शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गाळपेरच्या निर्णयात गोरक्षण संस्थांना डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:50 IST

 एक रूपयात भाडेपट्टीने जमीन : विभागीय आयुक्तांद्वारा कृषी विभागाच्या मुख्य सचिवांना पत्र

अमरावती : राज्यातील १५१ तालुक्यांसह २६८ महसूल मंडळामध्ये शासनाने दुष्काळस्थिती जाहीर केली. यावर तातडीची उपाययोजना म्हणून जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील तलाव व जलाशयाची जमीन वैरण पिके घेण्याचा निर्णय शासनाने ३१ आॅक्टोबरला घेतला. एक रूपया नाममात्र भाडेपट्टीने ही जमीन मिळणार आहे. मात्र, गोरक्षण संस्थांचा उल्लेख शासन निर्णयात नसल्याने विभागीय आयुक्तांनी कृषी विभागाच्या मुख्य सचिवांना पत्र दिले आहे.

 राज्यातल्या दुष्काळी भागात उपाययोजना सुरू करण्यात आल्यात. या सर्व गावांत पाणीटंचाईसह वैरणटंचाईची मोठ्या प्रमाणावर समस्या असल्याने यासर्व ठिकाणी चाºयाचे नियोजन करण्याचे आदेश थेट मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. गावातच चारा उपलब्धत व्हावा, यासाठी नियोजन सुरू आहे. यात गाळपेर क्षेत्रात चारा निर्मिती हा पर्याय म्हणून समोर आला आहे. प्रकल्पाला कोरड पडल्याने यातील पाणीसाठा कमी झालेला आहे. या बुडीत क्षेत्रातील जमिनी शेतकºयांना मका, ज्वारी, बाजरी सारखी चारा पिके घ्यायला नाममात्र एक रूपया भाडेपट्टीने शेतकºयांना देण्यात येणार आहे. यामध्ये विविध योजनांमधून शेतकºयांना मोफत बियाणे देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्य समिती राहणार आहे. यामध्ये जिल्हा पशुसंवर्र्धन उपायुक्त सदस्य सचिव राहणार आहेत.

 जलाशयातील पाणी विनामुल्य चाराटंचाईचा सामना करण्यास वैरण पिकांसाठी प्रकल्पाचे पानी हे विनामुक्य मिळणार आहे. मात्र, हा चारा शेतकºयांना स्वताच्या पशुधनासाठी उपयोगात आणावा लागणार आहे.  अतिरिक्त चारा हा लगतच्याच शेतकºयांना उपलब्ध करावा लागेल. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन हजार हेक्टर गाळपेर क्षेत्रावर  चारा पिकांची लागवड करण्याचे बंधन आहे. राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी याबाबतचे निर्देश जारी केलेले आहेत.

 यवतमाळच्या जिल्हाधिकाºयांनी वेधले लक्षज्या शेतकºयांच्या जमिनीचे प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात आलेले आहे. स्थानिक भूमिहीन, स्थानिक भूमिहीन नागरिकांच्या सहकारी संस्था, अन्य जमातीचे स्थानिक भूमिहीन नागरिक, बाहेरील भुमिहीन नागरिक, स्थानिक भूधारक, यापैकी लाभार्थी उपलब्ध न झाल्यास ज्यांच्या जवळ जास्त पशुधन आहेत अश्या शेतकºयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र, या शासन निर्णयात गोरक्षण संस्थाचा उल्लेख नसल्याची बाब यवतमाळचे जिल्हाधिकाºयांनी विभागीय आयुक्तांचे निदर्शनात आणली आहे.