शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

पळसखेडच्या डाक कार्यालयात अफरातफर

By admin | Updated: November 22, 2015 00:17 IST

पळसखेड येथील टपाल कार्यालयात खातेदाऱ्यांनी आरडीच्या माध्यमातून लाखो रूपये जमा केले.

आरडीधारकांची फसवणूक : अहवाल तपासणीअंती होणार कारवाईचांदूररेल्वे : पळसखेड येथील टपाल कार्यालयात खातेदाऱ्यांनी आरडीच्या माध्यमातून लाखो रूपये जमा केले. आरडीचा कालावधी पूर्ण झाल्याने ते पैसे घेण्याकरिता पोस्टात गेलेल्या ग्राहकांना पैसे भरलेच नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लाखो रुपयांची अफरातफर झाल्याची तक्रार दोन खातेदारांनी पोलीस विभागाकडे केली आहे. पोलीस विभागाने ही कार्यवाही थंडबस्त्यात टाकल्याने खातेदारांनी पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेटी घेतली. मात्र खात्यात भरलेले पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोस्ट खात्यात भरलेले पैसे मागायचे कुणाला, या विवंचनेत खातेदार अडकले आहेत. पळसखेड येथील खातेदार पोस्टात रक्कम भरण्यासाठी गेले असता पोस्टमन पैसे भरल्याचा शिक्का पुस्तकावर मारून देत होते. ज्यावेळी आरडीचा कालावधी पूर्ण झाला तेव्हा पोस्ट खात्यात आरडीचे पैसे मागण्यासाठी खातेदार गेले. मात्र ''तुमचे पुस्तक अमरावतीला पाठविले, यायचे आहे'' अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे संबंधित खातेदार अमरावतीच्या मुख्य डाक विभागात चौकशीकरिता गेले असता त्यांना रक्कमच जमा नसल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी अफरातफर झाल्याची बाब समोर आली. याबाबत कार्यवाहीच्या भीतीने काही रक्कम पोस्ट विभागात भरण्यात आल्याचेही सांगण्यात आले. परंतु जे खातेदार कधीही गावाच्या बाहेर गेले नाही अशा खातेदारांना अद्यापही रक्कम मिळाली नाही. शेवटी चांदूररेल्वे पोलीस ठाण्यात खातेदारांनी लेखी तक्रार दाखल केली. याबाबत चांदूररेल्वे पोलिसांमार्फत कासवगतीने कार्यवाही होत असल्यामुळे खातेदारांनी वरिष्ठांकडे धाव घेतली. पै-पै भरलेले आरडीचे लाखो रुपये बुडणार का, अशी विचारणा करत असले तरी वरिष्ठांनीही कानावर हात ठेवले. त्यामुळे आरडीधारकांची चिंता वाढली आहे. (तालुका प्रतिनिधी)