शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
3
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
4
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
5
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
6
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
7
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
8
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
9
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
10
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
11
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
12
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
13
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
14
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
15
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
16
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
17
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
18
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
19
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
20
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

चार केंद्रांचा वांधा; कशी होणार नोंदणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 22:39 IST

जिल्ह्यात हमीभावाने सोयाबीन, मूग व उडदाची खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी सध्या सहा केंद्रांवर शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी सुरू आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या तंबीनंतर दोन केंद्रांना मंजुरी मिळणार असली तरी जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी व नांदगाव खंडेश्वर केंद्रांना मंजुरीच दिली नसल्याने येथील शेतकऱ्यांनी शेतमाल विकायचे कुठे, हा प्रश्न कायमच आहे.

ठळक मुद्देदोन केंद्रांना मंजुरीच नाही : सोमवारच्या आंदोलनामुळे प्रशासनात लगबग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात हमीभावाने सोयाबीन, मूग व उडदाची खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी सध्या सहा केंद्रांवर शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी सुरू आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या तंबीनंतर दोन केंद्रांना मंजुरी मिळणार असली तरी जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी व नांदगाव खंडेश्वर केंद्रांना मंजुरीच दिली नसल्याने येथील शेतकऱ्यांनी शेतमाल विकायचे कुठे, हा प्रश्न कायमच आहे.जिल्ह्यात शासनाद्वारा सोयाबीनची सहा हजार ९७५ या हमीभावाने ३१ आॅक्टोबरपर्यंत, तर मुगाची सहा हजार ९७५ या हमीभावाने व उडदाची पाच हजार ६०० या हमीभावाने ९ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन नोंदणी करण्याचे आदेश प्रधान कार्यालयाने दिलेत. मात्र, या अवधीत जिल्ह्यात डीएमओंची सातपैकी तीन, तर व्हीसीएमएफची तीन केंद्रच सुरू झालीत.अद्यापही डीएमओची धारणी व चांदूर रेल्वे केंद्र सुरू झालेली नाहीत. अंजनगाव सुर्जी व नांदगाव खंडेश्वर या दोन केंद्रांना शासनाने मंजुरी दिलेली नाही. तसेच अमरावती व चांदूरबाजार येथे जे प्रस्ताव दाखल आहेत, त्यामध्ये त्रुटी आढळल्याने ते प्रस्ताव नामंजूर झालेत.शासनाने हमीभाव जाहीर केले. मात्र, या भावानुसार राज्यात खरेदी सुरू नाही. आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रसिद्धी नाही. यासाठी दाखल एका याचिकेच्या सुनावणीच्या अनुषंगाने याविषयीची व्यापक प्रसिद्धी करावी व नाफेडला विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणीची मुदत २४ आॅक्टोबरपर्यंत वाढविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायलयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. मंगेश पितळे यांनी बुधवारी दिल्याची माहिती आहे.धारणी व चांदूर रेल्वे केंद्र सुरू होणारकेवळ दोन शेतकऱ्यांची आॅफलाईन खरेदी केल्यामुळे चांदूर रेल्वे व धारणी येथील खरेदी-विक्री संस्थांना मार्केटिंग फेडरेशनने काळ्या यादीत टाकले होते. याविषयी आ. वीरेंद्र जगताप यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला आंदोलनाची धमकी दिल्यामुळे हे केंद्र सुरू करण्यास प्रधान कार्यालयाने मान्यता दिली आहे. मात्र, या शेतकºयांच्या चुकाºयाचा प्रश्न कायम आहे.सध्या तीन केंद्रांवर नोंदणी सुरू आहे. धारणी व चांदूर रेल्वे केंद्रांना आता मान्यता दिली. या केंद्रावर लवकरच नोंदणी सुरू होईल, चांदूर बाजार व अमरावती केंद्रांच्या प्रस्तावात त्रुटी आहेत. नांदगाव खंडेश्वर व अंजनगाव सुर्जी केंद्रांना यंदा मान्यता नाही.- राजेश भुयारप्र. जिल्हा विपणन अधिकारी