शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’वर १२ लाख झाडे लावण्याचा विसर, तीन वर्षांनंतरही महामार्ग ओस

By गणेश वासनिक | Updated: July 7, 2025 13:27 IST

Amravati : महामार्गावर ३० लाख झाडे लावण्याचा दावा ठोकला जात असला, तरी प्रवासादरम्यान हा दावा फोल

अमरावती : राज्याच्या विकासाला गती देणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगत १२ लाख झाडे लावण्याचा विसर पडला आहे. तीन वर्षे लोटली असताना पहिल्या टप्प्यात तीन लाख वृक्षांची लागवड झालेली नाही. परिणामी, ‘समृद्धी’वर हिरवळ निर्माण होऊ शकली नाही. या महामार्गावर वारंवार होणारे अपघात हेसुद्धा महामार्गाच्या दोन्ही बाजू ओस पडल्याचे महत्त्वपूर्ण कारण मानले जात आहे.

नागपूर-मुंबई महामार्गावरून ७०१ किमीचा प्रवास मात्र सुसाट झालेला आहे. हा महामार्ग तयार करताना वन्यजीवांसह इतर बाबींची काळजी घेण्यात आली आहे. महामार्गावर ३० लाख झाडे लावण्याचा दावा ठोकला जात असला, तरी प्रवासादरम्यान हा दावा फोल ठरतो. ‘समृद्धी’वर डिव्हायडरमध्ये झाडे लावण्यासाठी बरीच जागा असताना त्याठिकाणी फुलझाडे, शोभिवंत झुडपे लावून महामार्गाची ‘समृद्धी’ झाली, असा अर्थ प्रशासनाने काढला की काय? असा सवाल आता प्रवासी उपस्थित करत आहेत.

१२ लाख झाडांचे काय?१) समृद्धी महामार्गावर दोन्ही लेनच्या मधोमध ९ मीटर एवढी जागा झाडे लावण्यासाठी राखीव आहे.२) वड, पिंपळ, कडूनिंब, आंबा अशी महत्त्वाची ऑक्सिजन खेचणारी झाडे ३ मीटर अंतरावर लावली तर ३३३ प्रति किमी याप्रमाणे ४.६६ लाख झाडे लावता येतील. दुप्पट लाइनमध्ये हा आकडा ९ लाख झाडांवर पोहोचतो. याशिवाय डिव्हायडरच्या मधोमध ३ लाख झाडे लावता येतील.३) गत तीन वर्षांत समृद्धीवर १२ लाख झाडे लावणे अपेक्षित होते. मात्र, ३ वर्षांनंतरही या महामार्गावर २ लाख झाडेही व्यवस्थित लावली गेली नाहीत. गुलमोहर, काशीद यासारखी कच्च्या लाकूड प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत.

काही भागात नैसर्गिक हिरवळइगतपुरी ते कसारा हा ७६ किमीचा समृद्धी महामार्ग नैसर्गिक हिरवळीने नटलेला आहे. या ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी जागा आहे. मात्र, बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यांतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूने जंगल असल्याने प्रवास सुखद होतो. मात्र, इतरत्र प्रवास हा भकास वाटतो.

"समृद्धी महामार्गावर पॅकेजनिहाय वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यात काही शोभिवंत, फुलझाडे लावली आहेत. टप्प्याटप्प्याने झाडे लावली जातील."- गजानन पळसकर, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी, नागपूर

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAmravatiअमरावती