शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

परतवाडा-अमरावती महामार्गाचे चौपदरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:01 IST

परतवाडा-अमरावती मार्गावर जड आणि प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. अमरावतीनंतर दर्यापूर, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चिखलदरा, धारणी या जिल्ह्यातील तालुक्यांसह अकोट, अकोला व मध्यप्रदेशातील बैतूल, बऱ्हाणपूर, खंडवा, इंदूरसाठी रात्रंदिवस वाहतूक सुरू राहते. अनेक वर्षांपासून या आंतरराज्य महामार्गाच्या कामाला अडथळे येत होते.

ठळक मुद्देअखेर भाग्य उजळले : गाव तेथे काँक्रीट रस्ता, ६०० कोटींचा प्रस्तावित खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : जिल्ह्यात सर्वाधिक वर्दळीचा असलेल्या परतवाडा-अमरावती महामार्गाच्या चौपदरीकरणास अखेर सुरुवात होणार आहे. येत्या वर्षभरात ६०० कोटी रुपये खर्चून हा महामार्ग चौपदरी होईल.परतवाडा-अमरावती मार्गावर जड आणि प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. अमरावतीनंतर दर्यापूर, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चिखलदरा, धारणी या जिल्ह्यातील तालुक्यांसह अकोट, अकोला व मध्यप्रदेशातील बैतूल, बऱ्हाणपूर, खंडवा, इंदूरसाठी रात्रंदिवस वाहतूक सुरू राहते. अनेक वर्षांपासून या आंतरराज्य महामार्गाच्या कामाला अडथळे येत होते. त्यामुळे प्रलंबित राहिलेल्या या रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम गत आठवड्यात पूर्ण झाले आहे. दिवाळीनंतर या कामाच्या निविदा काढण्याची तयारी सार्वजनिक बांधकाम विभागाने चालविली आहे. त्यासाठी या एकूण ५४ किलोमीटर अंतराचा रस्त्यावर कुठे काय घ्यायचे, याचा आराखडा बनविला जात आहे. एकंदर येत्या सहा ते आठ महिन्यांत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता वर्तविली जात आहेया कामाला कोरोनामुळे लॉकडाऊन होण्याची वेळ आली. परिणामी उशिरा का होईना मात्र, वर्षाच्या शेवटी कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. अमरावती ते अचलपूर नाका, परतवाडा शहरातील जयस्तंभ चौकपर्यंत सर्वेक्षण झाले होते. परंतु, धारणी, बऱ्हाणपूर, खंडवा या मार्गाचा विचार करता मल्हारानजीकच्या बुरडघाटपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे नऊ किलोमीटर अंतराचा हा मार्ग अतिरिक्त समाविष्ट करण्यात आला आहे.अमरावती ते परतवाडापर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम आता नऊ किलोमीट बुरडघाटपर्यंत वाढविले आहे. खासगी बँकेच्या अर्थसाहाय्याने काम होणार आहे. सर्वेक्षण झाले असून तपासणी होताच दिवाळीनंतर निविदा काढली जाईल. कोरोनामुळे कामाला विलंब झाला.- चंद्रकांत मेहत्रे,कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग, अचलपूरखासगी बँकेच्या कर्जातून होणार रस्ताबुरडघाट परतवाडा-अमरावती या आंतरराज्यीय महामार्गासाठी ६०० कोटींचा खर्च अपेक्षित असून खासगी बँकेच्या अर्थसहाय्यातून सदर काम होणार आहे. संपूर्ण रस्ता डांबरीकरणाचा राहणार आहे. वलगाव, आष्टी, पूर्णानगर, आसेगाव, बोरगाव पेठ, भूगाव आदी गाव तेथे काँक्रीटीकरण होईल. त्यामुळे एकूण ५४ किलोमीटरपैकी १० किलोमीटरचा रस्ता काँक्रिटीकरणाचा राहणार आहे. रस्त्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून डीपीआर सबमिशन झाले त्याची तपासणी होऊन दिवाळीदरम्यान निविदा निघण्याची शक्यता आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग