शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

तीन घरांसह चार गोठे खाक

By admin | Updated: May 22, 2016 00:03 IST

अचलपूर तालुक्यातील वासणी बु. येथे शनिवारी दुपारी ३.३० वाजता लागलेल्या आगीत तीन घरांसह चार गोठ्यांची राखरांगोळी झाली.

वासनी येथील घटना : तीन बकऱ्या ठार, गाय-वासरु होरपळलेपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील वासणी बु. येथे शनिवारी दुपारी ३.३० वाजता लागलेल्या आगीत तीन घरांसह चार गोठ्यांची राखरांगोळी झाली. आगीत तीन बकऱ्या होरपळून मृत पावल्या. काही बकऱ्या वासरू व गाय हे पाळीव जनावरे जखमी झाले. विद्युत खांबावरून आगगोळे पडल्याने आग लागल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. सुनील श्रीकृष्ण विजारे, सुमित्रा विश्वनाथ बिजारे, दिनेश गंगाधर ठाकरे यांच्या घरांची आगीत राखरांगोळी झाली. सुनिता बिजारे यांच्या तीन बकऱ्या गोठ्यात जळून ठार झाल्या. सुभाष अंबादास ठाकरे, प्रकाश गंगाधर ठाकरे, मुरलीधर ठाकरे आदींचे गोठे जळून राख झाले. वीज वितरण कंपनीमुळे आग परतवाडा : या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली होती. आग लागताच अचलपूर व चांदूरबाजार येथील अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. तीन बंबांनी आग विझविण्यात आली. वासणी बु. येथे शनिवारी लागलेली आग विज वितरण कंपनीच्या हलगर्जीमुळे लागल्याचे सांगण्यात आले. सुनीता बिजारेंच्या घराशेजारील विज खांबावरुन दुपारी विद्युत तारांच्या घर्षणाने आगीचे गोळे खाली पडले. गोठ्याला आग लागताच हवेने घरांसह गोठ्यांना कवेत घेतले. आग लागताच गावात एकच हाहाकर माजला होता. विद्युत कंपनीचे तार जमिनीवर लोंबकळत असताना त्यावर दुर्लक्ष कोल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अचलपूरचे तहसीलदार मनोज लोणारकर, रामगुंडे, राजेश व्यवहारे, विजय गिरी, सोनार महसूल अधिकाऱ्यांनी तत्काल भेट देवून माहिती घेतली. (प्रतिनिधी)