शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

मोफत तांदळाची लाभार्थींकडून खुल्या बाजारात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:17 IST

संजय खासबागे - वरूड : शासनाकडून गरिबांना मिळणारे स्वस्त धान्य दुकानदारांकडून खुल्या बाजारात विकले जात असल्याची ओरड असताना आता ...

संजय खासबागे - वरूड : शासनाकडून गरिबांना मिळणारे स्वस्त धान्य दुकानदारांकडून खुल्या बाजारात विकले जात असल्याची ओरड असताना आता लाभार्थीच तीन रुपये किलोने मिळणारे तांदूळ प्रतिकिलो १० ते १५ रुपये दराने खुल्या बाजारात विकत आहेत. याकरिता व्यापाऱ्यांचे दलाल गल्लोगल्ली फिरून रेशनचा तांदूळ खरेदी करीत आहेत. भंडारा, गोंदिया येथे नेऊन हेच व्यापारी फिल्टर केलेला तांदूळ परत ३० ते ३५ रुपये दराने बाजारात ग्राहकांना विकत असल्याचे वास्तव आहे. तालुक्यातून महिन्याकाठी एक ते दोन ट्रक तांदळाची तस्करी होत असते. याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे.

कोरोनाकाळात केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ असे प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मोफत देण्यात येते. अन्न सुरक्षा कायदा २०१३ अंतर्गतसुद्धा धान्यवाटप केले जात आहे. तालुक्यात १२४ रास्त भाव प्राधिकृत दुकानदार, तर रेशन कार्डधारकांमध्ये अंत्योदय योजनेचे ८ हजार १७२, प्राधान्य गटाचे २३ हजार ८९२ आणि एपीएल १३ हजार ९३९ आहेत. त्रुटीयुक्त ३,९५६ कार्ड आहेत. अंत्योदय योजनेतील कुटुंबाला ३५ किलो मोफत धान्यात १५ किलो तांदूळ आणि २० किलो गहू मिळतो. प्राधान्य गट योजनेमध्ये तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ प्रतिव्यक्ती मोफत मिळते.

गोरगरिबांनी नेलेला तांदूळ, गहू खरेदी करणार रॅकेटच सक्रिय असून, १० ते १५ रुपये दराने तांदूळ खरेदी करणारे दलाल गल्लोगल्ली फिरून खरेदी करीत आहेत. साधारणतः एक दलाल एक ते दोन क्विंटल तांदूळ खरेदी करून व्यापाऱ्याला विकतो. व्यापारी या फिरस्त्या दलालांकडून घेतलेला तांदूळ ट्रकने भंडारा गोंदियाकडे रवाना करतो. फिल्टर करून तोच तांदूळ एक तर शासनाला विकला जातो किंवा खुल्या बाजारात ३० ते ३५ रुपये किलोने विकला जात आहे. खुद्द रेशन दुकानदारसुद्धा ग्राहकांना अंगठा लावण्याकरिता बोलावून त्याला काही पैसे रोखीने देऊन तांदूळ स्वतः व्यापाऱ्यांच्या घशात घालत असल्याची चर्चा आहे. काही जणांचे रेशन कार्ड त्यांच्याकडेच आहे. यामध्ये मोठे व्यापारी गुंतलेले असताना या काळ्या बाजाराला आळा कोण घालणार, तांदळाच्या तस्करीच्या मुळापर्यंत जाण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. रेशनच्या धान्याचा काळ बाजार थांबविण्याची काळाची गरज होऊन रेशनच्या धान्याची लूट थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

--------------

दुचाकीवर ग्रामीण भागात तांदळाची खरेदी करणारे सक्रिय !

ग्रामीण आणि आता शहरी भागात दुचाकीवरून ''तांदूळ द्या हो तांदूळ'' म्हणणारे दलाल जरी पोटासाठी कमवित असले तरी व्यापारी कोट्यधीश होऊन शासनाच्या योजनेला सुरुंग लावत आहेत.

-------------------