शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

एकाचवेळी निघाल्या चार शवयात्रा

By admin | Updated: April 2, 2015 00:22 IST

सोमवारीच ज्या घरून एक शवयात्रा निघाली होती, त्याच घरून बुधवारी पुन्हा दोन अंत्ययात्रा निघाल्यात.

संजय खासबागे झोलंबा (वरुड)सोमवारीच ज्या घरून एक शवयात्रा निघाली होती, त्याच घरून बुधवारी पुन्हा दोन अंत्ययात्रा निघाल्यात. शेजारच्या दोन घरून तिरडीवर निपचित पडेलेल्या चिमुकल्यांच्या दोन अंत्ययात्रा आल्यात. या चार सामूहिक अंत्ययात्रेत अख्खा गाव सामिल झाला होता. गावकऱ्यांनी स्वप्नातही न कल्पिलेले दु:खाची परिसिमा गाठणारे हे दृष्य उपस्थित हरेक काळजाला पाझर फोडून गेले.चारही मृतदेह एका ठिकाणी आलेत नि भयावह आक्रोश झाला. तीन चिमुकले नि एका तरुणाचे कलेवर नेताना होणाऱ्या वेदना शब्दातित होत्या. घटनेनंतर गावात तैनात झालेल्या अधिकाऱ्यांच्याही डोळ्यांनाही धारा लागल्या होत्या. काय करावे, कुणालाच काही सुचेनासे झाले होते. अवघा झोलंब गाव हमसून-हमसून रडत होता. वृद्ध असो वा लहान, कुणालाही अन्नाचा घास घशाखाली उतरला नाही. गावात चूलच पेटली नाही. गावात स्मशान शांतता आणि स्मशानात अख्खा गाव अशी स्थिती निर्माण झाली होती. जणू घटना आपल्याच घरी घडली असावी, अशा वेदनांनी गावकरी विव्हळत होते. कुणाच्याच तोंडी शब्द नव्हते. होते ते केवळ हुंदके.अंत्ययात्रेत सहभागी न झालेल्या बायाबापड्यांचा दूरूनच हृदय पिळवटणारा आक्रोश करीत होत्या. घराघरात आरोग्यदूतघटना घडताच आरोग्यसेविका घरोघरी दाखल झाल्या. कुणाला ताप, खोकला अशी लक्षणे तर नाहीत ना, कुणी आजारी तर नाहीत ना, आदी नोंदी त्यांनी घेतल्या. पतीपाठोपाठ गेला मुलगाही !४झोलंबा येथे किशोर नेहारे यांच्या कुटुंबात चौथ्या वर्गात शिकणारी मोहिनी, पहिल्या वर्गात शिकणारी राखी आणि अंगणवाडीत जाणारा तीन वर्षांचा जय असे सदस्य कुटुंबप्रमुख असलेल्या किशोर यांचे दोन महिन्यांपूर्वीच अपघाती निधन झाले. म्हातारी सासू आणि तीन मुलांचा सांभाळ ललीताबाई मोलमजुरी करुन करीत होत्या. कालच्या दुर्दैवी घटनेने चिमुकला जय काळाने हिरावून नेला. इवल्याशा मुलाच्या अशा जाण्याने कुटुंबीयांनी रडून रडून आकाश पाताळ एक केले. पोटचे दोन्ही गोळे गेले!रामभाऊ नेहारे यांना दोन मुले. मोठा रितेश आणि लहान सतीश. या दोघांशिवाय पत्नी आशाबाई कुटुंबात आहेत. आशाबार्इंनी गव्हाचा चिक्का केला. त्यातून उरलेल्या आम्लयुक्त पाण्यात पीठ कालवून धापोडे केले. त्या माऊलीस काय खबर की, ज्यांच्यासाठी हे खाद्यपदार्थ केलेत, त्यांच्याच ते जीवावर उठतील. रविवारी २५ वर्षीय रितेशने आई कुरडया काढत असताना त्यातील कुरडी खाल्ली आणि प्रकृती ढासळली. त्याला खासगी दवाखान्यात मोर्शीला दाखल केले. परंतु वेळ अटळ होती. वडिलांच्या डोक्यावर हात ठेवून रितेश म्हणाला होता, ‘बाबा मी जातो.' त्यानंतर मंळवारी लहाना सतिष आईबाबांना सोडून गेला. ज्यांच्या उमेदीचे दिवस होते ते दोघेही निघून गेले. घरात आता राहिले ते केवळ पती-पत्नी. शवविच्छेदनाकरिता विशेष पथक विषबाधेमुळे चार लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर दखल प्रशासनाने घेतली. शल्यचिकित्सक, न्यायवैद्यक अधिकारी, बालरोगतज्ज्ञ, जनरल फिजिशियन यांचा समावेश असलेल्या तज्ज्ञांच्या विशेष पथकाने मृतांचे अमरावतीत शवविच्छेदन केले. कुरडई खाल्लेला कुत्राही दगावला !कुरडयांचा खाली पडलेला चुरा एका कुत्र्याच्या पिल्लाने खाल्ला. तो कुत्राही दगावला. एका बकरीनेही या कुरडया खाल्ल्या होत्या. ती मात्र बचावली. कुरडया, पीठ, तिखट, मिठाचे नमुनेआरोग्य विभागाने रामभाऊ नेहारे यांच्याकडील कुरडया, पीठ, तिखट, मीठ आणि पाण्याचे नमुने घेतले. ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. नेमकी विषबाधा कशामुळे झाली, याचा शोध घेण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरीतही शोककळा काटोल तालुक्यातील खापरी येथून आलेल्या परसे परिवरातील आदर्श आणि कोमल परसे या बहीण-भावांनासुध्दा विषबाधा झाली. यातील आदर्शचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोमलवर अमरावतीला उपचार सुरू आहेत. अंत्यसंस्कारांचे सोपस्कार आटोपल्यांनतर वडीलांनी दोन्ही मुलांना गावी चालण्याचा आग्रह धरला होता. मात्र दोन दिवस थांबावे म्हणून कुटुंब मुक्कामी राहिल्याने नि विषबाधेचे संकट कोसळले.