६८ महसूल मंडळामध्ये शासनाने दुष्काळस्थिती जाहीर केली. यावर तातडीची उपाययोजना म्हणून जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील तलाव व जलाशयाची जमीन वैरण पिके घेण्याचा निर्णय शासनाने ३१ आॅक्टोबरला घेतला. एक रूपया नाममात्र भाडेपट्टीने ही जमीन मिळणार आहे. मात्र, गोरक्षण संस्थांचा उल्लेख शासन निर्णयात नसल्याने विभागीय आयुक्तांनी कृषी विभागाच्या मुख्य सचिवांना पत्र दिले आहे.

 राज्यातल्या दुष्काळी भागात उपाययोजना सुरू करण्यात आल्यात. या सर्व गावांत पाणीटंचाईसह वैरणटंचाईची मोठ्या प्रमाणावर समस्या असल्याने यासर्व ठिकाणी चाºयाचे नियोजन करण्याचे आदेश थेट मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. गावातच चारा उपलब्धत व्हावा, यासाठी नियोजन सुरू आहे. यात गाळपेर क्षेत्रात चारा निर्मिती हा पर्याय म्हणून समोर आला आहे. प्रकल्पाला कोरड पडल्याने यातील पाणीसाठा कमी झालेला आहे. या बुडीत क्षेत्रातील जमिनी शेतकºयांना मका, ज्वारी, बाजरी सारखी चारा पिके घ्यायला नाममात्र एक रूपया भाडेपट्टीने शेतकºयांना देण्यात येणार आहे. यामध्ये विविध योजनांमधून शेतकºयांना मोफत बियाणे देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्य समिती राहणार आहे. यामध्ये जिल्हा पशुसंवर्र्धन उपायुक्त सदस्य सचिव राहणार आहेत.

 जलाशयातील पाणी विनामुल्य चाराटंचाईचा सामना करण्यास वैरण पिकांसाठी प्रकल्पाचे पानी हे विनामुक्य मिळणार आहे. मात्र, हा चारा शेतकºयांना स्वताच्या पशुधनासाठी उपयोगात आणावा लागणार आहे.  अतिरिक्त चारा हा लगतच्याच शेतकºयांना उपलब्ध करावा लागेल. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन हजार हेक्टर गाळपेर क्षेत्रावर  चारा पिकांची लागवड करण्याचे बंधन आहे. राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी याबाबतचे निर्देश जारी केलेले आहेत.

 यवतमाळच्या जिल्हाधिकाºयांनी वेधले लक्षज्या शेतकºयांच्या जमिनीचे प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात आलेले आहे. स्थानिक भूमिहीन, स्थानिक भूमिहीन नागरिकांच्या सहकारी संस्था, अन्य जमातीचे स्थानिक भूमिहीन नागरिक, बाहेरील भुमिहीन नागरिक, स्थानिक भूधारक, यापैकी लाभार्थी उपलब्ध न झाल्यास ज्यांच्या जवळ जास्त पशुधन आहेत अश्या शेतकºयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र, या शासन निर्णयात गोरक्षण संस्थाचा उल्लेख नसल्याची बाब यवतमाळचे जिल्हाधिकाºयांनी विभागीय आयुक्तांचे निदर्शनात आणली आहे.