शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ट्रक खरेदी व्यवहारात व्यापाऱ्याची १० लाखांनी फसवणूक, आरोपी 'असा' सापडला जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 17:30 IST

पथकाने आरोपीचा मागोवा घेतला तेव्हा तो सतत प्रवास करत होता. त्याच्या मोबाइल लोकेशनवरून तब्बल तीन दिवस आरोपीचा पाठलाग करण्यात आला.

अंजनगाव सुर्जी (अमरावती) : स्थानिक सुर्जी विभागातील नेताजी चौक येथील कांदा व्यापारी मो. एजाज मो. गुलाब यांची सातारा येथील आरोपीने ट्रक खरेदी व्यवहारात तब्बल १० लाख रुपयांनी फसवणूक केली. या आरोपीचा अंजनगाव पोलीस पथकाने तब्बल तीन दिवस पाठलाग करून अखेर त्याला अटक केली.

पोलीस सूत्रांनुसार, कुणाल अरुण चव्हाण (३२, रा. संभाजीनगर, सातारा) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पुण्याच्या चाकण परिसरातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. ही कामगिरी करणाऱ्या पोलीस पथकात उपनिरीक्षक प्रल्हाद पवार, सहायक निरीक्षक नागे, पोलीस कर्मचारी गोपाळ सोळंके, रूपलाल नाकतोडे यांचा समावेश होता. फिर्यादी मो. एजाज हे या पथकाच्या सोबत होते. त्यांनी आरोपीची ओळख पटविली.

फसवणुकीनंतर तब्बल अडीच वर्षे आरोपी रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होता. अखेर मो. एजाज यांनी ठाणेदार दीपक वानखडे यांच्याशी संपर्क करून त्यांना हकीकत सांगितली. वानखडे यांनी सातारा पोलिसांशी सोबत संपर्क करून पथक स्थापन केले. पथकाला गोपनीयता बाळगण्याचा सल्ला देत त्यांनी फक्त सातारा ठाणेदारासोबत संपर्कात राहावयास सांगितले. पथकाने आरोपीचा मागोवा घेतला तेव्हा तो सतत प्रवास करत होता. त्याच्या मोबाइल लोकेशनवरून तब्बल तीन दिवस आरोपीचा पाठलाग करण्यात आला. आरोपीला अंजनगावात आणल्यानंतर न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

रक्कम बुडवणाऱ्याला भरविला घास

मो. एजाज यांची मोठी रक्कम बुडवणारा आरोपी कुणाल चव्हाण याला अटक केल्यावर त्याला एजाज यांनी प्रवासात आग्रहाने जेवू घातले. आपली रक्कम मागे-पुढे येत राहील, पण तू जेवण करून घे, असा आरोपीला म्हटल्याचा पोलिसांनी आवर्जून उल्लेख केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी