शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आदिवासींची फसवणूक, खावटी घोटाळा राज्यपालांच्या दरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST

फोटो २३ एएमपीएच०१ अमरावती - राज्यात आदिवासी बांधवांना खावटी योजनेअंतर्गत निकृष्ट किराणा किट वाटप करण्यात आले आहे. याविषयी उच्चस्तरीय ...

फोटो २३ एएमपीएच०१

अमरावती - राज्यात आदिवासी बांधवांना खावटी योजनेअंतर्गत निकृष्ट किराणा किट वाटप करण्यात आले आहे. याविषयी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी दाखल करण्यात यावे, अशी मागणी ट्रायबल फोरमने गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.

आमदार डॉ. संदीप धुर्वे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनातून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून 'जनजाती सल्लागार परिषद’ची बैठक झाली नाही, ही बाब राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली आहे. भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीतील भाग - ख मधील परिच्छेद ४ (१) अनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी समाजाच्या कल्याणाच्या योजना, धोरण, कार्यक्रमाचे नियमन आणि आदिवासींच्या विकासासंदर्भातील विचारलेल्या विषयांबाबत राज्यपालांना सल्ला देणे याकरिता जनजाती सल्लागार परिषद अस्तित्वात आहे.

महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून या परिषदेची एकही बैठक झालीच नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे अनुसूचित क्षेत्रातील रिक्त जागांची रखडलेली भरती, गैरआदिवासींनी बळकावलेल्या जागांची विशेष भरती मोहीम, आदिवासींचे विस्थापन, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, वर्षानुवर्षे जातपडताळणीची प्रलंबित प्रकरणे, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्युप्रकरणे, भूमिसंपादन, गैरआदिवासींनी आदिवासींच्या बळकावलेल्या जमिनी, पेट्रोल पंप, सर्वोच्च न्यायालयाने विविध प्रकरणात आदिवासींच्या बाजूने दिलेले महत्वपूर्ण निर्णय, त्याची अंमलबजावणी न होणे आदी समस्यांवर चर्चा होत नसल्याने आदिवासी समाजात प्रचंड असंतोष असल्याची भावना शिष्टमंडळांनी व्यक्त केली. यावेळी ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रमोद घोडाम, पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, पुणे जिल्हाध्यक्ष रोहित सुपे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल कोवे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष कासम सुरत्ने, मुंबईचे रमेश परचाके, नितीन ठाकरे आदी उपस्थित होते.

------------

खावटीत कोट्यवधींचा घोटाळा

कोरोनातील लाॅकडाऊनमुळे आदिवासींपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य सरकारने खावटी योजना पुनरुज्जीवित केली होती. यात ११ लाख ५५ हजार कुटुंबांना रोख स्वरूपात दोन हजार रुपये व वस्तुस्वरूपात दोन हजार रुपये देण्याचे ठरले होते. यासाठी सरकारने ४८६ कोटी रुपये मंजूरही केले होते. मात्र, आता बहुतांश लोकांच्या खात्यात रक्कमच जमा झाली नाही आणि दुसरीकडे निकृष्ट अन्नधान्य वाटप केले जात आहे. वाटप करण्यात येत असलेले निकृष्ट अन्नधान्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दरबारात शिष्टमंडळाने नेले.