शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
4
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
5
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
8
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
9
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
11
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
12
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
13
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
14
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
15
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
16
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
17
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
18
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
19
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
20
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

मोफत तांदळाची लाभार्थींकडून खुल्या बाजारात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:17 IST

संजय खासबागे - वरूड : शासनाकडून गरिबांना मिळणारे स्वस्त धान्य दुकानदारांकडून खुल्या बाजारात विकले जात असल्याची ओरड असताना आता ...

संजय खासबागे - वरूड : शासनाकडून गरिबांना मिळणारे स्वस्त धान्य दुकानदारांकडून खुल्या बाजारात विकले जात असल्याची ओरड असताना आता लाभार्थीच तीन रुपये किलोने मिळणारे तांदूळ प्रतिकिलो १० ते १५ रुपये दराने खुल्या बाजारात विकत आहेत. याकरिता व्यापाऱ्यांचे दलाल गल्लोगल्ली फिरून रेशनचा तांदूळ खरेदी करीत आहेत. भंडारा, गोंदिया येथे नेऊन हेच व्यापारी फिल्टर केलेला तांदूळ परत ३० ते ३५ रुपये दराने बाजारात ग्राहकांना विकत असल्याचे वास्तव आहे. तालुक्यातून महिन्याकाठी एक ते दोन ट्रक तांदळाची तस्करी होत असते. याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे.

कोरोनाकाळात केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ असे प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मोफत देण्यात येते. अन्न सुरक्षा कायदा २०१३ अंतर्गतसुद्धा धान्यवाटप केले जात आहे. तालुक्यात १२४ रास्त भाव प्राधिकृत दुकानदार, तर रेशन कार्डधारकांमध्ये अंत्योदय योजनेचे ८ हजार १७२, प्राधान्य गटाचे २३ हजार ८९२ आणि एपीएल १३ हजार ९३९ आहेत. त्रुटीयुक्त ३,९५६ कार्ड आहेत. अंत्योदय योजनेतील कुटुंबाला ३५ किलो मोफत धान्यात १५ किलो तांदूळ आणि २० किलो गहू मिळतो. प्राधान्य गट योजनेमध्ये तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ प्रतिव्यक्ती मोफत मिळते.

गोरगरिबांनी नेलेला तांदूळ, गहू खरेदी करणार रॅकेटच सक्रिय असून, १० ते १५ रुपये दराने तांदूळ खरेदी करणारे दलाल गल्लोगल्ली फिरून खरेदी करीत आहेत. साधारणतः एक दलाल एक ते दोन क्विंटल तांदूळ खरेदी करून व्यापाऱ्याला विकतो. व्यापारी या फिरस्त्या दलालांकडून घेतलेला तांदूळ ट्रकने भंडारा गोंदियाकडे रवाना करतो. फिल्टर करून तोच तांदूळ एक तर शासनाला विकला जातो किंवा खुल्या बाजारात ३० ते ३५ रुपये किलोने विकला जात आहे. खुद्द रेशन दुकानदारसुद्धा ग्राहकांना अंगठा लावण्याकरिता बोलावून त्याला काही पैसे रोखीने देऊन तांदूळ स्वतः व्यापाऱ्यांच्या घशात घालत असल्याची चर्चा आहे. काही जणांचे रेशन कार्ड त्यांच्याकडेच आहे. यामध्ये मोठे व्यापारी गुंतलेले असताना या काळ्या बाजाराला आळा कोण घालणार, तांदळाच्या तस्करीच्या मुळापर्यंत जाण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. रेशनच्या धान्याचा काळ बाजार थांबविण्याची काळाची गरज होऊन रेशनच्या धान्याची लूट थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

--------------

दुचाकीवर ग्रामीण भागात तांदळाची खरेदी करणारे सक्रिय !

ग्रामीण आणि आता शहरी भागात दुचाकीवरून ''तांदूळ द्या हो तांदूळ'' म्हणणारे दलाल जरी पोटासाठी कमवित असले तरी व्यापारी कोट्यधीश होऊन शासनाच्या योजनेला सुरुंग लावत आहेत.

-------------------