शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
2
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
3
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
4
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
5
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
6
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
7
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
8
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
9
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
10
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
11
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
12
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
13
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
14
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
15
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
16
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
17
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
18
सांगली ते दुबई व्हाया सुरत; मुंबईच्या सलीम डोलाचं ड्रग्ज साम्राज्य, महाराष्ट्र पोलिसांनी केला होता पर्दाफाश
19
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
20
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन

एकाचवेळी निघाल्या चार शवयात्रा

By admin | Updated: April 2, 2015 00:22 IST

सोमवारीच ज्या घरून एक शवयात्रा निघाली होती, त्याच घरून बुधवारी पुन्हा दोन अंत्ययात्रा निघाल्यात.

संजय खासबागे झोलंबा (वरुड)सोमवारीच ज्या घरून एक शवयात्रा निघाली होती, त्याच घरून बुधवारी पुन्हा दोन अंत्ययात्रा निघाल्यात. शेजारच्या दोन घरून तिरडीवर निपचित पडेलेल्या चिमुकल्यांच्या दोन अंत्ययात्रा आल्यात. या चार सामूहिक अंत्ययात्रेत अख्खा गाव सामिल झाला होता. गावकऱ्यांनी स्वप्नातही न कल्पिलेले दु:खाची परिसिमा गाठणारे हे दृष्य उपस्थित हरेक काळजाला पाझर फोडून गेले.चारही मृतदेह एका ठिकाणी आलेत नि भयावह आक्रोश झाला. तीन चिमुकले नि एका तरुणाचे कलेवर नेताना होणाऱ्या वेदना शब्दातित होत्या. घटनेनंतर गावात तैनात झालेल्या अधिकाऱ्यांच्याही डोळ्यांनाही धारा लागल्या होत्या. काय करावे, कुणालाच काही सुचेनासे झाले होते. अवघा झोलंब गाव हमसून-हमसून रडत होता. वृद्ध असो वा लहान, कुणालाही अन्नाचा घास घशाखाली उतरला नाही. गावात चूलच पेटली नाही. गावात स्मशान शांतता आणि स्मशानात अख्खा गाव अशी स्थिती निर्माण झाली होती. जणू घटना आपल्याच घरी घडली असावी, अशा वेदनांनी गावकरी विव्हळत होते. कुणाच्याच तोंडी शब्द नव्हते. होते ते केवळ हुंदके.अंत्ययात्रेत सहभागी न झालेल्या बायाबापड्यांचा दूरूनच हृदय पिळवटणारा आक्रोश करीत होत्या. घराघरात आरोग्यदूतघटना घडताच आरोग्यसेविका घरोघरी दाखल झाल्या. कुणाला ताप, खोकला अशी लक्षणे तर नाहीत ना, कुणी आजारी तर नाहीत ना, आदी नोंदी त्यांनी घेतल्या. पतीपाठोपाठ गेला मुलगाही !४झोलंबा येथे किशोर नेहारे यांच्या कुटुंबात चौथ्या वर्गात शिकणारी मोहिनी, पहिल्या वर्गात शिकणारी राखी आणि अंगणवाडीत जाणारा तीन वर्षांचा जय असे सदस्य कुटुंबप्रमुख असलेल्या किशोर यांचे दोन महिन्यांपूर्वीच अपघाती निधन झाले. म्हातारी सासू आणि तीन मुलांचा सांभाळ ललीताबाई मोलमजुरी करुन करीत होत्या. कालच्या दुर्दैवी घटनेने चिमुकला जय काळाने हिरावून नेला. इवल्याशा मुलाच्या अशा जाण्याने कुटुंबीयांनी रडून रडून आकाश पाताळ एक केले. पोटचे दोन्ही गोळे गेले!रामभाऊ नेहारे यांना दोन मुले. मोठा रितेश आणि लहान सतीश. या दोघांशिवाय पत्नी आशाबाई कुटुंबात आहेत. आशाबार्इंनी गव्हाचा चिक्का केला. त्यातून उरलेल्या आम्लयुक्त पाण्यात पीठ कालवून धापोडे केले. त्या माऊलीस काय खबर की, ज्यांच्यासाठी हे खाद्यपदार्थ केलेत, त्यांच्याच ते जीवावर उठतील. रविवारी २५ वर्षीय रितेशने आई कुरडया काढत असताना त्यातील कुरडी खाल्ली आणि प्रकृती ढासळली. त्याला खासगी दवाखान्यात मोर्शीला दाखल केले. परंतु वेळ अटळ होती. वडिलांच्या डोक्यावर हात ठेवून रितेश म्हणाला होता, ‘बाबा मी जातो.' त्यानंतर मंळवारी लहाना सतिष आईबाबांना सोडून गेला. ज्यांच्या उमेदीचे दिवस होते ते दोघेही निघून गेले. घरात आता राहिले ते केवळ पती-पत्नी. शवविच्छेदनाकरिता विशेष पथक विषबाधेमुळे चार लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर दखल प्रशासनाने घेतली. शल्यचिकित्सक, न्यायवैद्यक अधिकारी, बालरोगतज्ज्ञ, जनरल फिजिशियन यांचा समावेश असलेल्या तज्ज्ञांच्या विशेष पथकाने मृतांचे अमरावतीत शवविच्छेदन केले. कुरडई खाल्लेला कुत्राही दगावला !कुरडयांचा खाली पडलेला चुरा एका कुत्र्याच्या पिल्लाने खाल्ला. तो कुत्राही दगावला. एका बकरीनेही या कुरडया खाल्ल्या होत्या. ती मात्र बचावली. कुरडया, पीठ, तिखट, मिठाचे नमुनेआरोग्य विभागाने रामभाऊ नेहारे यांच्याकडील कुरडया, पीठ, तिखट, मीठ आणि पाण्याचे नमुने घेतले. ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. नेमकी विषबाधा कशामुळे झाली, याचा शोध घेण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरीतही शोककळा काटोल तालुक्यातील खापरी येथून आलेल्या परसे परिवरातील आदर्श आणि कोमल परसे या बहीण-भावांनासुध्दा विषबाधा झाली. यातील आदर्शचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोमलवर अमरावतीला उपचार सुरू आहेत. अंत्यसंस्कारांचे सोपस्कार आटोपल्यांनतर वडीलांनी दोन्ही मुलांना गावी चालण्याचा आग्रह धरला होता. मात्र दोन दिवस थांबावे म्हणून कुटुंब मुक्कामी राहिल्याने नि विषबाधेचे संकट कोसळले.