शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

चार मिनिटे आॅनलाईन मूल्यांकन अनिवार्य, अमरावती विद्यापीठाचा निर्णय, प्राध्यापकांना सक्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 16:55 IST

मुंबई विद्यापीठाच्या निकालांमध्ये झालेल्या गोंधळानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आॅनलाईन मूल्यांकनासाठी संबंधित प्राध्यापकांना  चार मिनिटांचा कालावधी अनिवार्य केला आहे.

- गणेश वासनिक अमरावती, दि. २५ - मुंबई विद्यापीठाच्या निकालांमध्ये झालेल्या गोंधळानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आॅनलाईन मूल्यांकनासाठी संबंधित प्राध्यापकांना  चार मिनिटांचा कालावधी अनिवार्य केला आहे. याअनुषंगाने सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले असून हिवाळी परीक्षांचे मूल्यांकन या नवीन निर्णयानुसार केले जाणार आहे.महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा विभागाचा कारभार आॅनलाईन करणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने परीक्षा विभागाने वाटचाल चालविली आहे. मात्र, आॅनलाईन मूल्यांकनाचा दर्जा सुधारावा, यासाठी प्राध्यापकांना मूल्यांकनासाठी आता चार मिनिटे द्यावीच लागतील, त्याशिवाय आॅनलाईन मूल्यांकन प्रक्रिया पुढे सरकणार नाही, याअनुषंगाने सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी आॅनलाईन मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना वेळेचे बंधन नव्हते. त्यामुळे आॅनलाईन मूल्यांकन झपाट्याने होत होते. परंतु मूल्यांकनात गोंधळ, घोळ झाल्याच्या तक्रारी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.  यापार्श्वभूमीवर प्राध्यापकांना किमान चार मिनिटे पेपर तपासणे कुलगुरूंनी अनिवार्य केले आहे. पेपरचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी संबंधित विषयाच्या प्राध्यापकांवर सोपविली जाते. त्यात घोळ झाल्यास विद्यार्थ्यांचा विद्यापीठ प्रशासनावरच रोष असतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.  मूल्यांकनादरम्यान प्राध्यापकाचे नाव, मूल्यांकन सुरु आणि पूर्ण झाल्याची वेळ, गुण वन अन्य माहिती विभागप्रमुखांना क्षणात बघता येईल, असा नवा बदल सॉफ्टवेअरमध्ये करण्यात आला आहे. 

- तर प्राध्यापकांना पेपर रिजेक्टचे अधिकारआॅनलाईन मूल्यांकन करताना संबंधित प्राध्यापकांना पेपर अस्पष्ट किंवा संशयास्पद दिसून आल्यास त्यांना पेपर रिजेक्ट करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. पेपर रिजेक्ट करुन तो परीक्षा विभागाकडे निर्णयार्थ पाठवू शकतील, अशी माहिती आहे. 

‘त्या’ प्राध्यापकांची चौकशी होणारयापूर्वी आॅनलाईन मूल्यांकनास कमी वेळ देणाºया प्राध्यापकांची चौकशी केली जाणार आहे. त्यानुसार कुलगुरु  मुरलीधर चांदेकर यांनी पावले उचलली आहेत. आॅनलाईन परीक्षा, मूल्यांकन व निकालात पारदर्शता, अचुकता आणण्यासाठी योग्य ते निर्णय घेतले जात आहेत.

पेपरचे मूल्यांकन करणारी यंत्रणा ही प्राध्यापक मंडळी आहे. त्यामुळे आॅनलाईन पेपर मूल्यांकनात अचुकता, दर्जा सुधारावा, याकरिता प्राध्यापकांना मूल्यांकनासाठी आता कमीतकमी चार मिनिटे द्यावी लागतील. कुलगुरूंच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.- जयंत वडतेसंचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ,   संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.                        

टॅग्स :Studentविद्यार्थी