शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

सर्वशिक्षा अभियानाला निधीचा वानवा, उपक्रमात आडकाठी

By admin | Updated: July 20, 2015 00:17 IST

ग्रामीण व शहरी भागातील सर्व बालकांपर्यंत गुणवत्तापूर्वक शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत राज्य शासनाने सर्वशिक्षा अभियान राबविणे सुरू केले आहे.

प्रतीक्षा : शासनाकडून अनुदान उपलब्ध नाहीअमरावती : ग्रामीण व शहरी भागातील सर्व बालकांपर्यंत गुणवत्तापूर्वक शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत राज्य शासनाने सर्वशिक्षा अभियान राबविणे सुरू केले आहे. मात्र यावर्षी सर्वशिक्षा अभियानाला अद्यापपर्यंतही जिल्हास्तरावर निधी उपलब्ध झाला नाही. परिणामी यामधून राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमात अडचणी येत आहेत.सर्वशिक्षा अभियानाचे नियोजन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत केले जाते. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत सर्वशिक्षा अभियानाचा आराखडा तयार करून पाठविला जातो. त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हा परिषद राज्य शासनाकडे पाठविते. राज्याच्या एकत्रित अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी व त्यानंतर केंद्र शासन प्राप्त प्रस्तावावर अंतिम निर्णय घेऊन मंजुरी प्रदान करते. त्यानंतर साधारणत: दोन टप्प्यांत सर्वशिक्षा अभियानाचा निधी वितरित केला जातो. एप्रिल महिन्यात पहिला हप्ता तर सप्टेंबर ते मार्च या कालावधीत दुसरा हप्ता दिला जातो, आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला दरवर्षी जिल्हास्तरावरील सर्व शिक्षण विभागाकडे निधी उपलब्ध होतो. मात्र यंदा अद्यापपर्यंतही जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियान विभागाने सन २०१५़/१६ साठी मागणी केलेल्या सुमारे ६० कोटींच्या निधीपैकी केवळ जिल्हा परिषद आणि महापालिका मिळून सुमारे ३५ कोटी रूपये शासनाने मंजूर केले आहेत. यापैकी सद्यस्थितीत कुठलाही निधी उपलब्ध झाला नाही. अशातच दरवर्षी अभियानात विविध उपक्रमांसाठी मागणी केलेल्या निधीत कपात होत असल्याने नाईलाजास्तव उपक्रमांना कात्री लावावी लागत आहे. यंदाच्या सत्रात जिल्ह्याला उपक्रमापुरता निधी मिळत आहे. यामधून शालेय गणवेश वाटप, पाठ्य पुस्तके, शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करणे यावर उपक्रमनिहाय निधी उपलब्ध आहे. मात्र सर्वशिक्षा अभियानाकरिता अद्यापपर्यंत निधी उपलब्ध झाला नसल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)