शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

मोफत तांदळाची लाभार्थींकडून खुल्या बाजारात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:17 IST

संजय खासबागे - वरूड : शासनाकडून गरिबांना मिळणारे स्वस्त धान्य दुकानदारांकडून खुल्या बाजारात विकले जात असल्याची ओरड असताना आता ...

संजय खासबागे - वरूड : शासनाकडून गरिबांना मिळणारे स्वस्त धान्य दुकानदारांकडून खुल्या बाजारात विकले जात असल्याची ओरड असताना आता लाभार्थीच तीन रुपये किलोने मिळणारे तांदूळ प्रतिकिलो १० ते १५ रुपये दराने खुल्या बाजारात विकत आहेत. याकरिता व्यापाऱ्यांचे दलाल गल्लोगल्ली फिरून रेशनचा तांदूळ खरेदी करीत आहेत. भंडारा, गोंदिया येथे नेऊन हेच व्यापारी फिल्टर केलेला तांदूळ परत ३० ते ३५ रुपये दराने बाजारात ग्राहकांना विकत असल्याचे वास्तव आहे. तालुक्यातून महिन्याकाठी एक ते दोन ट्रक तांदळाची तस्करी होत असते. याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे.

कोरोनाकाळात केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ असे प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मोफत देण्यात येते. अन्न सुरक्षा कायदा २०१३ अंतर्गतसुद्धा धान्यवाटप केले जात आहे. तालुक्यात १२४ रास्त भाव प्राधिकृत दुकानदार, तर रेशन कार्डधारकांमध्ये अंत्योदय योजनेचे ८ हजार १७२, प्राधान्य गटाचे २३ हजार ८९२ आणि एपीएल १३ हजार ९३९ आहेत. त्रुटीयुक्त ३,९५६ कार्ड आहेत. अंत्योदय योजनेतील कुटुंबाला ३५ किलो मोफत धान्यात १५ किलो तांदूळ आणि २० किलो गहू मिळतो. प्राधान्य गट योजनेमध्ये तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ प्रतिव्यक्ती मोफत मिळते.

गोरगरिबांनी नेलेला तांदूळ, गहू खरेदी करणार रॅकेटच सक्रिय असून, १० ते १५ रुपये दराने तांदूळ खरेदी करणारे दलाल गल्लोगल्ली फिरून खरेदी करीत आहेत. साधारणतः एक दलाल एक ते दोन क्विंटल तांदूळ खरेदी करून व्यापाऱ्याला विकतो. व्यापारी या फिरस्त्या दलालांकडून घेतलेला तांदूळ ट्रकने भंडारा गोंदियाकडे रवाना करतो. फिल्टर करून तोच तांदूळ एक तर शासनाला विकला जातो किंवा खुल्या बाजारात ३० ते ३५ रुपये किलोने विकला जात आहे. खुद्द रेशन दुकानदारसुद्धा ग्राहकांना अंगठा लावण्याकरिता बोलावून त्याला काही पैसे रोखीने देऊन तांदूळ स्वतः व्यापाऱ्यांच्या घशात घालत असल्याची चर्चा आहे. काही जणांचे रेशन कार्ड त्यांच्याकडेच आहे. यामध्ये मोठे व्यापारी गुंतलेले असताना या काळ्या बाजाराला आळा कोण घालणार, तांदळाच्या तस्करीच्या मुळापर्यंत जाण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. रेशनच्या धान्याचा काळ बाजार थांबविण्याची काळाची गरज होऊन रेशनच्या धान्याची लूट थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

--------------

दुचाकीवर ग्रामीण भागात तांदळाची खरेदी करणारे सक्रिय !

ग्रामीण आणि आता शहरी भागात दुचाकीवरून ''तांदूळ द्या हो तांदूळ'' म्हणणारे दलाल जरी पोटासाठी कमवित असले तरी व्यापारी कोट्यधीश होऊन शासनाच्या योजनेला सुरुंग लावत आहेत.

-------------------