शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
8
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
9
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
10
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
11
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
12
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
13
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
14
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
15
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
16
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
17
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
18
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
19
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
20
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी

राज्यात आदिवासींची फसवणूक, खावटी घोटाळा राज्यपालांच्या दरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST

फोटो २३ एएमपीएच०१ अमरावती - राज्यात आदिवासी बांधवांना खावटी योजनेअंतर्गत निकृष्ट किराणा किट वाटप करण्यात आले आहे. याविषयी उच्चस्तरीय ...

फोटो २३ एएमपीएच०१

अमरावती - राज्यात आदिवासी बांधवांना खावटी योजनेअंतर्गत निकृष्ट किराणा किट वाटप करण्यात आले आहे. याविषयी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी दाखल करण्यात यावे, अशी मागणी ट्रायबल फोरमने गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.

आमदार डॉ. संदीप धुर्वे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनातून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून 'जनजाती सल्लागार परिषद’ची बैठक झाली नाही, ही बाब राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली आहे. भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीतील भाग - ख मधील परिच्छेद ४ (१) अनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी समाजाच्या कल्याणाच्या योजना, धोरण, कार्यक्रमाचे नियमन आणि आदिवासींच्या विकासासंदर्भातील विचारलेल्या विषयांबाबत राज्यपालांना सल्ला देणे याकरिता जनजाती सल्लागार परिषद अस्तित्वात आहे.

महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून या परिषदेची एकही बैठक झालीच नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे अनुसूचित क्षेत्रातील रिक्त जागांची रखडलेली भरती, गैरआदिवासींनी बळकावलेल्या जागांची विशेष भरती मोहीम, आदिवासींचे विस्थापन, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, वर्षानुवर्षे जातपडताळणीची प्रलंबित प्रकरणे, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्युप्रकरणे, भूमिसंपादन, गैरआदिवासींनी आदिवासींच्या बळकावलेल्या जमिनी, पेट्रोल पंप, सर्वोच्च न्यायालयाने विविध प्रकरणात आदिवासींच्या बाजूने दिलेले महत्वपूर्ण निर्णय, त्याची अंमलबजावणी न होणे आदी समस्यांवर चर्चा होत नसल्याने आदिवासी समाजात प्रचंड असंतोष असल्याची भावना शिष्टमंडळांनी व्यक्त केली. यावेळी ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रमोद घोडाम, पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, पुणे जिल्हाध्यक्ष रोहित सुपे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल कोवे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष कासम सुरत्ने, मुंबईचे रमेश परचाके, नितीन ठाकरे आदी उपस्थित होते.

------------

खावटीत कोट्यवधींचा घोटाळा

कोरोनातील लाॅकडाऊनमुळे आदिवासींपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य सरकारने खावटी योजना पुनरुज्जीवित केली होती. यात ११ लाख ५५ हजार कुटुंबांना रोख स्वरूपात दोन हजार रुपये व वस्तुस्वरूपात दोन हजार रुपये देण्याचे ठरले होते. यासाठी सरकारने ४८६ कोटी रुपये मंजूरही केले होते. मात्र, आता बहुतांश लोकांच्या खात्यात रक्कमच जमा झाली नाही आणि दुसरीकडे निकृष्ट अन्नधान्य वाटप केले जात आहे. वाटप करण्यात येत असलेले निकृष्ट अन्नधान्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दरबारात शिष्टमंडळाने नेले.