शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

चार केंद्रांचा वांधा; कशी होणार नोंदणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 22:39 IST

जिल्ह्यात हमीभावाने सोयाबीन, मूग व उडदाची खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी सध्या सहा केंद्रांवर शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी सुरू आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या तंबीनंतर दोन केंद्रांना मंजुरी मिळणार असली तरी जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी व नांदगाव खंडेश्वर केंद्रांना मंजुरीच दिली नसल्याने येथील शेतकऱ्यांनी शेतमाल विकायचे कुठे, हा प्रश्न कायमच आहे.

ठळक मुद्देदोन केंद्रांना मंजुरीच नाही : सोमवारच्या आंदोलनामुळे प्रशासनात लगबग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात हमीभावाने सोयाबीन, मूग व उडदाची खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी सध्या सहा केंद्रांवर शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी सुरू आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या तंबीनंतर दोन केंद्रांना मंजुरी मिळणार असली तरी जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी व नांदगाव खंडेश्वर केंद्रांना मंजुरीच दिली नसल्याने येथील शेतकऱ्यांनी शेतमाल विकायचे कुठे, हा प्रश्न कायमच आहे.जिल्ह्यात शासनाद्वारा सोयाबीनची सहा हजार ९७५ या हमीभावाने ३१ आॅक्टोबरपर्यंत, तर मुगाची सहा हजार ९७५ या हमीभावाने व उडदाची पाच हजार ६०० या हमीभावाने ९ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन नोंदणी करण्याचे आदेश प्रधान कार्यालयाने दिलेत. मात्र, या अवधीत जिल्ह्यात डीएमओंची सातपैकी तीन, तर व्हीसीएमएफची तीन केंद्रच सुरू झालीत.अद्यापही डीएमओची धारणी व चांदूर रेल्वे केंद्र सुरू झालेली नाहीत. अंजनगाव सुर्जी व नांदगाव खंडेश्वर या दोन केंद्रांना शासनाने मंजुरी दिलेली नाही. तसेच अमरावती व चांदूरबाजार येथे जे प्रस्ताव दाखल आहेत, त्यामध्ये त्रुटी आढळल्याने ते प्रस्ताव नामंजूर झालेत.शासनाने हमीभाव जाहीर केले. मात्र, या भावानुसार राज्यात खरेदी सुरू नाही. आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रसिद्धी नाही. यासाठी दाखल एका याचिकेच्या सुनावणीच्या अनुषंगाने याविषयीची व्यापक प्रसिद्धी करावी व नाफेडला विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणीची मुदत २४ आॅक्टोबरपर्यंत वाढविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायलयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. मंगेश पितळे यांनी बुधवारी दिल्याची माहिती आहे.धारणी व चांदूर रेल्वे केंद्र सुरू होणारकेवळ दोन शेतकऱ्यांची आॅफलाईन खरेदी केल्यामुळे चांदूर रेल्वे व धारणी येथील खरेदी-विक्री संस्थांना मार्केटिंग फेडरेशनने काळ्या यादीत टाकले होते. याविषयी आ. वीरेंद्र जगताप यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला आंदोलनाची धमकी दिल्यामुळे हे केंद्र सुरू करण्यास प्रधान कार्यालयाने मान्यता दिली आहे. मात्र, या शेतकºयांच्या चुकाºयाचा प्रश्न कायम आहे.सध्या तीन केंद्रांवर नोंदणी सुरू आहे. धारणी व चांदूर रेल्वे केंद्रांना आता मान्यता दिली. या केंद्रावर लवकरच नोंदणी सुरू होईल, चांदूर बाजार व अमरावती केंद्रांच्या प्रस्तावात त्रुटी आहेत. नांदगाव खंडेश्वर व अंजनगाव सुर्जी केंद्रांना यंदा मान्यता नाही.- राजेश भुयारप्र. जिल्हा विपणन अधिकारी