शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

बडनेऱ्यात चालला गजराज

By admin | Updated: February 17, 2016 00:00 IST

महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी बडनेरातील अतिक्रमण हटविले.

अतिक्रमण निर्मूलन : आठवडी बाजार, मोतीनगरात मोहीमश्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरामहापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी बडनेरातील अतिक्रमण हटविले. नवीवस्तीतील आठवडी बाजार, सोमवार बाजार तसेच जुन्यावस्तीतील मोतीनगरच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. या कारवाईमुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून ही कारवाई निरंतर सुरुच राहिल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.महापालिका आयुक्त चंद्रकात गुडेवार यांच्या आदेशानुसार बडनेरा शहरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. गत काही महिन्यापासून बडनेरा शहरातील सोमवार बाजारात मोठ्या प्रमाणात अतिक्रणम वाढीस लागले असताना ते रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे चित्र आहे. आठवडी बाजारात प्रत्येक सोमवारी बाजार भरतो. मात्र, हा परिसर अतिक्रमणाने वेढल्यामुळे दुकानदारांना बाजाराच्या जागेऐवजी रस्त्यांवर दुकाने थाटावी लागतात. यापूर्वी महापालिकेच्या आमसभेत आठवडी बाजारातील अतिक्रमणावर खल झाला होता.सोमवार बाजारात काही विशिष्ट समाजाने जागा बळकावली असताना प्रशासन कारवाई का करीत नाही? असा सवाल सामान्य नागरिकांनी केला आहे. बडनेरा अतिक्रमणाच्या विळख्यातबडनेरा : सोमवार बाजारात अतिक्रमण वाढल्यामुळे ये-जा करणे कठीण झाले आहे. भाजीपाला, धान्य खरेदीसाठी येणाऱ्या महिला, युवतींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. बाजारासाठी जागा राखीव असताना महापालिका प्रशासनाने ती दुसऱ्या व्यवसायासाठी दिल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमिवर मंगळवारी मुख्य बाजार ओळीत रस्त्यालगतच्या हातगाड्या, पानटपरी, खोके, स्टॉल देखील जप्त करण्यात आले आहेत. आठवडी बाजारात काही महाभागांनी चक्क पक्के बांधकाम करण्याचा प्रताप केल्याचे अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या निदर्शनास आले. मुख्य रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारे टिनाचे शेडस्, खोके आदी साहित्य ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली. बडनेरा शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सलग तीन दिवस ही कारवाई केली जाईल, असे अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी सांगितले. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. निरीक्षक उमेश सवाई, अभियंता नितीन बोबडे, सहायक पोलीस निरीक्षक खराटे यांच्यासह पोलीस कर्मचारी, महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते. बडनेरा शहरात अतिक्रमणाची समस्या गंभीर आहे. रस्त्यालगत हातगाड्या, वाहतूक कोंडी अशा एक ना अनेक समस्यांचा सामना बडनेरावासियांना करावा लागतो. मुख्य मार्गावरील अतिक्रमण ही समस्या मोठी असून ती दूर करावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.